प्रथमतः , "मिसळलेला काव्यपेमी" ह्यांचा (http://www.misalpav.com/node/22081) लेख वाचला.आज ते ज्या काळातून जात आहेत आणि त्यांना जी अडचण आली, जवळजवळ तशीच अडचण आम्हाला (मी आणि माझी बायको) आली होती.आम्ही त्यातून कसा मार्ग काढला आणि त्याचे काय फायदे झाले , ते अनूभव लिहीत आहे.
हा कूठलाही सल्ला नाही आहे किंवा शिफारश पण करत नाही आहे आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे शाळेने काय करावे किंवा पालक सभा घ्यावी का नाही, ह्याचा पण मी उहापोह करत नाही आहे.कुठल्याही , कंपू बरोबर भांडण करू नये.शेवटी, इतर लोक पळून जातात आणि आपण मात्र भरडले जातो.शाळा असो, की कूठलेही, आंदोलन..माझे मार्ग, हे शक्यतो, कूणालाही त्रास न देता ,मुद्दाम वाकड्यात न शिरता, आपले कसे भले होईल, असेच असतात.
२००० सालातील गोष्ट आहे.त्यावेळी मी, घरडा केमिकल्स, लोटे परशूराम इथे काम करत होतो.कं.च्या कॉलनीमध्ये आम्हाला घर दिले होते.मुलगा , ज्यु.के.जी.मध्ये होता.शाळा होती, इंग्रजी माध्यमाची (परशूराम, लोटे)..एक दिवस त्यांनी पालकांची सभा बोलावली. मार्च २०००.
सभेत त्यांनी सांगातले, की पूढील वर्षांपासुन , फी वाढ करणार आहेत.आज जी ६०रु. मासिक फी आहे, ती ३०० रु. होणार.
पगार जेमतेम ४००० त्यात हा खर्च, परत दूसर्या मूलाला पण त्याच शाळेत घालायचे. म्हणजे ६०० रु. गेले. अधिक इतर खर्च आहेतच. म्हणजे पगारातील, २५% रक्कम इथेच खर्च होणार. शिवाय शाळेतील इतर नियम पण जाचकच होते.डबा असाच हवा आणि तसाच हवा.
ही , एव्हढी , फी वाढ का? तर गेले ४/५ वर्ष शाळा तोटा सहन करत आहे आणि आता तो तोटा सहन करणे शाळेला शक्य होणार नाही म्हणून.मला काही ते लॉजीक पटले नाही.मला पगार कमी आहे, म्हणून मी काही , दरवडे घालणार नाही.उत्पनाचे दूसरे साधन शोधीन किंवा दूसरी चांगल्या पगाराची नौकरी शोधीन.
त्याच सुमारास, लोकसत्तेमध्ये, एक लेखमाला (वर्षभर) येत होती.शैक्षणिक माध्यम कूठले हवे? इंग्रजी की मराठी? बर्याच शैक्षणिक तज्ञांनी त्यात भाग घेतला.सर्वात शेवटी त्यात ह्या लेखमालेचा "गोषवारा" दिला की,
७वी पर्यंत मराठी आणि ८वी पासुन , सेमी इंग्रजी, हा सर्वोत्तम पर्याय आहे.
एप्रिल मध्ये, मुलाची (वय वर्षे ५) सायको टेस्ट करून घेतली.त्याचा कल, मराठी भाषेतून शिक्षणाकडे दिसून आला.माझे सगळे नातेवाइक , मराठी माध्यमातूनच शिकले आणि ते सगळेच मोठ्या मोठ्या पोस्ट वर आहेत.माझे एक काका , शिक्षक आहेत , त्यांच्याशी विचार-मिनिमय केला.त्यांनी पण सेमी-इंग्रजी उत्तम , हाच निर्णय दिला.
चला... एक ठरले की ७वी पर्यंत मूलाला मराठी शाळेत घालायचे आणि ८ वी ते १० वी सेमी इंग्रजी.
आता शाळा शोधणे आले. २/३ शाळा बघितल्या.चिपळूणची एक शाळा होती (नांव विसरलो, १०० वर्षे जूनी शाळा आहे, तिथे ही सगळी सोय होती, पण डोनेशन बरेच जास्त होते)मग ती रद्द केली आणि शाळा ठरली... पेढे-परशूराम.. मला स्वत:ला ही शाळा आवडली, मस्त कौलारू शाळा होती आणि शिक्षक एकदम टिपि़कल. मूलाला शाळेत घेवून गेलो.(हो आमच्याकडे , मुलेच शाळा निवडतात)त्याला पण ती शाळा आवडली.आपणच ही शाळा निवडली आणि बाबांनी पण , आपले एकले, ह्या गोष्टीचा त्यांच्या मनावर सकारात्मक परीणाम झाला.शेवटी, शाळेत त्यांनाच जायचे असते.
