Skip to main content

बहर गुलमोहराचा

लेखक जयवी
मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ती उठून बाहेर आली. लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं. कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती. तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं. कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्‍यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!! कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं. नकोच आता तो कोंडमारा…..

मोडीलिपीची ओळख

लेखक जिप्सी
मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी भाषेला ज्याप्रमाणे जलद लिहिण्याची स्वतंत्र लिपी आहे, ज्याला आपण 'कर्सिव्ह' म्हणतो त्या प्रमाणेच मराठीलादेखील देवनागरीशिवाय मोडी ही एक स्वतंत्र लिपी आहे. मोडी लिपीला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास आहे. यादवांचा प्रधान हेमाडपंत ह्याच्या काळात या लिपीचा उगम झाला असा एक सर्वसाधारण ठोकताळा आहे, पण मोडीलिपी त्याहीपेक्षा जुनी असण्याचा संभव नाकारता येत नाही. परंतु हेमाडपंतांच्या काळापासून म्हणजेच यादवांच्या राजवटीत मोडीलिपीचा वापर सरकारी दप्तरात होऊ लागला. हळूहळू सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातसुध्दा मोडी आली.देवनागरी म्हणजेच बाळबोध पेक्षा मोडीत भराभर लिहीता येते.
विशेष

येडा आप्पा सरकार चा अजब आदेश

मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
११ मार्च ते १४ मार्च पर्यंत लग्नकार्ये बेळगावमध्ये करू नयेत हो.हिंदी फिल्म मध्ये जसा मुलीचा बाप यायचा मध्ये तसे कर्नाटक सरकार येईल अडवायला ! .

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश
मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश
मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस

माहिती हवी आहे - भाड्याच्या घराबाबत

लेखक स्पा
मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आमच्या सध्याच्या घरात भाड्याने गेली २४ वर्षे राहत आहोत आता बिल्डर्स , मालकाला ती जागा डेवलप करण्याची ऑफर देत आहे तर मालक तडक घर खाली करण्याची नोटीस देऊ शकतो का? कि आम्हाला जागा रिकामी करण्यासाठी तो काही पैसे देईल ? का नवीन बिल्डींग तयार झाल्यावर त्या जागेवर आमचा (थोडा का होईना ) क्लेम राहील ? आम्ही लेवेन मोन्थ लिव लायसन्स या पद्धतीवर राहत नाहीयोत कृपया फारच निकडीचे असल्याने खरडफळ्याचा वापर न करता धागा सुरु केल्याबद्दल क्षमस्व. मला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होताच हा धागा अप्रकाशीत करण्यास हरकत नक्कीच नसेल.

लोकल ,दगड,आणि एक जीव

मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा बातमी ऐकतो नाही का की सायंकाळी रेल्वे ने घरी परत येणाऱ्या प्रवाश्यांवर दगड बसून गंभीर जखमी झाले,दवाखान्यात वेळीच न पोचल्यामुळे मृत्यू वा दवाखान्याचा हलगर्जीपणा,डॉक्टर ची दिरंगाई , कर्मचाऱ्यांची टंचाई इत्यादी मुद्दे त्याला जळूसारखे चिकटून येतात आपण ते निर्विकार चेहऱ्याने वाचतो ,चहा संपला की पेपर भिरकावून "कामाला जायला पाहिजे बाबा,टाईम काढून चालणार नाय " असं म्हणत इयरफोन्स कानात कोंबून निघून जातो..एवढा कोडगेपणा का अंगी रुतला ?हे रोजच झालं म्हणून? बहुदा प्रत्येक मुंबईकर ही बातमी न बघता लिहून काढू शकतो ,फक्त जखमी व्यक्तीच नावं बदलेल ,आम्ही म्हणू "आयला हे सरकार आणि रेल्वे पोलीस चुतीया आह

मराठी भाषा जग/वाढवण्याचा सोप्पा उपाय....

लेखक प्यारे१
मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी....! मराठी दिन 'साजरा' झाला. काही प्रश्न डोक्यात आणि उत्तरे सापडेनात. मराठी ही अभिव्यक्तीची भाषा म्हणून आपण वापरतो. विचारांची देवाण घेवाण करण्याचे माध्यम. मराठी हीच मुख्य भाषा असण्याचे मराठी माणसापोटी जन्मलो हे एक मुख्य कारण. त्याहून मुख्य म्हणजे मराठी वातावरणात वाढलो. (सांगली, दादर, पुणे येथील बरेच अमराठी शुद्ध मराठी बोलताना पाहिलेत) अपवादात्मक अगदीच काही लोक आवड, प्रेम यापोटी मराठी अंगिकारतात. यामध्ये आपले कर्तृत्व काय? आपण 'लाभले आम्हास 'भाग्य' म्हणत खुश.
विशेष