Skip to main content

स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

लेखक माहितगार यांनी सोमवार, 14/08/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कर्ते, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जवळपास १०० वर्षापुर्वी An Essay on Indian Economics, and Hindu Law and the Methods and Principles of the Historical Study Thereof. या विषयांवर लेखन केले The History of Caste in India या विषयावर Phd केली. स्त्री सहभागाचा समाज व्यवहारात अभाव आणि जाती व्यवस्थेचा पगडा यांचा आर्थीक विकासावर होणार्‍या परिणामांकडे त्यांनी त्यांच्या ज्ञानकोशातील लेखातून दिशा निर्देश केलेला दिसून येतो.

कृष्ण (भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 14/08/2017 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याने कधी काळी धरित्रीचे तृषार्त अंतःकरण अनुभवले होते स्वर्गलोकापल्याडच्या कृष्णचरणांची अभिप्सा धरली होती त्या मज पामराला या भयावह तरीही सुमधुर भवसागरात जीवात्म्याने जन्म घेण्याचे प्रयोजन एकदाचे उमगले आहे त्या सावळ्याच्या डोळ्यातले चिरंतन सौंदर्य मी पाहिले आहे मी ऐकला आहे त्या प्रेमिकाच्या बासरीतला धुंद आवेग त्या चिरंतन परमानंदाच्या गूढरम्य अनुभूतीत माझ्या अंत:करणातली शोकव्यथा कायमची मौनावली आहे ते दिव्य संगीत जसजसे निकटच्या सान्निध्यात अलगदपणे खेचून घेते आहे सारे जीवनच जणू त्या सोलिव सुखाने गात्रागात्रातून रोमांचित होते आहे आपल्या दैवताने स्पर्श करावा, हात हाती घ्यावा, त्याचा सहवास लाभावा
काव्यरस

विकल्प

लेखक चंद्रकांत यांनी सोमवार, 14/08/2017 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
विकल्प आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावणाऱ्या क्षणांचे प्रयोजन आपल्यासाठी नेमके काय असते, याचा आपण ठरवून सखोल वगैरे विचार कधी केलेला असतो का? मुळात ते असते की, फक्त समाधानासाठी तसं म्हणायचं असतं? तसेही समाधान शब्दाचे निश्चित असे परिमाण सांगता येईल, असे वाटत नाही. समजा या प्रयोजनांचं उत्तर कृतकृत्य होणे वगैरे असे काही असेल, तर सगळ्यांच्या वाट्यास ते सारखेच असते, की प्रेत्येकासाठी भिन्न? बरं, या क्षणांचं मोल मोजून घेण्याचं शहाणपण सगळ्यांना सारखं अवगत असतं का, की ज्याच्या-त्याच्या वकुबाने त्याचे स्तर ठरतात? निश्चित विधान करणे जरा अवघड आहे.

एक आठवण

लेखक अनिवासि यांनी सोमवार, 14/08/2017 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या. ८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे. युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली.

ती सध्या काय करते ?

लेखक बाळ ठोंबरे - प्रकाश यांनी सोमवार, 14/08/2017 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका ! ती सध्या काय करते उठल्या उठल्या वाय- फाय करते सकाळ पासून खाय खाय करते तिखट खाऊन हाय हाय करते बिल आले की नाय नाय करते रोज नव्या मित्राला 'हाय' करते संध्याकाळी त्याला 'बाय' करते रोज नवा ड्रेस 'ट्राय' करते वय लपावे म्ह्णून 'डाय' करते खोटं खोटंच 'शाय' करते दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' करते स्वतः मस्त 'एन्जॉय' करते तीच जाणे कसे काय करते कळलं ? ती सध्या काय करते ? ------ बाळ ठोम्बरे
काव्यरस

अंत आणि आरंभ

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 14/08/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे... जीर्ण-शीर्ण कातडी शेषाने टाकली. प्रलय अमृतात धरती न्हाली. हिरव्या शालूत नववधू लाजली. प्रीतीचे गाणे नभी गुंजले. अंकुर चैतन्याचे पुन्हा प्रगटले.
काव्यरस

खरेदी एक भोग!

लेखक sudhirvdeshmukh यांनी सोमवार, 14/08/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
खरेदी एक भोग ! जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ५

लेखक जुइ यांनी सोमवार, 14/08/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ लायब्ररी ऑफ काँग्रेस पाहून झाल्यावर संध्याकाळी मेट्रोने हॉटेलवर परतीचा प्रवास सुरू केला. त्या दिवशी भटकंती थोडी दमाने घ्यायची असे ठरवले होते. कारण अगोदरच्या दिवशी एकतर खूप काही पाहिले होते अन बरीच पायपीट झाली होती. मुख्य म्हणजे आम्ही घातलेल्या (नेमका पार्किंग लॉट विसरण्याच्या) घोळाने मेट्रो स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावलेली गाडी सापडायला खूप वेळ आणि श्रम लागले. याविषयी सविस्तर शेवटच्या भागात लिहीन.

#अनुभव#

लेखक भित्रा ससा यांनी सोमवार, 14/08/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ; माझे हे पहिलेच लेखन सूचनांचे स्वागत अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे. गेल्या वर्षीच्या जानेवारीची गोष्ट. वाडवडिलांची पुण्याई जमिनीच्या रूपात भेटलेली त्यामुळे आमचा शेती हा बाजूउद्योग सुरू असतो . दिवसा संगणक दुरुस्ती व रात्री भिजवणी असा रुटीन ठरलेला होता . हरभरा जोमात आलेला पण पावसाने थोडा दगा दिला त्यावर उपाय म्हणून तुषार सिंचन सयंत्र जोडण्याचा निर्णय एकट्याच्या बहुमताने मंजूर केला.