Skip to main content

अन्नोत्सव

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/12/2021 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली . पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला.

नवी दिल्ली @ 110

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 12/12/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.

ऐसे ऐकिले आकाशी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 11/12/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून"
काव्यरस

(चकणा जरा)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 11/12/2021 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे.

२२ यार्ड

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 11/12/2021 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नव्वदच्या दशकातही, आमच्या डोंगरपायथ्याला बिलगून असणाऱ्या छोट्याश्या गावात क्रिकेट हा लहान-थोर सर्वांचा आवडता खेळ. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेलही पण उत्साह मात्र तोच, जो भारतात क्रिकेटसाठी इतरत्र कुठेही दिसेल. फळी (बॅट) विकत आणलेली बॅट त्यावेळी गल्ली क्रिकेटमधे तरी अपवादानेच सापडायची. एखादी लाकडी फळी शक्य असेल त्या पद्धतीने बॅट मधे रूपांतरीत केली जायची. त्या बॅटने खेळायची एवढी सवय व्हायची की कोणीतरी रेडिमेड बॅट आणली की रुळायला वेळ लागायचा. एकदा वाढदिवसाला हट्ट करून मिळालेल्या नवीन बॅटचा इतका आनंद झाला की मी भारतीय संघात खेळतोय अशी स्वप्न पडायला लागली.

वॉशिंग मशीन आणि लिपिस्टिक

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/12/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
(एका फेसबुकी चरित्रापासून मिळालेली प्रेरणा) आमची छोटीसी फॅमिली. मी, माझा नवरा आणि एकुलता एक मुलगा, तो ही शिक्षणासाठी घरापासून दूर. घरात आम्ही दोघेच. एक दिवस नवरोबा वॉशिंग मशीन घेऊन आले. मी विचारले, ही कशासाठी. नवरोबा उतरले, धोब्याचा खर्च वाचेल आणि तुलाही जास्त कष्ट करावे लागणार नाही. मी मनात म्हंटले, अरे, खरे बोल की, मला कामावर जुंपण्यासाठीच ही मशीन तू घरी आणली आहे. माझे सुख-चैन पाहवत नाही तुला. मी पण काही कमी नाही, हातात आलेला असा मौका मी सोडणार थोडीच. नवर्‍याला चांगली अद्दल घडायचे ठरविले. मग काय, मी खरीदरी सुरू केली.

रस्ते

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 10/12/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

माणूस आणि पुस्तक

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 09/12/2021 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.

75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 09/12/2021 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती. घटना परिषदेच्या सिद्धांतांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी घनिष्ठ संबंध राहिलेला होता. त्यामुळे तिच्या स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या घडामोडींही पाहणे आवश्यक ठरते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे 17व्या शतकाच्या प्रारंभी भारतात आगमन झाल्यापासूनच भारताचा घटनात्मक विकास सुरू झाला.

भारतीय संदर्भ चौकटीची आवश्यकता

लेखक हर्षल वैद्य यांनी बुधवार, 08/12/2021 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय समाजातील वाढते घटस्फोटांचे प्रमाण आणि भाकड जनावरांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे प्रश्न यांत काही परस्परसंबंध आहे काय असे विचारले तर साहजिकच नकारात्मक उत्तर येईल. पहिला विषय हा मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांविषयीचा आहे. तर दुसरा जरी काही प्रमाणात भावनिक आणि सांस्कृतिक असला तरी त्यात प्रमुख अंग हे आर्थिक स्वरूपाचे आहे. या दोन विषयांत सकृतदर्शनी तरी काहीही सामायिक दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय, त्यांचे आनुषंगिक प्रश्न, ते सोडवण्याच्या पद्धती आणि त्यातून मिळणारी उत्तरे हे परस्परांपासून अत्यंत भिन्न असतील असा कोणी निष्कर्ष काढल्यास ते चूक म्हणता येणार नाही.