एल्गार स्वरांचा
पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा
स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा
पाखरे अशी येतात कुठून येथे
साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा
काल पर्यंत होते सारे षंढ इथे
आज होतो एल्गार स्वरांचा
जगतानाच त्यांनी जाळले मला इथे
मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा
#जिप्सी
काव्यरस
मिसळपाव
“फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….”
कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल