Skip to main content

मनातलं, जनातलं

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 07/10/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
लिहु कि नको? का लिहावं? खरचं? काय लिहाव? का? अनेक प्रश्न. मी का लिहितो? कशासाठी? इथेच का लिहाव? ...... आजचा दिवस असाच गेला... आयुष्य का जगतो.. माहित नाही.. नक्की कुठे जायचय.. काय करायचय. आजकाल मिपावर काय धिंगाणा चाललाय.. खरच चाललाय कि मला वाटतय. हे तर कायमचच.. बदल होत राहतात. कुणीतरी पिंग केलं होतं.. ते काय होतं. कुठे थांबेल? की स्वत:च थांबाव. एक ब्रेक घ्यावा. शांत जागेत जावं. फोटोग्राफी सुरु करावी का? जाउदेत.. आज काय जेवायचं. फेसबुकवर जाउया.. बघुया काय काय नविन आहे. अरे इथे पण काहीच नाही.. एखादा सिनेमा पाहुया. पण कोणता आणि काय मिळणार, ह्म्म्म्म आज एखाद्या मित्राला फोन करुया.

फेस बुक लावणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/10/2011 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
फेस बुक मधे मी खात काढलय,बघा ना राया माझी मैत्रीची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट ना राया.. रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा .. तुमच्या खात्यावर पोरिंची गर्दी लई भारी माधुरी,प्रिति,प्रियंकाची त~हा लई नारी मला बी तुमच्या मंदी घ्या ना राया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा .. अल्बम मधे म्या छान छान फोट बी लावलय. नथ घालुन, नऊवारी नेसुन छानशी सजलेय तुमची माधुरी,प्रिति,प्रियंका जळेल राया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा .. रोज रोज स्टेटस मी अप डेट करीन छान सुंदर फोटु मी अप लोड करीन बघुन सार ,पारण फिटेल हो राया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

शिस्तभंग - कारवाई

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 07/10/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांत मिसळपाववर अत्यंत घाण प्रकारे लिखाण झालेलं आहे. मिसळपाववर अश्या प्रकारे लेखन केल्या जाऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. तरी सुध्दा काही लोकांनी स्वत:ला आवर घातला नाही. एखाद्या विषयावर कुणी संवेदनशील होऊ शकतं हे मान्य मात्र त्यासाठी मिपावरील स्त्री सदस्यांना लाजीरवाणे लेखन कुणी करेल तर ते कुठल्याही सबबीखाली वैध मानता येणार नाही. सबब अश्या प्रकारे खरड लिहीणार्‍या स्त्री सदस्यावर १५ दिवसांची बंदी घालण्यात येत आहे. अश्या प्रकारचे लेखन हे प्रतिक्रियात्मक आहे असे प्रथमदर्शनी लक्षात येते.

सीमोल्लंघन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 07/10/2011 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा! रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं. पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.

काही श्लोक

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 07/10/2011 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे काही वाचतो, पहातो त्याचे आपल्या मनःपटलावर विचारतरंग उमटत असतात. आणि हे बरेवाईट विचारतरंग मूर्त स्वरुपात घटना बनून आपल्या आयुष्यात येतात. मला याचा इतक्यादा अनुभव आला आहे की योगायोग म्हणवत नाही. आतापर्यंत देवाची भक्ती करताना मी जे काही मंत्र म्हटले आहेत त्यामध्ये ढोबळमानाने मला पुढील प्रकार आढळले - (१) देवतेची स्तुती, (२) रक्षण करणारे कवच, (३) सुप्रभात, (४) धूप, शेज आदि आरती, (५)पाळणा.

आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 07/10/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय. १. आय आय टी होली काऊ आहे काय? नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला. २. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का? डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे.

अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 07/10/2011 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्‍या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.