Skip to main content

तुम्ही पी एम बनणारच ..

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/01/2012 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा आमचे युवराज वदून गेलेत .......त्याला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार खरेच..... चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा, पैसे, दारू वाटून निवडून येणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही गावात अमंळ लोड शेडींग कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापा
काव्यरस

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/01/2012 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले तो: ओठ गुलाबी काय नकळत बोलले ती: अं हं तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले तो: संध्या आज का फुलूनी आली रंग तांबडे सोनेरी ल्याली ती: दिवसा रातीच्या मिलनवेळी संध्या असली फुलूनी आली लाजलाजूनी बघ झाली वेडी त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले तो: पाण्यावरचे तरंग का हालती डुलती तरंगातूनी काय कोणता संदेश वदती ती: शांत पाण्याला जीवन देण्या तरंग असले आले जन्मा जळात ते जवळी राहून लडीवाळ काही गोड गुपीत बोलले तो: फुले माळलीस तू या वेणी गंध तयांचा गेला रानी ती: भ्रमर झाला बघ तो वेडा जवळी आला रस घेण्या चुंबूनी भ्रमर कुणी का त
काव्यरस

मुलाखत

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 08/01/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
माननिय शिवसेना प्रमुखांची मुलाखत वाचताना या हे मुद्दे लक्ष वेधुन घेतात .... प्रश्णास उत्तर देताना ते म्हणतात... दूषित? दूषित हवेमुळे सगळेच त्रस्त आहेत. - इतर सगळे त्रस्त आहेत. पण मी त्रस्त नाही, तर व्यस्त आहे. या सगळ्यांचं काय होणार? शेवट काय होणार? इतका हा देश नासवलाय सगळ्यांनी. विशेष करून कॉंग्रेसने. भयानक केलंय. म्हणजे त्याला काही अर्थच नाही. म्हणून मी नेहमीच सांगत असतो की, आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल. मग हे सारं निस्तरणार कोण? हा प्रश्‍न तुमच्यासमोर येईल. - असं का वाटतं? - का वाटतं म्हणजे? तुम्हीच पहा काय चाललंय.

उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार

लेखक पियुशा यांनी रविवार, 08/01/2012 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार सांबर साहित्य : तुरीची डाळ १ वाटी. २ छोटी वांगी .( काप ) १ बटाटा ( काप ) १ शेवग्याची शेंग .( तुकडे करून ) २ कांदे चिरून २ टोमॅटो चिरून चिंचेचा कोळ १ चमचा.

(चितळेबंधू सांगतायत बाकरवडीच्या युक्त्या )

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 08/01/2012 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या मित्र हो, चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी अनेकवेळा तुम्ही चितळेबंधूंकडे मिठाई आणायला जाता, अर्थात दुपारी १ ते ४ ही वेळ टाळून कारण ही वेळ त्यांच्या झोपेची असते. सणांच्या दिवशी तुम्ही तर अधिकच गर्दी करता, २०११ च्या दिवाळीत मात्र चितळ्यांकडे लांबच लांब रांग लागली होती. पार पंचक्रोशीतून लोक गर्दी करत होते.

ईज मोनोगॅमी अ मिथ?

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 08/01/2012 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मराठी शिर्षक सुचले नाही म्हणून ईंग्रजीमधेच लिहिले त्याबद्दल माफी असावी. काल एका क्लिष्ट विषयावर चर्चा पाहिली आणि त्याबददल इथे लिहावसं, चर्चा करावीशी वाटली. सध्या हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि केवळ उच्चभ्रू/अतिश्रिमंत समाजाशी निगडीत न रहाता सर्वसामान्यांच्या घरात देखील घुसू पाह्तो आहे. हा मुद्दा विवाहित, अविवाहित लग्नाळू मुला-मुलींचे पालक या सर्वांनाच लागू होतो. आजकाल घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपण पहातोच आहे. त्याचप्रमाणे लग्न न करणार्‍यांची संख्या देखील झपाट्याने वाढते आहे.