स्मरणातील भ्रमण.
२००५मधील गोष्ट आहे.चारधाम यात्रेला गेलो होतो चाळीसजण होतो हरिद्वारपासुन ५सुमो केल्या होत्या,यात्रा सुरळीत पार पडली शेवटच्या दिवशी पहाटे बद्रिनाथ दर्शन करुन निघालो.आता सर्व प्रवास उताराचा होता.आमची गाडी सर्वात पुढे होती.मागची गाडी लाईट देत होती,गाडीतील सर्वजण हातवारे करुन काहीतरी ईशारे करत होते,काचा बन्द असल्याने अम्हाला काही ऐकु येत नव्हते मागच्या गाडीने आम्हाला ओव्हरटेक केले आणि हाताच्या इशार्याने गजानन{ड्रायव्हर}ला गाडी थाम्बवायला सान्गितले आणि तेही थाम्बले गजाननने डाव्याबाजुला मातीचा ढिगारा पाहुन गाडी त्यावर घालुन थाम्बवली.सगळे गाडीतुन उतरले होते आम्हाला म्हणाले खाली उतरा बघा तुमच्य
सौभाग्य लेणी
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी
नाही..
श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ...
तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही ..
तुझ्या अंगणी
तुझ्या अंगणी असेल बरसत
असाच पाउस अबोल, हळवा
टपटपत्या त्या थेंबांमधुनी
ऐकशील तू मंद मारवा....
तुझे ही डोळे येतील भरुनी
मेघ जणु आकाशी आतुर
सांग कसे मग लपवशील तू
मनातले ते वेडे काहूर...
कुठे लपवशील माझे हसणे
कसे रोखशील माझे गाणे
डोळ्यामधले आसू लपवण्या
कितिक करशील खुळे बहाणे...
तुला सान्गतील जुन्या वेदना
आकाशातील मेघ सावळे
पुन्हा नव्याने रूजून येतील
आठवणींचे कोंब कोवळे......
ऋतु किती हे येतील जातील
पुन्हा पुन्हा तू मला शोधशील
मनातल्या त्या मुक्या भावना
पाउस होवुन नयनी येतील.....
अंगाई गीत
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला
बघ चोरपावलांनी चालून रात्र येई
निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही?
इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया
इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल
तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही
तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल
तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे
रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते
घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या
मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते
तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे
मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही
निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ?
© अदिती जोशी
काव्यरस
किस्सा - ए - गुलबकावली
* प्रेरणास्त्रोत - http://misalpav.com/node/27931
तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.
तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच.
गजरा
माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले.
रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले..
सुमती एकटी पडली..
एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता..
मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला...
खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते..
माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे.
सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे..
तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे...
दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फार
बेबी 2
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली.
तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती.
पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,'
आचानक लिफ्टचे दार उघडते,
व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.
बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त
मिसळपाव