Skip to main content

आरसा

लेखक निनाव यांनी मंगळवार, 16/08/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चेहरा बघतो मी रोज, हल्ली विद्रुपच.. बदळणारा - वेळो वेळी पण पुन्हा - विद्रुपच एवढ्यात, हसणे तसे बरेच कमी झाले आहे, चेहर्‍यावर - आजारपणानं रेघोट्या काढल्या आहेत, हास्य शोधण्याचा प्रयत्न असतो, -सुंदर दिसण्याचा प्रयत्न होतो - विफल असहाय मी, मग आरसा बदळण्याचा प्रयत्न होतो मनी. पण, हा दोष आरस्याचा नाही, हा दोष आहे माझ्या चेहर्‍यात, जो सुंदर-सुबक दिसण्यास तयार नाही, अंगवळणी पडलेले आजारपण, आवडायला लागले आहेत. प्रामाणिकता मात्र जगू देत नाही, बदलायचा हट्ट सोडत नाही. अन चीड येते माझीच मला, उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला , काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास पण नकळत, पुन्हा तोच चेहरा बनवत

मुलगी वाचवा !!!

लेखक धन्या यांनी मंगळवार, 16/08/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल पंधरा ऑगस्ट. सूट्टीच्या दिवशी कूठला सुशिक्षित निवांत उठतो तसाच उठलो. घडयाळात पाहीलं. नऊ वाजले होते. लवकर का उठवलं नाही म्हणून आईला विचारलं. "मी तुला उठवायला गेलेय आणि तू लवकर उठला आहेस असं कधी झालंय का?". मी ओशाळं हसलो. "ठीकंय ठीकंय" म्हणत कामाला लागलो... "अरे काय करतो आहेस घरी. ये लवकर. गुरुजी आणि मुलं वाट पाहत आहेत." ईति फोनमधून बाबा. ""हो हो. आवरलंच. येतो पंधरा मिनिटांत शाळेत." ... बरीचशी उलथापालथ करत शेवटी एकदाचा वह्यांचा आणि कंपास पेटयांचा खोका शोधून काढला. गाडीच्या डीकीत टाकला. चार पाच मिनिटे रीव्हर्स फॉरवर्ड करत एकदाची गाडी वळवली... मोजून पाचव्या मिनिटाला शाळेत... ...

दोर

लेखक निनाव यांनी मंगळवार, 16/08/2011 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली दोर - मोकळे आकाश विसरले पंख - भरारी घेताच क्षणात सारे - घायाळ आघात न आठवे कुणाच कुणी न वाटे आठ्वावेसेही बेधुंध उडायची ताकत का दिशा यावी आड? युगे बदलली - दोर वेगळीच ह्या वेळीस न कळे ह्या जीवास - कदाचित घडावेच ज़णू पुन्हा ते संग्राम!!

मदत हवी आहे - एनआरआय लोन चे रेसिडेंट लोन मधे Conversion

लेखक अंतु बर्वा यांनी मंगळवार, 16/08/2011 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, मी सध्या भारताबाहेर असुन भारतात घर घेण्यासाठी NRI लोन घ्यायचा विचार करत आहे. परंतु काही गोष्टींवर मला खुप धुंडाळुनही काही माहीती मिळत नसल्याने मिपाकरांना शरण आलो आहे. जर NRI लोन घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव (असाईन्मेंट संपल्यामुळे म्हणा किंवा ईतर काही कारणाने) भारतात जावे लागले, तर लोनचे प्रोसेसिंग कसे होते? म्ह्णजे ideal केस मधे ते रेसिडेंट लोन मध्ये बदलले जायला हवे परंतु समजा मला इथे राहुन महीना ४५००० EMI देणं परवडत आहे, पण भारतात परत गेल्यावर जर माझा भारतातला पगार ही अमाऊंट कवर करु शकत नसेल तर काय होईल?

शेवटी जे व्हायचे होते ते झालेच.सरकारचे अभिनंदन!

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 16/08/2011 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी जे व्हायचे होते ते झालेच. अण्णा, अरविंद केजरीवाल्,किरण बेदी पोलिसांच्या तब्यात. आम्ही काहीही करू शकतो! तुम्ही कोण विचारणारे? पैसे,ताकद्,सत्ता यांची मस्ती आणी गुर्मी! शंका होतीच. सरकारला आत्ता जाग आली. अण्णा या दिवसाची मनात तयारी करूनच होते. सरकारचे अभिनंदन!! असेच आंदोलन चिरडीत रहा. भारतीय लोकशाही झिंदाबाद! भारतीय राज्याघटनेचा विजय असो! केंद्र सरकार झिंदाबाद! ममो सिंग सरकार आगे बढो! सर्व देशाचा तुरुंग बनवा. ज्या लोकांना आणिबाणी ची इतिहासाची प्रत्यक्ष माहीती नाही, त्यांना तर ही इतिहासाची साक्ष होण्याची पर्वणीच.

मिसळपाव

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोबरे मृदु प्रेमाचे अन मिर्ची्चा घाव आहे. आयुष्य तरी हे काय, एक मिसळपाव आहे. सोडुनी गेली होती त्या जुन्या पिंपळाखाली तिथेच भेटशील मजला हे मला ठाव आहे धरतीचा कंप होऊनी ते डोंगर मिटुनी गेले सांगावे लागले मजला, इथेच गाव आहे ज्याने प्रदुषित केले त्यालाही तोय दिधले गंगेकडेही कडेही माझ्या आई्चा स्वभाव आहे खोटे पसरते आहे मजला अजुन आस आहे अजुन माझ्या शरिराला माझे्च नाव आहे

प्रिंट मिडिया अण्णाच्या विरोधात का आहे?

लेखक संपत यांनी मंगळवार, 16/08/2011 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिंट मिडिया सध्या सातत्याने अण्णाच्या विरोधी लिखाण करतो आहे (इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तुलनेत). उदाहरणार्थ आजच्या सर्व पेपरमध्ये अण्णाच्या चळवळीवर पातळी सोडून टीका आली आहे(अमेरिकेचे हस्तक, जातीयवादी). ह्याचे कारण माझ्या मते प्रिंट मिडीयाचे राजकारण्यांची असलेले घट्ट आर्थिक संबंध.आपल्याला काय वाटते?

जन गण मन च्या निमित्ताने

लेखक विकास यांनी मंगळवार, 16/08/2011 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताच्या स्वातंत्र्यदीना निमित्त तसेच रविन्द्रनाथ टागोरांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सरकारने पुढाकार घेऊन केलेले आपल्या राष्ट्रगीताच्या पाचही कडव्यांचे सुंदर सादरीकरण ऐकायला मिळाले. आपण जर पाहीले नसेल तर ते अवश्य पहावेत! घटनेप्रमाणे केवळ पहीली दोन कडवीच राष्ट्रगीत आहे.

काय हे मनिष तिवारी-जी!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 15/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारे यांच्यासाख्या ज्येष्ठ आणि त्यागी व्यक्तीला संबोधताना "तुम", तुम्हारा" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलेल्या मनिष तिवारी यांनी पूजनीय अण्णांना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध! ('साहेब'चा 'जी' केला आहे!)