Skip to main content

अपयशाचे व्यवस्थापन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/04/2008 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.

औरंगझेब - एक (बर)बादशहा !

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 23/04/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी : "औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर" वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 23/04/2008 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये...

मांसाहार व अन्नटंचाई

लेखक ऐश्वर्या राय यांनी मंगळवार, 22/04/2008 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
मांसाहारामुळे अन्नटंचाईच्या समस्येला कसा मोठा हातभार लागत आहे त्याबद्दल माहीतीपूर्ण दुवे: http://blog.wired.com/wiredscience/2008/04/food-riots-begi.html http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/index.html आजची पिढी ही पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत मांसाहाराकडे जास्त वळलेली आहे आणि रोज त्यात भर पडत आहे.

विश्वकर्मा नीलकांत

लेखक आनंदयात्री यांनी मंगळवार, 22/04/2008 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
अरे हो हो हो ... सांगतो .. असे शीर्षक का ते सांगतो ... "विश्वकर्मा नीलकांत" असे धमालराव आमच्या कांताला संबोधत असतात, कारण दिवसभर (ऍटलिष्ट धा तास तरी) मिपा आमच्या साठी विश्व असते हो. आम्ही दिवसभर इकडे वावरतो, चकाट्या पिटतो, एकमेकांची खेचतो, एकमेकांची सुख दु:ख्खे वाटतो झालच तर आत्मानंदी गुरु वैगेरे पण मिळवतो :).