Skip to main content

चिवचिवाट

लेखक पारा यांनी शुक्रवार, 17/02/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा म्हणजे संपादकांना एक प्रश्न म्हणा किंवा एक नवीन feature म्हणा. माझ्या मनात असे होते कि मिसळपावचं एक twitter खाते बनवता येईल काय ? नवीन कुठलेही लेखन झाले की आपसूक एक tweet केला जाईल ज्यात त्या लेखाचा दुवा असेल. कशी वाटते कल्पना? ता. क. : असे आधीच काही असेल किंवा असा काही विचार आधी झाला असेल तर माफ करा अ.(अधिक) ता. क. : कुठल्या विषयांतर्गत हे मांडावे न कळल्यामुळे बरेच विषय निवडले आहेत

पेचप्रसंग

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 17/02/2012 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्च नेत्या आपण इटलीहून आयात केल्या. तर नुकतेच आलेल्या बातमीनुसार ह्या थोरल्या महाराणीसरकारच्या म्हाईरच्या काही लोकांनी भार्ताच्या काही मच्छीमार बांधवांचा गोळ्या घालून बळी घेतला. कारण की ते चाच्यांसारखे दिसत होते (म्हंजी चाचा न्हेरू वा थत्ते चाचा नसून सोमालियातील चाचे). http://timesofindia.indiatimes.com/india/Killing-of-fishermen-Italian-n… महाराणीसाहेबांनी वज्रचुडेमुंडित असल्यापासून ती.गं.भा.

क्रोशे - कॉलर

लेखक जयवी यांनी गुरुवार, 16/02/2012 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही सोलोमन्स नॉट किंवा रुद्र गाठ ने तयार केलेली कॉलर आणि त्यावर गुलाबाचं फुल Crochet Collar" width="480" height="360" alt="" />

" ....आभास.... "

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 16/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ... हळुवार येशील आयुष्यात ...अस कधी वाटलच नव्हत .. मनाच्याही मनातल सांगशील असही कधी वाटल नव्हत .. स्पर्शाची भाषा ..सहवासाच जग ..मला कधी अनुभवायला मिळेल असही कधी वाटल नव्हत ... पण तू आलास आयुष्यात असाच अगदी हळुवार ..पावलांचा आवाजही न करता ..... बर्याच दा मागे वळून पाहिलं ..पण तू कधी दिसायचास ..तर कधी ओझरता तुझा भास व्हायचा .. मला कळायचच नाही ..मला नक्की कशाचा भास होतोय ..तुझा कि तुझ्या श्वासांचा .. सतत चाहूल लागायची कि चालताना बोलताना .तू माझ्या जवळ आहेस .. तुझ्या पावलांवर माझ पावूल पडतंय ..तुझ्या चेहेर्यावर माझी सावली पडतेय ..तुझ्या पापण्यात माझी आठवण साठ्तेय .... पण खरच तुझा म

कवितेचा कीड़ा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/02/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो करितो यमकांची जुळवा-जुळवी ताबा तोंडाचा घेतो फिरतो सैर-भैर तो. कानात बोळे घालूनी भयक्रांत बायको वावरते घरी. पोरे ही म्हणती पपा होतो अभ्यासाचा हर्जा. हातात चोपड़ी पाहुनी मित्रही पळती दूर किती पाहुण्याची लाट आटली निस्तब्ध शांती घरी पसरली. आता रात्रीच्या एकांती बैसुनी माझी मीच ऐकतो कविता. आप्त ही म्हणती 'वैनी' गेले हो पार कामातुनी आता. दाखवाहो 'ह्याना' एकदा नेवून वेड्यांच्या इस्पिताळी. वाया गेला एक 'माणूस' लागून कवितेच्या नादी.

करणी / भानामती खरे कि खोटे

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 16/02/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मि. पा वर करणी भानामती हे खरे कि खोटे ह्या वर बराच गोंधळ उडाला होता, डोळ्यामध्ये खडे घालणारी मुलगी, आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्याच्या मध्ये बरीच खडाजंगी चालु होती. ह्या सर्व प्रकारामध्ये मि माझा एक - दोन अनुभव ऐकवू इच्छितो. मी साधारणतः ५-६ मध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या मावशी कडे शिकायला होतो. त्यावेळेस माझ्या मावशीचे मिस्टर अचानक आजारी पडले. हा हा म्हणता आजार बळावत गेला आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खीळले, हा डॉक्टर तो वैद्य सर्व उपाय करून झाले.

जिलेबी ....

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 16/02/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
जिलेबी..... चला मि.पा.

गोळाबेरीज

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 16/02/2012 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोळाबेरीज पु लं च्या जीवनावर /व्यक्तिरेखांवर आधारीत काहीतरी कलाकॄती (नाट्य/चित्रपट) बनवण्याचा आणखी एक फसलेला प्रयत्न. पु लं चे शब्द इतके चपखल आहेत की एकाही शब्दाला इकडचे तिकडे करता येण शक्य नसत. आणि पटकथेसाठी असं थोडसं करावं लागलं की ऐकताना खटकतं. आणि त्याहून कठिण म्हणजे त्याच्यासारखा आवाज काढणे. अलूरकर/ दूरदर्शन यांच्यामुळे पु. लं चा आवाज इतका डोक्यात बसालाय की दुसर् या कुणाच्याही तोंडून तो ऐकवत नाही. अगदी दिलीप प्रभावळकर सारख्या दिग्ग्जालाही अन्तु बर्व्याच्या जवळपासदेखिल फिरकता आलं नाही.

वकिली सल्ला हवा आहे..

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 16/02/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो नमस्कार, येथे मिपावर कुणी सभासद वकील वा कायदेविषयक जाणकार असल्यास आम्हाला खालील गोष्टीकरता ते काही सल्ला देऊ शकतील, वा त्या बाबत येथे समग्र चर्चा करू शकतील अशी अपेक्षा आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे, परंतु आमच्या अलिकडेच लक्षात आली म्हणून हा चर्चाप्रस्ताव... चित्रपट अभिनेते युसुफ खान, ऊर्फ दिलीपकुमार यांना १९९७ साली पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्कार - 'निशान ए इम्तियाज' हा दिला गेला असे समजते. परंतु आमच्या माहितीप्रमाणे दिलीपकुमार हे भारतीय नागरीक आहेत व त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १८(२) चा भंग केला आहे.

एकल घाट

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 16/02/2012 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
चालते आठवण उतरुन एकल घाट क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ पलकांतिल गाठी रमल फुलांची माला शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट ............................अज्ञात
काव्यरस