Skip to main content

प्रबळ ट्रबल

लेखक स्पा यांनी मंगळवार, 24/07/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता. कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड . शेवटी प्रबळगडावर शिक्का मोर्तब झाले , आणि सर्वांना फोनवून सांगितले. शनिवारी भल्या पहाटे बाईक काढली , सौरभ आलेलाच होता .. मी सौरभ हर्शल आणि सिद्धू असे चौघ निघालो.. किसन पनवेलला भेटणार होता .. गणेशाने आयत्यावेळी टूल्ली दिली .

गणपुले काकू

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 24/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.) काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं.

भक्तीची शक्ती?

लेखक चिगो यांनी मंगळवार, 24/07/2012 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून. ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते.

घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 24/07/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे... जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे... सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु. यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा... मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन.... तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा.

आहोत तर हे तुम्ही का सांगताय

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 24/07/2012 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामधे (इथे बहुसंख्य विरोधात असतील मटावाचनाबाबत) एक बातमी वाचली. त्यात चीनमधील लोकांच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर आल्या आहेत. त्यात भारत हा एक गलिच्छ देश असल्याचे म्हटले आहे आणी ह्या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही फोटोही दिलेले आहेत. त्याची लिंक खाली देत आहे. फोटो प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर पहावेत.

बांगड्या आणि गजरा !! ..( Confusing but soooo sweet ! )

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 24/07/2012 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वप्रकाशित डिसक्लेमर : समस्या वैयक्तिक पातळीवरून मांडली असली तरी ती जागतिक समस्या आहे असे लेखकाचे मत आहे .शिवाय त्या समस्येचं आजवर कोणीही निवारण केले असण्याची शक्यता अतिशय कमी आहे (जे साक्षात ब्रह्मदेवाला जमलं नाही ते आम्हाला काय कप्पाळ जमणार आहे . शिवाय आमच्या मित्रांना, नवरा-बायकोच्या नात्यातला एक प्रकारचा जो गोडवा(भांडणातही आणि परस्परविरोधी सवयीतही ! ) असतो, त्याचा आंनद कसा लुटायचा हे ही सांगायचा आमचा एक झीण प्रयत्न ! ;) दिनांक : १ ऑगस्ट २००९ स्थळ : निळकंठेश्वर (कात टाकलेला रम्य निसर्ग) वेळ : साधारण सकाळी साडे आठ ती : खुप छान परिसर आहे रे हा.

पत्र

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 24/07/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पत्र लिहिताना 'काय' लिहावं असा प्रश्न कधी पडला नाही आणि 'किती' लिहावं याचं भान कधी राहिलं नाही आज मात्र नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय...... अजून कागदावर एकही अक्षर उमटलं नाहीये हे...... पानभर लिहून झाल्यावर लक्षात आलंय ...आणि तू हे न लिहीलेलं पत्र पोहोचलं म्हणालीस? ------------------------------------------------------------------------ ब्लॉगवर पूर्वप्रकाशित ------------------------------------------------------------------------

आजाद हिंदची रणरागिणी हरपली

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 24/07/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे. हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या.

पॅटर्न्स आणि ज्योतिष : एक शक्यता ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 23/07/2012 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच व्यवस्थापकीय प्रशिक्षणाचा, कंपनीने आखलेला (कंपनीचे पैसे खर्च करून) 'उद्याचे नेतृत्व (Tomorrows Leadership)' हा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. फारच माहितीवर्धक आणि ज्ञानप्रबोधक असा अभ्यासक्रम होता. एकंदरीत कंपनीतील बर्‍याच नवीनं सहकार्‍यांची भेट होऊन त्यानिमीत्ताने नवीनं मित्र झाले आणि 'नेटवर्किंग' ह्या कॉर्पोरेट जगतातील एका पर्वाला सुरुवात झाली. असो मुद्दा तो नाही. ह्या अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे एखाद्याचे 'Organizational Behavior' ओळखणे. त्यातून त्याचा 'नेतृत्वगुण गुणांक' आणि 'नेतृत्वशैली' पडताळणे.