उद्धव-राजने एकत्र यावे का ?
शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबरनाथ पालिका , उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का ? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का ? उद्धव-राजने एकत्र यावे का ?
चाफेकळी नाक
मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे
आज पुन्हा मरणास पाहिले
मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे.
असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे.
अशी लाजू नको
अशी लाजू नको
अशी लाजू नको अशी मुरडू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ||
स्वप्नातले रुप आज सत्यात आले
हातात घेवून मी ते पारखले
सहवासात तुझ्या विसरलो जगा
अशा समयी वेळेची फिकीर नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१||
फुलापरी तुझा सुगंधीत गंध असे
तसाच गुलाबी रंग रूपास दिसे
रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके
दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०५/२०१०
काव्यरस
सत्यकथा: भाकड म्हैस!!
प्रास्ताविकः
साल १९६८...
भंडारा...
कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र)
दुपारची वेळ.
पोष्टमन टपाल देणास आत आला.
ते रजिस्टर टपाल होते.
नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले.
साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले.
तसे त्यांच्या चेहेर्यावरचे हाव भाव बदलू लागले.
जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते.
साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले.
दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या.
मोबाइल sms
रोज साधारण पाने ५००/१००० जणांना मोबाइल sms करायचे आहेत. मी सध्या way2sms वापरित आहे. पण एखादा चांगला पर्याय असेल तर सुचवा.
(टिप :sms हे जनजागृती, लोकशिक्षण ह्या कामकारिता वापरायचे आहेत)
सजा
उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!
दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते
धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!
अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?
पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!
ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २
गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मिसळपाववर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मिसळपाववर लिहिणार्यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे.
सर्व मान्यवर सदस्य बंधु-भगिनींना एक नम्र निवेदन....!
आज "अक्षय तृतीया..." परंपरेनुसार सोनेदागीने किंवा तत्सम वस्तु खरेदीसाठी, नातेसंबध प्रस्थापित करणेसाठी, अत्यंत शुभ मानला गेलेला मुहूर्त ! थोडक्यात काहीतरी "चांगली" खरेदी करावयाचा हा दिवस असे याचे शास्त्रात वर्णन केले गेले आहे आणि आपण ते प्रमाणभूत मानतो.
या संस्थळावर विविध विषयांवर चर्चा करताना आपण वारंवार पुस्तकांचा संदर्भ देत असतो. तेव्हा मी आपणास विनंती करीत आहे की, आजच्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण आपल्या आवडीच्या लेखकाचे (वा...अन्य कुठल्याही लेखकाचे) किमान एक पुस्तक खरेदी करावे. किंमत दुय्यम आहे. अगदी दहा-वीस रुपयांचा एक कविता संग्रह जरी घेतला तरी चालेल, पण घ्या !!
मिसळपाव