Skip to main content

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/10/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...

"काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां"ललिताचं जीवशास्त्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 30/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?" गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे.

झटपट पुरण पोळी

लेखक किर्ति यांनी मंगळवार, 30/09/2008 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
ही पा.क्रु माझ्या सासुबाई चि आहे साहित्य:- दाळव १ वाटी ,साखर १ वाटी , विलायची ,जायफळ आपल्या आवडी प्रमाणे पुरण पोळी साठी कणिक मळुन घेतलेली दाळव मिक्सर मधुन काढुन घेणे साखर पण मिक्सर मधुन वाटुन घेणे एकत्र करुन त्यात विलायची जायफल पुड घालुन दुधात मळुन घेणे हे सारण कणिके च्या पारी त भरुन पोळी लाटावी साजुक तुप टाकुन खायला घ्यावी :)

थिजली गात्रं (आणि विवाद)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 30/09/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
कवी लिखाळ ह्यांच्या काव्यप्रतिभेला सर्वपित्रीच्या रात्री आलेला भेसूर बहर वाचून मी थिजून गेलो :S आणी माझ्या गोठलेल्या तनातून विडंबनाची एक थंडगार लहर सरसरत गेली!

मिपाकरांकडुन मदतीची अपेक्षा....

लेखक खादाड_बोका यांनी मंगळवार, 30/09/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांकडुन मद्तीची अपेक्षा..... कारण असे की मी आज अमेरीकेत घर(Single family house) विकत गेतले आहे. आज नवरात्रीच्या प्रथम दिवशी बँकेचे लोन close करणार, आणी गृह प्रवेश करणार आहे. भारतात गुरुजीना बोलावुन पुजा केली असती. पण ईथे कार्यकारी दिवस असल्यामुळे ते जमत नाही. तेव्हा कोणी मला थोडक्यात "गृह प्रवेश पुजा" या विधी कशी करायची, हे सांगीतले तर खुप मदत होईल.

कोण खरी

लेखक निखिलचं शाईपेन यांनी मंगळवार, 30/09/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
खूप रागावलो मी कधी तर मग, माझीच नक्कल करुन हसवणारीस तू आणि कधी स्वताच फ़ूरंगटून बसणारीस तू कोण खरी ? कधी मग उगीचच साधी बस नाही मिळाली म्हणून रडवेली झालेली तू खरी .. की घाई घाईत तवा भाजला तरी ’काही नाही रे’ ’तू जा, उशीर झालाय ..घड्याळ काय शो साठी बांधलेस काय...’ म्हणून हसत पाठवणारी तू खरी कोण ? कधी दोन तासात ..फोन नाही केला म्हनून .. चिडनारी तू .. आणि कधी ’कित्ती वेळा फोन करतॊस रे..?’ ’आज काम नाहीए का तूला ...ठेवतेय मी’ मला रागावणारी तू ... कधी मग आशा - गुलजार ची गाणी मला समजावून सांगणारी तू .. की .. कधी चल AC मध्ये बसून गप्पा मारुयात .. म्हनून एखाद्या FLOP पिक्चर ला घेउन जाणारीस ..तू.. अगदी
Taxonomy upgrade extras

अजि म्यां बी बर्म पाहिले...

लेखक अरुण वडुलेकर यांनी मंगळवार, 30/09/2008 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातल्या त्या सुरम्य उपवनात बहरलेल्या प्रजक्ताखाली भाईकाका मनातल्या मनात एक बंदिश जमवीत होते. तितक्यात वाघ मागेलागल्यासारखे धापा टाकीत रावसाहेब पुढ्यात येऊन ठाकले. " अहो पी यल्ल! हितं काय करताय एवढं सक्काळी, सक्काळी म्हणतो मी?" " कांही नाही हो. एक चाल बांधत होतो. कां? काय झालं?" " ते चाल लावायचं सोडून सोडा हो. खाली कुणी तरी करतंय हो ते काऽऽम." "अरे वा! खाली कांही नवीन मंडळी सांगितिक प्रयोग करताहेत असं कानावर आलं होतं. तुम्ही कुणाबद्दल बोलताय?" " कोण तर ते नवीन आहे बघा.

...संभवामी युगे युगे...पण आता कधी रे बाबा?

लेखक येडा खवीस यांनी मंगळवार, 30/09/2008 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमद्व्भगवगीतेत श्रीकृष्णाने "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अत्याचार वाढतील तेव्हा तेव्हा मी पुन्हा जन्म घेऊन त्यांचा संहार करेन" अशा अर्थाचे वचन दिले आहे. श्रीमद्भगवतगीता हा हिंदुंचा एक पवित्र धर्मग्रंथ असल्याने त्यातील प्रत्येक शब्द हा मंत्रस्वरुप आणि सत्य मानला जातो.

चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले

लेखक विदुषक यांनी मंगळवार, 30/09/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी राजस्थान मधील मेहरागड च्या चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले काय चालले आहे हे ? http://www.bbc.co.uk/hindi/regionalnews/story/2008/09/080930_stampede_r… मांढरदेवी , हिमाचल (ठिकाणाचे नाव विसरलो आता ) आणी आता हे नविन १. लोक एखाद्या विशिष्ट दिवशिच अशी वेड्यासारखी गर्दी का करतात ? २. देव असेलच तर सगली कडे प्रत्येक दिवशी असायला पाहीजे ३.