Skip to main content

एल्गार स्वरांचा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 01/12/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा पाखरे अशी येतात कुठून येथे साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा काल पर्यंत होते सारे षंढ इथे आज होतो एल्गार स्वरांचा जगतानाच त्यांनी जाळले मला इथे मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा #जिप्सी
काव्यरस

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . .

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 01/12/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

नव्याने ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 01/12/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
बांधले आहेत आम्ही दोर जगण्याशी नव्याने रोज घेतो जन्म आम्ही वैर मरणाशी नव्याने कोरड्या डोळ्यात येथे आग नित्याचीच आहे जोडले नाते जगाने यार सरणाशी नव्याने भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने रोज रस्ते शोधतो, वाटा नव्या धुंडाळतो मी ओळखी होतात तेव्हा मग हरवण्याशी नव्याने विशाल
काव्यरस

फणस

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/12/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
. “फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….” कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्‍या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

मुमुक्षु

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 01/12/2015 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर मुमुक्षु राहतो. रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर. ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन हल्ला करतात अचानक दिसेल तिथे अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू. मुमुक्षु.
काव्यरस

बुद्धिमान व पराक्रमी पेशवे

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 30/11/2015 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांनी मराठेशाही बुडविली हे काही तितके खरे नाही. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांनी (1707 - 1800) 94 वर्ष मराठेशाही राखली. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर (1800) दुसरे बाजीराव पेशवे अपराक्रमी, कारस्थानी, विषयलंपट असल्यामुळे 1817 मध्ये मराठेशाही बुडाली. पहिले बाजीराव पेशवे व माधवराव पेशवे या दोघानां मिळून 50 वर्षाचे आयुष्य लाभले असते तर मराठेशाही आणखी 50 वर्ष जास्त राहिली असती. बाळाजी विश्वनाथ पेशवे :- औरंगजेबाचा 1707 मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र आजम बादशहा झाला.

तुमुल कोलाहल कलह मे - एक अलौकिक काव्य.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 30/11/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम सन्गीत यामुळे ही कविता हिन्दि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे.

मांत्रिक

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 30/11/2015 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कवठी गरगर फिरत होती. टेबलावरच्या ठोकळ्यासारखी. मांत्रिक तिचा वापर ठोकळ्यासारखाच करत होता. पिंपळाच्या झाडाखाली खरच एक टेबल होता. खुर्चीवर खरंच एक मांत्रिक बसला होता. आणि हातातली कवठी खरंच गरगर फिरवत होता. दुसऱ्या हातात पेन घेऊन समोरच्या जाडजुड पुस्तकात अगम्य रेघोट्या मारत होता. बराच वेळ त्याला पडलेले कोडे सुटत नव्हते. अचानक समोरच्या वाड्यात एक भयचकीत किंकाळी घुमली. दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीचा दिवाही लागला. हातात त्रिशूळ घेऊन मांत्रिक ऊठला. आणि सावध एकएक पाऊल टाकत वाड्याकडे चालला. गर्द अधारात त्याला काहीही दिसेना. वाड्याच्या आजुबाजूला घनदाट जंगल होते. रातकीडे किर्रर करत होते.

माहिती हवी - तळपते विक्रम संहारिणी

लेखक कहर यांनी सोमवार, 30/11/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी (जेव्हा लोक सकाळी रेडीओ ऐकत कामे आवरत ) त्याकाळी रेडीओ वर एक गाणे लागायचे . त्याचे शब्द पूर्ण लक्षात नाहीत पण ध्रुवपद "तळपते विक्रम सौदामिनी / संहारिणी" असे काहीसे होते. अभिमन्यूच्या चक्रव्युहातील पराक्रमाचे वर्णन या गाण्यात केले होते. त्यावेळी इतके लहान होतो कि या गाण्याचे गीतकार, गायक लक्षात ठेवण्याचीही अक्कल नव्हती. पण मनाच्या गाभार्यात लुप्त झालेली चाल आणि अस्पष्ट शब्द पुन्हा ओठावर येऊ लागले " द्रोण कृप … …. शल्य जयद्रथ , दुर्योधन …. … कर्ण महारथ, तरी तयाचे कौतुक झळके द्रोणांच्या लोचनी , तळपते विक्रम सौदामिनी" या गाण्याबद्दल कोणाला काही आठवण / माहिती असेल तर कृपया सांगा.