Skip to main content

मात्र रात्रीची गोष्ट भाग ६

लेखक दशानन यांनी मंगळवार, 06/10/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ५ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पाचवा पेग होवुन गेला आहे, समिक्षा सुरू आहे अशी स्वयंभु अवस्था.... अशातच पेग ६ ) मी - त्या हाटिलात गेला होतास का येवढ्यात... तो- नाय बा ! आपल्याला तिकडं झेपत नाही मी - का ? तो - अरे आपण साला मनात आला ते ओकणार.. तिकडे ओकायचे तर मनातल्या मनातच मी - अन तिकडे काय मनातले बोलत नाही काय ? तो - बोलतात की. मनातले बोलतात पण सगळेच नाही. बोलतात कमी आठ्या जास्त... मी -म्हणजे? तो - अरे इथे कसे आपण डिश आवडली तर जोरदार टाळी वाजवतो, झक्कास करुन आवाज देतो, अऽऽऽब्ब करुन ढेकर देतो. मी - हो...

येडा टिंब

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 06/10/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुस्वार नाकातुन गाणारा एक स्वल्पविराम मधेच थांबणारा एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला अन मी एक येडा टिंब बरेच काही सांगणारा कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम, तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा ...

पैंजण...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/10/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भीती वाटु लागलेय आजकाल.., माझ्याच पायातल्या पैंजणांची ! सदोदीत पाठलाग करणार्‍या.., त्यांच्या त्या किणकिणाटाची. खुप हौसेने घातलं होतं आईनं..., तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी ! वय वाढलं...., समज आली....., पण पैंजणांचा मोह सुटला नाही ! बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं..., तारुण्यात आल्यावर त्यांचं... स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं ! त्यांच्या मधुर किणकिणाटानं... मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई..., आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन ! पैंजण अजुनही आहे... पण आता मन मोहरत नाही..., आता थबकत नाहीत नजरादेखील...... राहुन राहुन वळते माझीच नजर...., पायातल्या उदास पैंजणांकडे..., परिस्थितीने त्यांच्यावर... उधळलेल्या उन्म
काव्यरस

बस....

लेखक मसक्कली यांनी मंगळवार, 06/10/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्णीय, मिसळपाव मित्रमण्डळी....हा प्रसन्ग रोज बर्‍याच मण्डळी सोबत होतो :B बस ने प्रवास करणारे लोक जास्त अनभवु शकतात... #:S स्टोप वर थाबुन रोज आपली बस यायच्या वाटेकडे डोळे लाउन पाहत आसतात्. : मग सुरु होते ती आपल्या बस शोधायची मोहीम...१ जाते २जाते जीव वैतागतो ~X( आनी बगता बगता सुरु होते ती खुन्नसेला... B) >:P बस दिसली की खुश होउन पुढे जातो .... :) पण्....जेव्हा कलते कि ती आपल्याला लागनारी बस नाही तर तिला आस तूच्छ लेखतो.. /:) नाही का... ;) >:) तर मित्र हो तुमी पन तुमचे अनुभव इकडे मान्डा... :) धन्यवाद...!!

भैरवी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 06/10/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही
काव्यरस

झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 06/10/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी आपलं माझ्या अंदाजाने आंतरजालावरिल पाकृनुसार बनवलेला कोल्हापुरी तांबडा रस्सा...हा माझा पहीलाच प्रयोग असल्याने तुमच्या काही सुचना असतील तर नक्की कळवा... साहीत्यः २ पाउंड चिकन (अंदाजे १ किलो पण बोनलेस चिकन घ्यायचं नाही.) ३ मध्यम कांदे १/२ वाटी किसलेले सुके खोबरे २ टेस्पून तीळ १ टेस्पून खसखस ५-६ मिरे (खालील मसाले नसतील तर गरम मसालाही वापरता येइल पण चवीत फरक मात्र जाणवेल.) ५-६ लवंग २-३ इंच दालचिनी १ बडी इलायची २-३ छोटी वेलची १-२ तमालपत्र ३-४ लसूण पाकळ्या २ इंच आलं ४-५ चमचे लाल तिखट (मी +२ च

एक दोन तीन चार...

लेखक मिसळभोक्ता यांनी सोमवार, 05/10/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी मिसळपावाचा ट्र्याकर काय दाखवत होता ते बघा: एक सत्य दोन साधू तिसरा डोळा - विचार करा माहिती अधिकार चार वर्षाचा... पंचाक्षरी आकांत काय मजा आहे, नाही ? अशी सगळी शीर्षके गोळा केलीत, तर कवयित्री शारदा लिमये, यांची एक नितांत सुंदर नादमधुर कविता सहज उपजेल. चला तर, लिहा कविता !

कवितेतील सौंदर्य स्थळं

लेखक नंदू यांनी सोमवार, 05/10/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाही दुखावणं हा या धाग्याचा उद्देश नाही. किंबहुना कवितेच्या व्याकरणाच्या आणि वृत्तांच्य्या क्लिश्टतेत न शिरता ढोबळमानाने तिची सौंदर्य स्थळं समजावून घेणं हाच आहे. आपल्या मिपावरील एका कवितेला मिळालेल्या प्रतिसादांकडे पाहता एकंदरीत ही कविता जवळ जवळ सर्वांनाच नादमाधुर्यामुळे आवडली आहे. नादमय रचना हे उत्तम काव्याचं एक लक्षण आहे हे मान्य पण केवळ नादमय शब्द रचनेमुळे कविता आवडली असं खरच म्हणता येतं का? असंच जर असेल तर कुठल्याही नादमय पण निरर्थक शब्द किंवा अक्षरांच्या रचनेला चांगली कविता म्हणावं का?

"याच साठी का केला होता अटटाहास".......

लेखक अनामिका यांनी सोमवार, 05/10/2009 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ठाकरे बंधुंमधे जी वर्चस्वाची लढाई सुरु आहे आणि त्यानिमित्ताने विधानसभा निवडणु़कीत उमेदवारांचा प्रचार करताना उपलब्धहोणारे व्यासपिठ हा जणु एखाद्या तमाशातील फड आहे ..................व सभांना उपस्थित असणारी जनता ही फेटे उडवुन दाद देणारी व नेहमीच बारिला हजेरी लावणारे रसिकजन आहेत अश्या थाटात ठाकरे द्वयींचा कलगीतुरा सुरु आहे .......दोघांनी नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा सोडुन एकमेकांची उणिदुणि ,उखाळ्यापाखाळ्या,कुलंगडि बाहेर काढत तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेला व सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक करमणु़कीच साधन उपलब्ध करुन दिलय?आणि त्यांचीच गादी त्यांचे समर्थक म्हणवणारे देखिल चालव