ते त्यांचे पहिले लग्नच असते म्हणा ना...आयुष्यातील बर्या-वाईट गोष्टींचा पाया "शाळाच" पक्का करते, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.
त्या शाळेचे मला खूप फायदे झाले..
१. शाळेत, खिचडी मिळायची, सरकार तर्फे (डब्याचा त्रास वाचला आणि मुलाला ती आवडायची, तो २/३ प्लेट्स खायचा)
डबा करायला लागत नाही म्हणून बायको खूष.बाहेरचे खायला मिळते, म्हणून मुलगा खूष आणि पैसे वाचतात ना, म्हणून अस्मादिक पण खूष.असा सगळा राजी-खूषीचा मामला सूरू झाल. तो अजूनही सूरू आहे.नंतर तेच पैसे मुलांच्याच पूढील शिक्षणाला कामी आले.
२. फी कमी (जेमतेम १०रु. मासिक फी होती.. ३००रु वार्षिक खर्च होता...)
३. शाळेतील शिक्षक आम्हाला मान देत होते.(माझी बायको, त्या शाळेत पालक-प्रतिनिधी म्हणून दर वर्षी होती..मूख्याधिपिका बाईंनी. तसा अलिखित नियमच केला होता म्हणाना, कारण घरडा कं.च्या स्टाफ मधून , फक्त माझीच मूले, त्या शाळेत जात होती.)
४. इंग्रजी मूळाक्षरे शिकायला , मुलाला ६ महिने लागले , आणि मराठी मूळाक्षरे शिकायला फक्त १ महिना (आम्ही केलेल्या सायको टेस्टचा फायदा).पूढील एका महिन्यात त्याने जोडाक्षरे शिकली आणि तो वर्गाच्या बरोबर आला.
५.मूलांनी शाळी भरपूर एंजॉय केली. अगदी भर परिक्षेच्या काळात, क्रिकेट खेळणे, कैर्या पाडायला जंगलात जाणे. (त्या कॉलनीच्या आसपास जरा बर्यापैकी जंगल आहे.) उन्हात भटकणे इ. कॉलनीतील इतर मूले अभ्यास करत असतांना , हे दोघेही उनाडक्या करत असत.माझ्या कडून फूल्ल परवानगी होती. काय वाट्टेल ते करा. हे दिवस परत येणार नाहीत.अभ्यासाचे दडपण घेण्यापेक्षा, गोडी लागलेली उत्तम.मात्रुभाषा, माध्यमातील मूले क्वचितच नापास होतात.
६. सगळे विषय मराठीत असल्याने, आम्हाला मूलांचा अभ्यास घ्यावा लागला नाही.आमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचले.इतर क्लासेस न लावल्याने पैसे पण वाचले.आम्ही दोघांनीही (मी आणि माझी बायको) आमची वैयक्तीक उन्नती करून घेतली.तिने "जर्मन भाषेची" पाया भरणी केली. तर मी शेतीचे आवश्यक ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला.मी कॅरम खेळणे, चिकटवह्या तयार करणे.मनसोक्त वाचन करणे इ. व्यसने केली.
७. योग्य ती वेळ येताच ,पेढे-परशूराम शाळेला , सेमी इंग्रजी चालू करावे यासाठी प्रयत्न केले. पालक सभा बोलावली, इतरही काही प्रयत्न केले.पण... ते अपयशी ठरल्यावर , जास्त मनाला लावून न घेता, डोंबिवलीला, टिळकनगर शाळेत, मूलांनी प्रवेश घेतला.शाळा सरकारी असल्याने, प्रवेश सहज आणि डोनेशन न देता मिळाला.
८. दोन्ही शाळेत, मध्यमवर्गीय मूले असल्याने, वॉटर बॅग, फॅन्सी दप्तरे इ. अनावश्यक खर्च वाचला.टिळक नगर शाळेत तर दप्तर पण मिळायचे.दोघेही, आज देखील, शीत-पेयाची रिकामी बाटली वापरतात.
९. माझा स्वतःचा , शाळेत व्यवहारोपयोगी शिक्षण मिळते, संस्कार चांगले होतात वगैरे (माझ्या द्रुष्टीने भाकड) कथेवर विश्वास नाही.(दहावीत ८५% मिळवलेला मित्र , व्ही.जे.टी.आय. ला गेला. डिप्लोमा केला, आणि ऑपरेटर म्हणून नौकरी करायला लागला.तर दूसरा ५०% मिळवून , जेमतेम बी.कॉम. झाला आणि मग सी.ए. झाला....कोणाला कधी , त्यांचे ध्येय मिळेल, काही सांगता येत नाही.)
