Skip to main content

सावधान ! मसाला आला आहे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 21/04/2012 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
वळू, विहीर, देऊळ अशा अति उत्कृष्ट कलाकृतींनंतर गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आले आहेत चित्रपट 'मसाला'. वळू, विहीर, देऊळ या चित्रपटांनी मराठी रसिकांना मनमुराद आनंद दिला आहे. विशेषतः गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी , अमृता सुभाष या टीमचे कौतुक यासाठी की त्यांनी मराठीमधे उत्तम अशा ग्रामीण चित्राची मालिका पुन्हा सुरू केली. त्यांची अचाट गुणवत्ता पाहूनच कधी अमिताभ बच्चन कधी सुभाष घई असे लोक उमेश गिरीशच्या मागे उभे राहीले. असो जाता जाता सांगतो याचा दिग्दर्शक आहे संदेश कुलकर्णी. 'सखाराम बाइंडर' चे दिग्दर्शन 'माकडाच्या हाती शांपेन' मधील अप्रतिम रोल संदेशच्या नावावर आहे . त्

दुधपोहे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/04/2012 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे. तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही. झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे. (लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय!

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 20/04/2012 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे.

पोळीचा लाडू

लेखक पूनम ब यांनी शुक्रवार, 20/04/2012 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य ४-५ पोळ्या (शिळ्या पोळ्या) १/२ कप खिसलेला गुळ २ टेबल स्पून तूप ३ टेबल स्पून दूध ५-६ बदाम १/२ टीस्पून वेलची पूड पोळ्या चे तुकडे करून घ्यावे आणि ते तव्या वर कमी आचेवर भाजून घ्यावे किंवा ओव्हन मध्ये २५० डिग्री फ वरती २० मिनिट बेक करावे आणि थंड

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 20/04/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.

एक विनंती

लेखक राजो यांनी शुक्रवार, 20/04/2012 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे. इथले साहित्य खरंच अत्यंत वाचनीय असते. काही लेखक आपले लेख एकापेक्षा अधिक भागांमध्ये प्रकाशित करतात. हे भाग प्रकाशित होण्यास काही दिवसांचा/आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. नवीन वाचकांना आधीचे भाग शोधण्यासाठी सर्व साहित्य धुंडाळावे लागते. (इथे हे खेदाने नमूद करू इच्छितो कि मिपाचे सर्च अतिशय unreliable आहे) काही लेखक लेखाच्या नवीन भागामध्ये आधीच्या सर्व भागांचे दुवे देतातही (त्यासाठी त्यांना दुवा देतो :) ) तर नवीन लेख प्रकाशित करण्याआधी अशी काही सोय करण्यात येउ शकते का? (i.e.

पर्यटन आणि मी.

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 20/04/2012 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, मी विनोद बाणखेले , राहणार मंचर ,तालुका -आंबेगाव, जिल्हा- पुणे, सध्या सायबर कॅफे चालवतोय, कामाच्या व्यापामुळे गेले दोन महिने मी माझ्या कुटुंबियांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही , मंचरच्या जवळ भरपूर ठिकाणे आहेत जसे भीमाशंकर , आहुपे , भोरगिरी, ओझर ,लेण्याद्री, शिवनेरी ,चावंड, जीवधन ,नाणेघाट,दार्याघाट, माणिकडोह, निमगिरी, हडसर,नारायणगड,माळशेज घाट , हरिश्चंद्रगड ,खोडद ,गिरवली, पिंपळगाव ,मोराची चिंचोली, पारुंढे , आणे,चास कमान एक न दोन अनेक. माझ्या परिवाराला मी सोबत नसताना अगदी काळजी काट्याने आपल्या घरातील लोक असल्या सारखे सांभाळून व्यवस्थित मा

स्पंदन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/04/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
एकांत; क्षणाच्या भवती क्षण; उभा जणू की सवती द्वय पाश; लटकती नाती मन अस्थिर झोक्यावरती वाटे जग सारे हलते पण तिथेच स्थित ते असते फांदीवर गोत ऋणांचे मातीवर पाउल नसते पेटत्या अजून मशाली वार्‍यावर प्रतिमा झुलते कधि दूर दूरचे दिसते हृदयी स्पंदन काहुरते ..........................अज्ञात
काव्यरस

रोज म रे त्याला कोण रडे

लेखक लीलाधर यांनी शुक्रवार, 20/04/2012 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
मध्य रेल्वेवर झालेल्या फायर ब्लॉकची घटना ताजी असतांनाच काल एक गंभीर घटना घडून आली. बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी प्रवाशांनी खच्चून भरली होती. आणि नाहूर, भांडुप स्थानकांदरम्यान सिग्नलच्या खांबाला जी शिडी होती त्यावर मेंटेनन्ससाटी उभे राहण्याचा जो भाग होता तो थोडा झुकलेला होता त्यामुळे दाराबाहेर किंवा दारावर जे प्रवासी उभे राहून प्रवास करत होते त्यांची ह्या भागाला धडक लागून अपघात घडला आणि त्यातल्या तीन जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. सिग्नल यंत्रणेत होणार्र्या वारंवार बिघाडामुळे प्रवासी संतप्त तर आहेतच शिवाय अपघातही घडून येत आहेत.