Skip to main content

मराठी संस्थळांवर व्यनी किती सुरक्षित? (रिंगिंग द बेल)

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/06/2012 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज उपक्रम या संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. सुरवातीपासून सुरवात करतो ज्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात यावे १. दिनांक 06/22/2012 रोजी खबरदार या आयडीने इथे आईची जात हा चर्चा विषय सुरू केला.

आमच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 27/06/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमतः , "मिसळलेला काव्यपेमी" ह्यांचा (http://www.misalpav.com/node/22081) लेख वाचला.आज ते ज्या काळातून जात आहेत आणि त्यांना जी अडचण आली, जवळजवळ तशीच अडचण आम्हाला (मी आणि माझी बायको) आली होती.आम्ही त्यातून कसा मार्ग काढला आणि त्याचे काय फायदे झाले , ते अनूभव लिहीत आहे. हा कूठलाही सल्ला नाही आहे किंवा शिफारश पण करत नाही आहे आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे शाळेने काय करावे किंवा पालक सभा घ्यावी का नाही, ह्याचा पण मी उहापोह करत नाही आहे.कुठल्याही , कंपू बरोबर भांडण करू नये.शेवटी, इतर लोक पळून जातात आणि आपण मात्र भरडले जातो.शाळा असो, की कू

गंधार घेतले तू

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 27/06/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या
काव्यरस

फेसबुकवर ज्ञानाचं थिल्लरीकरण!

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 27/06/2012 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकवरची संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी आहे. कुठलेही गंभीर प्रश्न इथे हाताळले जात नाहीत. इथल्या सुमारे ९८ टक्के लोकांना चांगलं वाचावं , संगीताचा आस्वाद घ्यावा , चर्चा करावी असे वाटत नाही. इथे ज्ञानाचं थिल्लरीकरण चालतं , अशा शब्दांत प्रख्यात आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी फेसबुक संस्कृतीवर टीका केली आहे. अधिक माहिती - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14420186.cms १) वरील आक्षेप तसेच सदर लेखात आलेले मुद्दे तुम्हाला मान्य आहेत का? असल्यास तुम्ही काय उपाय सुचवता?

वाडा

लेखक पेशवा यांनी बुधवार, 27/06/2012 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्यांच्या दारावरील सायकलींच्या ढिगासारखे एकात एक गुंतून पडलेले विचार घेऊन बसलो आहे... अर्गोनोमिक साहित्य लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या 'मान द्या (नाहीतर कापून घेईन)' अशा जाड अक्षरांनी पार वाकलेल्या नवी कल्पना निसर्गत:च वस्त्रविरहित की बघितल्यावर विसरता विसरत नाही शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फॉन्ट अशावेळी कधीही सापडत नाही... वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान डोक्यात उघडून बसलो आहे आजची जाहिरात - ' लाज वापरून झाली असेल तर आणून द्या टॅक्स मध्ये सूट किंवा लंगोटी तरी मिळवा ' हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला तुम्ही वापरलेलं हसणं; पुन्हा वापरलंत? जुन्या वाड्याच्या अंगणांसारखं का

असा आमचा गाव

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 27/06/2012 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ्पाव मंड्ळी, नमस्कार आमच्या गावाला यायचे का ? आता पुण्यातल्या काही गावांची नावे पहा - पण , पण हसु नका १)हडपसर - काय पसर ?

किंकर सेन्सेई

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/06/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक लोकांशी आपल्या ओळखी होतात, भेटीगाठी होतात. त्यापैकी काही खास व्यक्तींशी झालेली भेट ही आपल्या मागल्या जन्माच्या पुण्यसंचितामुळेच झाल्याची जाणीव होते. तर काही जणांशी आपली भेट होणे किंबहुना 'गाठ' पडणे हा दैवी संकेत वा ईश्वरी संकेत असतो. त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. अंधारात चाचपडताना अचानक त्यांच्या रूपाने एक प्रकाशाची तिरीप येते आणि अंधार विरून आयुष्य एका वेगळ्याच प्रकारे दृष्टिगोचर होते.