पवारांची विचार"पूस"
जाणता राजा ह्या पदवीवर शिवरायांच्या नंतर आपला हक्क सांगणारे, भारतीय लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असे म्हणाले की १७ तारखेला सातार्यात राष्ट्रवादीला मतदान करा आणि ती शाई पुसून २४ तारखेला मुंबईत येऊन पुन्हा एकदा मतदान करा! एक व्यक्ती एक मत अशी लोकशाहीची मांडणी होती ती राष्ट्रवादीच्या मतदारांकरता बदलली असावी. जाणत्या साहेबांना काहीही करणे शक्य आहे!
अशा प्रकारे एका तथाकथित जबाबदार व अनुभवी नेत्याने असे बिनडोक आणि बेजबाबदार विधान करणे योग्य आहे का? अगदी विनोद म्हटला तरी हा जरा अतीच वाटतो आहे. निवडणूक आयोगाने पवारांची कानउघडणी करणे आवश्यक आहे.
मिसळपाव