Skip to main content

महाराष्ट्र"विलास"

लेखक विकास यांनी मंगळवार, 09/12/2008 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण राणे तसेच वृत्तपत्रीय विश्लेषणातून कालपर्यंत असे ऐकून होतो की अशोक चव्हाण जरी नवीन मुख्यमंत्री म्हणून "बसवले" असले तरी रीमोट कंट्रोल अजूनही विलासरावांच्या हातातच आहे. आज त्याची खात्री पटली. महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ अजुनही विलासराव देशमुख हेच जनतेचे लाडके नेतृत्व आहे असे मानते... अथवा अनाभिषिक्त राजा असे मानत असावे... त्याहूनही गंमत म्हणजे म.टा.

कसाबला आणखी जगायचंय

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 09/12/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत 26 नोव्हेंबरच्या रात्री बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेणारा दहशतवादी महंमद अझमल अमीर कसाब मरणाच्या भीतीने हादरला आहे. आता तो क्षमायाचना करीत असून, मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे. मुंबईतील हल्ल्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने काही महत्त्वपूर्ण खुलासेही पोलिसांसमोर केले आहेत. चौकशीदरम्यानच तो कधी रोजच्या जेवणात मटणाची मागणी करतो, तर कधी रोज अमिताभ बच्चनचा एक चित्रपट पाहण्याची इच्छा बोलून दाखवतो.

उद्या मिपा बंद..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मिपावर येणार्‍या अधिकाधिक ट्रॅफिक/डेटाबेसमुळे मिपाची क्षमता वाढवायचे काम सध्या सुरू आहे. सबब, काही चाचण्यांकरता म्हणून उद्या बुधवार दि १० डिसेंबर २००८ रोजी भा प्र वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिपा विश्रांती अवस्थेत असेल. कामकाज लौकर आटपल्यास ते ९ वाजण्याच्या आधीही सुरू होऊ शकेल. सभासदांच्या गैरसोयीकरता मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे! आपला, (मायबाप मिपाकरांचा ऋणी) तात्या.

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...

गीता

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 09/12/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
युक्ताहारविहारस्य युक्तचेश्टस्य कर्मसु| युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा|| तर मित्रानो, आज गीता जयंती , वरील श्लोकाप्रमाणे अनेक श्लोकातुन जीवन तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता. याच दिवशी(तिथीनुसार्)श्रीकृष्णाने गीता सांगीतली.किती वर्षापुर्वी त्यावर अनेक वादविवाद आजही चालु आहेत. आपण सर्वानी गीता वाचली असेल मनन केले असेल निदान ती चाळली असेल . गीतेचा कालावधी बराच जुना आहे.इतके वर्ष गीता जगाला मार्गदर्शन करत आहे हेच गीतेचे वैशिश्ट्य आहे. गीतेवर अनेक वादविवाद झाले.प्रथम ती वेदान्विरुद्ध आहे असे म्हटले गेले मात्र ती वेदविरोधी नाही.त्यात वेद(ज्यांचे स्थान कोणी कितिहि नाकारले तरी अढळ आहे)आणि ढासळणारी

सांगून जा ...

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 09/12/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी हसू लाजरे का फुले ओठांवरी | खळी नाजूक गं खुले गोर्‍या गाली बट लाडीक ही कशी रुळे भाळी | क्षणी तुज गाली उमटे का लाली तुझी पापणी का झुकली ही खाली | धरेवर नाही तुझी पाउले ही नजरेस नाही | विश्वाचे भान ही | अशी चालता तु वळूनी पाहसी उगा थांबूनी का पुढेच तु जासी | रती होउनी तु विहरसी वनी सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी |

या दोंघीमध्ये जास्त सुंदर कोण???

लेखक उम्मि यांनी मंगळवार, 09/12/2008 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
पर्याय १: मधुबाला... पर्याय २: माधुरी दिक्षित... पर्याय ३: तुलना करणे शक्य नाही...... काय मंडळी, विचारात पडलात ना? याच विचारात पडलेला, उम्मि...

लष्कर-ए-तोयबा - कमांडर झकीउर रेहमान लखवी अटकेत.....

लेखक नाम्या झंगाट यांनी मंगळवार, 09/12/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
मटा, द न्यूज डेली आणि इतर वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर लष्कर-ए-तोयबा - कमांडर झकीउर रेहमान लखवी याला अटक झाल्याची बातमी आहे. लष्कर-ए-तोयबा - (खालील लिंक वर टिचकी मारा.....) http://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/terrorist_ou… एकूणच हे सर्व बघता लष्कर-ए-तोयबा पाकिस्तान सरकार च्या छ्त्रछायेखाली च वाढते आहे याबद्द्ल शंका नाहि.

इरफान हुसैन

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 09/12/2008 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.

`मिपा'वर गोंधळ.. (शिर्षक संपादीत)

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/12/2008 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो. इथे प्रत्येकाला आपली मते, विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही जाणवत होते. पण या स्वातंत्र्याचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, असे दिसते. कुणा महाभागाने आजच ५ कविता आणि विषय वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले आहेत. मध्यंतरी मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नवनवे विषय टाकण्याची अहमहमिकाच लागली होती. एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते! एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवण्यापेक्षा विषय टाकण्यात आघाडी घेण्याची स्पर्धाच त्यात दिसते. `मिपा'कारांनाही हे अपेक्षित नसावे, असे वाटते. हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.