Skip to main content

पाश्चिमात्य साहित्य

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 27/09/2016 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते.

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 27/09/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.

व्यथा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 27/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी

रिहॅब चे दिवस ( भाग ४) !!!

लेखक वरुण मोहिते यांनी सोमवार, 26/09/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी उठलो, कानावरती इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर ना होना ..हे गाणं येत होतं. मन भरून आलं. रूम मध्ये पाहिलं तर कोणच नव्हतं. जरा वेळाने सगळे आले. योगा करायला गेले होते खाली. गाण्यामुळे माझे डोळे भरून आले , हुंदकेही येत होते बहुधा . तितक्यात खांद्यावर एक हात पडला . गप बाला गप... हे त्यांचं पहिला वाक्य. हे साहेब पनवेल चे .सिडको एअरपोर्ट अश्या ठिकाणी जमीन गेलेली. काही कोटींचे धनी. मात्र मोहाची दारू, मच्छी ,पनवेल या व्यतिरिक्त जगातील कुठल्याही गोष्टींशी त्यांचा संबंध नव्हता. काही बोलो तरी आमच्या पनवेल ला काय होता हे व्याख्यान परत ऐकावं लागे .

परीकथा - भाग अकरा - फेसबूक स्टेटस २.४ - २.५ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 26/09/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
९ ऑगस्ट २०१६ हल्ली आम्ही एक नवीन प्रकार सुरू केला आहे. डोळ्यावर हात ठेवून गुडघ्यात डोके खुपसून बसायचे आणि आपण लपलो असे डिक्लेअर करायचे. मग पप्पा उगाचच्या उगाच शोधायचे नाटक करणार आणि ती अचानक भॉ केल्याच्या आवेशात मोठ्याने किंचाळणार.. तर गेल्या रविवारी असाच काहीसा खेळ मॅकडोनाल्डमध्ये चालू होता. दरवाज्याजवळच्या पॅसेजमध्ये अशीच ती स्वत:ला लपवून बसली होती. जवळून दोन अठरा-वीस वर्षांची मुले गेटबाहेर पडत होती. ईतक्यात अचानक बॉम्ब फुटावा तशी ही किंचाळत उसळली. या अनपेक्षित प्रकाराने तिच्या जवळून जात असलेला मुलगा अक्षरश: अंग काढून दचकला.

इंडिपॉप - ९० चे दशक !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 26/09/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !

मी एक ढग - एकटाच ...... !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/09/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक ढग - एकटाच ...... !!! सखे सोबती जरी कितीक गर्दी गडगडणाऱ्या त्या ढगांची वर्दी कधी चिंब ओल्या पावसात कधी लख्ख कोरड्या उन्हात तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! मनात माझ्या जुनेच सवंगडी नव्या देशातले जरी वारे सभोवती कधी हर्षुन जाई तर कधी उदास ना कसली खंत ना कसली आस तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! नकळत देतो जीवा दिलासा स्वतःच गिळून घेतो उसासा वाऱ्याविना ही फिरतो उगाच ना जाणतो वाट जुनी कि नवी आज तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!

मदत हवी आहे - वेळणेश्वर

लेखक अमृत यांनी सोमवार, 26/09/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दसर्‍याच्या सुट्ट्यात वेळणेश्वरला जाण्याचा बेत आहे. राहाण्याची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामण्डाळाच्या हॉटेलात केली आहे. एकूण चार दिवसाची सहल करणार आहोत. त्यातील दिवस १ व ४ हे प्रवासातच जातील तरी उर्वरीत २ दिवसात काय काय बघता येइल. एकूण २ कुटुन्ब आहोत व २ लहानगे (वय ५ व २.५) तरी कृपया मार्गदर्शन कारावे. १. पुण्यावरून जाताना जास्त सोयीस्कर रस्ता कोणता? (ताम्हीणीतून दोनदा कोकणात उतरलो आहे पण या वर्षी ऑगस्ट महिन्यात ताम्हीणी सहलीत रस्त्याची झालीली दुर्दशा बघून शक्यतोवर तो टाळायची इछा आहे.) २. सातारा मार्गे गेल्यास रस्त्यात जेवणासाठी काही चान्गली ठिकाणं? ३.

साम दाम दंड भेद

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 26/09/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
साम दाम दंड भेद आमच्या घामाला दाम नाही हे रामा, आता जगण्यात राम नाही किती हि कष्ट केले तरी कनवटीला छदाम नाही नियतीला पण काही ना वाटे परिस्थितीशी साम नाही अहोरात्र धडपडतो पण वेदनेला बाम नाही भरल्या गोकुळात भरकटतो भेटत अजून श्याम नाही गतजन्मीच्या कर्माचा दंड हा ह्यात काही भेद नाही जगण्याशिवाय तरी आता या जगात दुसरे काम नाही राजेंद्र देवी