Skip to main content

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 29/09/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे... धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना... उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं! 'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..' या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते.. वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना.. क्या बात है..

खरंच का आपण इतके भयंकर आहोत?

लेखक येडा खवीस यांनी सोमवार, 29/09/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी एका गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी उभा होतो. बाजुने एक कुत्री दबकत दबकत चालली होती, तिचे माझ्या हालचालीकडे लक्ष होते...नेमके मी जिथे उभा होतो तिथुनच तिला जायचे असल्याने अर्थातच तिला जाण्यासाठी वाट द्यावी म्हणुन मी जरा सरकलो, त्यावर दचकुन ती मागच्या मागे पळत सुटली...हे पाहुन मला सखेद आश्चर्य वाटले... इतकी वर्षे माणसांबरोबर राहुनही कुत्री-मांजरे किती भितात आपल्याला? माणुस हा इतका भयंकर प्राणि आहे का? मानव जातीच्या उत्क्रांतीबरोबर आज समस्त जगावर स्वत:चे अनभिषिक्त साम्राज्य माणसाने उभं केलय.

आठवणीतलं नवरात्र

लेखक भाग्यश्री कुलकर्णी यांनी सोमवार, 29/09/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे. गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची.

चल ग सजणे

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 29/09/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
चल ग सजणे कश्शाला रड्ते रडताना, डोळ्यातले का़जळ वहाते चल ग सजणे कश्शाला रडते बाबा कळ्वळतात हाताना चोळ्त्तात म्हण्तात कशाला पाठीवले पोरीला परदेशात ती तिथे मी इथे भेट कशी रे चल ग सजणे, कश्शाला रड्ते स्पष्टिकरण : ही कविता ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हणण्याइतका मी बावळट नाही आहे. भड्कमकर मास्तरांना खरड पाठ्विली होती , "मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. आण्खी एका सदस्याना विचारले(मराठी चे लज्जत पापड) पण त्याच्या घरी १० वी व १२वी आहे.
Taxonomy upgrade extras

पिंडी ते ब्रह्मांडी उर्फ भुदरगड ते लेहमन

लेखक शेखस्पिअर यांनी सोमवार, 29/09/2008 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरामागे कोणे एके काळी एक 'भुदरगड' नावाची पतसंस्था होती... आमच्या शहरातील काही बडी प्रस्थं आणि मान्यवर त्या 'पतसंस्था' नावाच्या 'दुकानाशी' बांधून होते. त्या सगळ्यांच्या 'पुण्याई'मुळे बरेच छोटे छोटे गरजू गुंतवणूकदार गोळा झाले. आणि पतसंस्थेला प्रचंड बरकत आली. मग काय धडाधड कर्ज वाटप सुरु झाले..सगळीकडे कसा आणंदी आणंद झाला. पण एके दिवशी एकाएकी बातमी आली की पतसंस्था बुडाली. मग काय ..लोकांचे थवेच्या थवे ,झुंडीच्या झुंडी,जथ्थेच्या जथ्थे 'दुकानासमोर' आल्या.. पुरुषांच्या शिव्या,, बायकांचे करवादणे,,याचा एकच हलकल्लॉळ झाला.. आमच्या ओळखीतले किमान १००-१५० जण असे होते की त्यांचे सुमारे रु.१०,००० - २,०

विरामचिन्हाबाबत.

लेखक Dilipkumar यांनी सोमवार, 29/09/2008 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी आणि इन्ग्रजी या दोन्ही भाषामध्ये विरामचिन्हे (Punctuations) ही सारखीच कशी आहेत?

मित्राच्या निमीत्ताने...

लेखक रामदास यांनी सोमवार, 29/09/2008 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मैत्रीणीनी असे काही प्रश्न विचारले नाहीत.पण नंतर जवळ जवळ बारा वर्षांनी आठवण असह्य झाली तेव्हा कविता लिहून मला पाठवली. तुझ्यामागून हिरव्या रानातून चालताना - माझी वाट चुकली, अन् घनगर्द अरण्यात मला माझी - झोपडी बांधावीच लागली. त्यानंतर किती वर्षांनी -- उन्हं माझ्या अंगणात आली, दारच्या त्या ओंडक्यांची -- कोवळी रोपे झाली. गर्द असे हे रान-आणि उन्हे अधीमधी, सावलीतली ही रोपे -वाढतील का रे कधी ? त्यात आता झोपडीचे -एक असे गाव झाले, मनात पालवी असून -रोप बाजूला राहिले. मनातले हिरवे रान-अणि मी झोपी जाते, गर्द रानातली वाट-चालण्यास सोपी जाते. १२-१२-१९९४.
Taxonomy upgrade extras

जागतिक आर्थिक संकट - नवा अध्याय

लेखक अभिजीत यांनी सोमवार, 29/09/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/3581 इथे या पुर्वीचा भाग वाचता येइल. जागतिक आर्थिक संकट - नवा अध्याय सप्टेंबर २००८ च्या मध्यास निर्माण झालेल्या अभूतपुर्व आर्थिक पडझडीतून सावरण्यासाठी जॉर्ज बुश यांनी १८ सप्टेंबरला ७०० अब्ज डॉलर्सची तातडीची मदत जाहीर केली. अमेरिकी काँग्रेसने यावर गेले ७-८ दिवस जोरदार चर्चा केली आणि एक आराखडा अमेरिकी जनतेपुढे आणि पर्यायाने जगापुढे ठेवला आहे. २५० अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता सरकार पत-संकटामुळे धोक्यात आलेली कर्जे (होम लोन्स, कर लोन्स, एज्युकेशन लोन्स वगैरे) विविध बँकांकडून विकत घेण्यासाठी वापरेल.