१०. कधीही माझ्या मूलांची इतर मूलांबरोबर तूलना केली नाही. इतरांना किती गूण मिळाले त्याच्याशी मला किंवा माझ्या मूलांना काय करायचे आहे? त्यांची कुवत सध्या ७०% टक्यांची आहे ना? आणि ते तो ग्राफ मेंटेन करत आहेत ना? मग झाले.योग्य वेळी घेतील झेप..... १००ला फक्त ३०च कमी आहेत, हे जेंव्हा त्यांनाच समजेल, त्या दिवशी ते स्वतः होवून प्रयत्न करतील आणि त्या वेळेपर्यंत वाट बघायची माझी आणि माझ्या बायकोची तयारी आहे.
११. दोन्ही मूलांनी स्वप्रयत्नाने, सेमी इंग्रजी मिळवले.(शाळेत लिमिटेड जागा आहेत)
१२. दोन्ही मूले, शाळेत जातांना खूष असायची.शाळा म्हणजेच मस्ती आणि धूडगूस असेच त्यांना वाटते आणि मी पण ती समजूत दूर करायचा प्रयत्न केला नाही.
आज मोठा मूलगा, दहावी नंतर, डिप्लोमा करत आहे.सध्या तो तिसर्या सेमीस्टरला आहे..पहिल्या दोन्ही सेमिस्टरला, पहिल्या वर्गात पास झाला....दूसर्या सेमीस्टरच्या परीक्षे नंतर स्वतः होवून सुट्टीत, C आणि C++ चा क्लास लावला.
तर धाकटा मूलगा , ९वीत असून , शाळा एंजॉय करत आहे.शाळेत त्याला आवडेल त्या ऊपक्रमात भाग घेतो आणि हसत -खेळत शाळेत जातो.
दोन्ही मूलांची गाडी, प्रचंड स्पीड मध्ये नसली तरी, रूळावरून घसरलेली नाही.... माझी मूले, मी घरी गेलो की, माझ्या बरोबर गप्पा मारतात, माझी चेष्टा-मस्करी करतात आणि रोजचा घरचा अभ्यास स्वतः , कूणीही मागे न लागता पूर्ण करतात.
....शेवटी मुलांच्या मार्कात समाधान मानावे, की त्यांच्या निकोप वाढीत आणि आपण घरी गेल्या नंतर मूले अभ्यास करतात, की स्वतः होवून हा ज्याचा-त्याचा प्रश्न...
वाचने
20103
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !!
नाही हो... यश अजून खूप दुर आहे...
In reply to मस्त !! by नाना चेंगट
+१
In reply to मस्त !! by नाना चेंगट
> कधी कधी बापाला इच्छा असते
वाचून खूपच बरं वाटलं! तुम्हां
+१
In reply to वाचून खूपच बरं वाटलं! तुम्हां by दशानन
लेख मनापासुन आवडला. तुम्ही
अभिनंदन!
आदर, आभार, अभीनंदन!
लेखन आवडले. आपण मुलांचे मूलपण
सह्ही !!!
+१
In reply to सह्ही !!! by अर्धवटराव
बैलाला 'हो'?
भो!
In reply to बैलाला 'हो'? by श्रीरंग_जोशी
अनुभव आवडला!
>>>सि.बि.एस.ई वा
In reply to अनुभव आवडला! by सुधीर
:)
In reply to >>>सि.बि.एस.ई वा by प्यारे१
चांगला लेख.
उत्तम लेख आणि तुमच्या संपुर्ण
मस्त .....
प्रामाणिक, डाउन टु अर्थ
उत्तम
वा!
अभिनंदन
खुप छान लेख.... खुप काहि
चांगला लेख
लेख आवडला
विषय फार मोठा आहे..
विषय फार मोठा आहे
In reply to विषय फार मोठा आहे.. by गवि
+१
In reply to विषय फार मोठा आहे by सुधीर
धाडसी निर्णय आणि उत्तम लेख.
आवडला
फारच उत्तम
लेख आवडला
मराठीच हवी असे नाही.
जुन्या नामांकित सर्व शाळा
In reply to मराठीच हवी असे नाही. by आनंदी गोपाळ
धन्यवाद!
In reply to जुन्या नामांकित सर्व शाळा by रेवती
अभिनंदन
एक उदा. म्हणुन : आपण मराठीत
+१
In reply to एक उदा. म्हणुन : आपण मराठीत by शिल्पा ब
योग्य आणि धाडसी निर्णय ..........
हाबिनंदन हो
अगदी अगदी ! सारखाच अनुभव...
In reply to हाबिनंदन हो by रमताराम
सह्ही..