Skip to main content

ही जिवाला आस आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 14/12/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707 जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे. चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्या

भरारी

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 14/12/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस

श्री. तुकोबारायांचे हस्ताक्षर

लेखक शरद यांनी बुधवार, 14/12/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.तुकोबारायांचे हस्ताक्षर साठेक वर्षांपूर्वी श्री. परांजपे यांनी देहूच्या श्री. तुकारामांच्या वंशजांकडून " भिजलेल्या वहीचे अभंग " नावाचे सातएकशे अभंग मिळवून ते प्रसिद्ध केले होते. आज ते दुर्मीळ असल्याने " वरदा प्रकाशन " पुनर्मुद्रित करत आहे.

अर्घ्य

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 14/12/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात मागे ठेवून जातात एक काळपट तवंग आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली. त्याच किना-यावर त्याच लहरींना आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.
काव्यरस

झाड

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/12/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ|| गेली कित्येक उन्हाळे सावली देत आहे उभा; कोरडे ठेवीले वाटसरूंस पावसाळ्यात सुध्दा; हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१|| खोड जुन वाढले फांद्या जुन्या झाल्या; त्या मुळी न मातीत नव्याने रूजल्या; नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२|| कधी गळते दुजे पान पहिल्यासारखे; मातीत मिळूनी होते ते मातीसारखे; त्या पानांसारखे माझेही पान होई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३|| - पाषा

ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 13/12/2011 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :) मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद! १.

भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे काय?

लेखक प्रदीप यांनी मंगळवार, 13/12/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते. मूळ लेखाचा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो. http://www.reuters.com/article/2011/12/05/us-economy-india-funding-idUS… कमीकमी होणारे उत्पादन, व हाताबाहेर जाणारी महागाई ह्यांमुळे भारताच्या आर्थिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा आक्रमकपणे इंटरेस्ट रेट्स वाढवूनही महागाई कमी होण्याची लक्षणे नाहीत).

द्वंद्व.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/12/2011 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
द्वंद्व स्वर्गात शंकर-पार्वती आपल्या आसनावर विराजमान असताना खाली पृथ्वीवर पहात होते आणि पार्वतीच्या नजरेस एखाद गरीब ब्राह्मण पडतो आणि मग पुढे ती गोष्ट चालू होते.... अशा अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. वरून बघतांना त्यांना आता ही शहरे कशी दिसत असतील आणि त्यात त्यांना माणसे दिसत असतील का ? असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच उभा रहातो. मला तर वाटते त्यांना ही शहरे एखाद्या मुंग्यांच्या वारूळासारख्या दिसत असतील. सध्या जसा मुंग्यांच्या वारूळाचा अभ्यास करण्यासाठी काचेच्या पेट्या असतात त्याप्रमाणे तेही खाली असलेल्या या मुग्यांच्या वारूळाचा अभ्यास करत असतील का ?

युलीप बाबत काय करावे? तुमच्या फायद्यासाठी अवश्य वाचा व प्रतिसाद द्या.

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 13/12/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
युलीप बाबत काय करावे? वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार करावी, जर शेअर बाजाराची जोखीम स्विकारण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत गुंतवणूक करावी जर कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत गुंतवणूक करावी व जर अजिबात जोखीम स्विकारावयाची नसेल तर बँक/पोष्टाच्या ठेवी, पीपीएफ आदी सुरक्षीत गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी.

भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 13/12/2011 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर १० वर्षांपूर्वी आज भारताच्या संसदभवनावर दहशतवाद्यांनी अतिभयंकर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रतिकार केला आणि केवळ म्हणून ते आत घुसले नाहीत आणि आपण मोठ्या संकटातून वाचलो. त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली. इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा. पुण्याचे वटवाघूळ