Skip to main content

तव्यावरचा शेंगदाणे-मिरचीचा झटपट ठेचा

लेखक मंजुषा१९८० यांनी गुरुवार, 27/08/2015 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस सात-आठ मिरच्या मूठभर शेंगदाणे लसणाच्या चार-पाच पाकळ्या जीरे दोन चमचे तेल कोथिंबीर, मीठ मार्गदर्शन
  • प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
  • लसूण पाकळ्या चिराव्यात.
  • तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
  • ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे.

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 27/08/2015 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 27/08/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
... परीकथेचे सव्वा वर्ष .. - http://misalpav.com/node/32062 ..... २० जुलै २०१५ लहान मुले खरंच किती निरागस असतात.. जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात, फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात, अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो, तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते. खरंच., लहान मुले किती निरागस असतात :) . . २२ जुलै २०१५ कधी तिला शांत करणे अशक्य होते, तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही तिला जेली देण्याची लालुच दाखवतो.

भरली भेंडी –प्रकार पहिला.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 26/08/2015 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण विशेषात मोडणारी आणि श्रावणातच मिळणारी एक चविष्ट भाजी.अतिशय कमी साहित्य हा हिचा गुणविशेष.पांढरी भेंडी म्हणायला पण पिस्ता कलरची असणारी ही भेंडी. यात अजून प्रकार असतात ते म्हणजे नऊधारी किंवा सातधारी भेंडी.एरवी पंचकोनी असलेली भेंडी चक्क सप्तकोनी,नवकोनी असतात.या भाजी साठी नेहमीची हिरवीगार भेंडीपण वापरता येतात.पण खरी चव खुलते ती श्रावणातल्या भेंडीसोबत.ही ती भेंडी.

फिरकी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 26/08/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला. नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) . तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.

जडण घडण - २७

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 26/08/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवं काम आवडू लागलं, त्यातही रूळले. या सगळ्या प्रवासात नोकरी देऊ करणाऱ्या कंपन्यांकडूनही वरचेवर कॉल यायचे. प्रामुख्याने कॉपी रायटिंग किंवा कंटेंट रायटिंगसाठी. पण बराच काळ फ्री लान्सींग सुरू होतं. वेगवेगळ्या क्षेत्रात, मनासारखं आणि वेळेच्या सोयीनुसार काम करता येत होतं, त्यामुळे पूर्णवेळ नोकरी करण्याकडे फारसा कल नव्हता. मुलाखतींसाठी गेले काही ठिकाणी, पण ते फारसं काही रूचलं नाही. एकदा एका चांगल्या ॲड एजन्सीमध्ये कामाला सुरूवात केली. पहिल्या दोन दिवसातच भयंकर कंटाळले. मी वेळेत पोहोचायचे. काम फारसं नसायचं. क्रिएटिव्ह टीम निवांत यायची.

तो क्या करे... अख्तर शिरानी यांची ग़ज़ल

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/08/2015 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका शायरची आणखी एक ग़ज़ल आणि मला उमगलेला तिचा अर्थ इथे लिहीत आहे. हा शायर म्हणजे अख्तर शिरानी. यांचं मूळ नाव मुहम्मद दावूद खान. लाहोर ला वाढलेल्या या शायरचं काव्य हे विलक्षण तरूण आहे. त्यांची ही ग़ज़ल विरहानंतरच्या, ताटातुटीनंतरच्या हतबलतेचं अत्यंत ह्र्द्य वर्णन करते. मत्ला असा आहे, काम आ न सकी अपनी वफा़एं तो क्या करे उस बेवफ़ा को भूल न जाए तो क्या करे प्रेमभंग आणि विश्वासघात हातात हात घालूनच असतात. आपण सर्वस्व अर्पावं आणि दुस-याने त्या विश्वासाला तडा द्यावा याचं दु:ख वाट्याला आलं की काय करावं सुचत नाही.
काव्यरस

तुलनेचा तराजू

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते. तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत. तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो. तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही. इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही.

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

नियती

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 26/08/2015 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मागते काहीं रखरखाट तप्त कुठेसा त्या रस्त्यावरती ओला तो थेंब शुष्क रुधिराचा भिरभिरति नकळत डोळे शोधी आधार छताचा ते खांब चारच होते ना मागमुस भिंतीचा सुकलेल्या ओष्ठांना हलके स्पर्श तप्त अश्रुंचा थांबले गालांवर मोती ओघळला श्वास कोरडासा त्या श्वासांमधले अंतर मोजण्यापल्याड असते मी फ़क्त मोजतो श्वास अन्तरही फसवे असते जगणे बुभुक्षिताचे भूक संपता संपत नाही ते स्वप्न शोषिती माझे शोधती सत्य आभासी ते दिवे दूर जाताना सावली सोडते साथ बांधू पाहतो नशिबा पाठीवर बांधुनी हात ते दिवस कोडगे होते रात्री लाजिरवाण्या स्वप्नांचे इमले इतुके विश्वास बाटगा होता ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगं
काव्यरस