Skip to main content

आठवणी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 26/09/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
वितळवूनी दिशा ह्या सार्‍या आभाळ हृदयात साचे दाटून आल्या घनसावळ्या विश्वास मन टिपून वेचे मेघांना सावरलेल्या त्या पापण्या सावलीच्या आठवणी डोळ्यात फुललेल्या विसरून पाकळ्या क्षणांच्या तळ्याच्या पटलावरती दिसे रांग बदकांची आईच्या मागेपुढती वसे झिंग पिल्लांची मग सरून जाते सारे उरे जीव उदास उदास फाटक्या झोळीत तारे सरे रात ह्या दिसास |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२६/०९/२०११)
काव्यरस

आजचा सवाल-'?'

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे... पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?

चला वेळ आता आली आहे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 26/09/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
चला वेळ आता आली आहे निघायला हवे एवढेच फक्त खरे आहे होणारच होते म्हणजे छातीत दाटून येणे वगैरे वगैरे .. थोडेशे ढग जमा झाले होते डोळ्यामध्ये कधीपण पाउस पडू शकतो फक्त ढगफुटी होऊ नये एवढेच बघत होता तो तिच्या साठी तो घट्ट होता कमी दाबाचां किंवा जास्त दाबाचा पट्टा तयार झाल्यावरती हे असेच होणार कधीपण कोसळणार नि मने चिंब होणार .... निघालीच ती दोघे निरोप घेऊन सकाळचे विमान होते सोडले मुलाने त्याना विमानतळावर आग्रह तसा करणार होता करीत होता पण व्हिसा संपला होता थांबून घेणे हातात नव्हते त्याना सोडणे भाग होते निरोप देताना तो पण दाटून आला होता हे तर होणारच होते ...!! आतमध्ये गेले नि सगळेच
काव्यरस

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज) ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ|| कामं त्याचं हाय सुताराचं आणतो लाकूडं सागाचं करवतीनं कापत बसतो रातीबी तसंच करतो काय करावं समजना झालं कामासाठी नुसता झालाय वेडापीसा लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१|| एकदा पलंग करायला लागला मोजमाप करीत तो बसला मी घरकामात गुंतलेली मला बोलावलं त्यांनं तरीबी जवळ ओढूनं चावट बोलला असातसा ला

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय? भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसूत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी.

पाव्हण्यानं डोळा मारला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 04:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाव्हण्यानं डोळा मारला
ह्या पाव्हण्यानं डोळा मारला ग मला जवळ ये आसं म्हनला ग बाजारात बसले मी ग भाजी विकायला समोर आला अन लागला भाव पुसायला हातात घेवून पाही खालीवर जुडी मेथीची दे आसं म्हनला ग मला जवळ ये आसं म्हनला ग आजूबाजूला जमली गर्दी मला ग त्याची नव्हती वर्दी शुक शुक करतोय, हात हालवतोय समोर उभा तो राह्यला ग मला जवळ ये आसं म्हनला ग नजर माझी गिर्‍हाईकांवर नव्हती काही त्याच्यावर हात घालूनी खिशातमधी नोटा त्यानं काढल्या ग मला जवळ ये आसं म्हनला ग वागणं त्याचं वंगाळ नव्हतं समजलं मला काय खरं ते व्हतं चष्मा न
काव्यरस

भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!

लेखक प्रियाली यांनी रविवार, 25/09/2011 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
सौ.अ.जि. पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा: पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे.

बंगाली तरुणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 25/09/2011 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्य हा कुठल्या जातिचा..धर्माचा वा प्रांताचा मक्ता नाहि असे जरी असले तरी सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे बंगाली तरुणींचा भरणा सर्वात जास्त आहे असेच पुर्वि पासुनच आढळुन येते.... चित्रपट.. माध्यमे.. पत्रकारीता..मॉडेलिंग या मधे बहुसंख्य तरुणी बंगाली आढळतात.. सिनेमा व सिरियल हे क्ष्रेत्र तर अनेक बंगाली सौंदर्य वतिनी गाजवले आहेच..सुचित्रा सेन..अपर्णा सेन..

कामवाली

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 24/09/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा कदाचित, भारतात राहण्यार्‍या भारतीय (आयटी वाईफ्/वर्किंग वाईफ/रिच नॉन वर्किंग वाइफ) गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असेल. आजकाल चांगली कामवाली मिळणे कठीण गोष्ट आहे असे ऐकिवात आहे. ;) गोष्ट तशी जुनी आहे. मी बेंगलोरात नवखाच गेलो होतो तेव्हाची. ऑफिस शहराबाहेर असल्याने जवळपास रहाणे क्रमप्राप्त होते, पगारही कमीच होता. लोटेगोल्लाहली नावाच्या खेड्यासम एरीआ मधे १ बीएचके जागेत रुमपार्टनर हवा आहे म्हणून अ‍ॅड लागली होती हापिसात. भाडं कमी होतं, पंजाबी रुम पार्टनर म्हणजे खाण्या आणि "पिण्याची' आबाळं होणार नाहीत अशी अपेक्षा करुन चांगभलं म्हंटलं. शनिवारी संध्याकाळी रहायला गेलो.