Skip to main content

सावरकर आणि क्रांती

लेखक अभिषेक९ यांनी शनिवार, 19/11/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
pic
देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन गोष्टींपलीकडे बघण्याची आवश्यकता होती. संह्याद्रीच्या कुशीतील चार-दोन किल्ले जिंकून स्वातंत्र्याची ज्योत फुंकणे ह्यात व्यवहार्यता होती पण ती मोगलांविरुद्ध! हाच मार्ग इंग्रजांच्या विरोधात केवळ अव्यवहार्यचं नाही तर भाबडेपणाचा होता.

|| सासूच्या नानाची टांग ||

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/11/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहॊ आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन! आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. . यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते. नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे.

ऊर्ध्वरेता

लेखक शरद यांनी शनिवार, 19/11/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऊर्ध्वरेता एकदा श्रीकृष्णाला भेटावयाला दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणासकट आले. यमुनेच्या पलिकडे वनांत त्यांनी मुक्काम ठोकला. श्रीकृष्णाची शिवाचे अंश असलेल्या दुर्वास ऋषींवर अनन्य भक्ती होती. तेव्हा दुर्वासांच्या भोजनाकरिता श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रीया भोजना़ची ताटे घेऊन निघाल्या. नदीपाशी येतात तो त्यांनी पाहिले की यमुना दुथडी भरून वहात आहे. आता काय करावयाचे? पलीकडे कसे जावयाचे ? त्या परत कृष्णाकडे आल्या व त्यांनी आपली अडचण त्याला सांगितली. तो म्हणाला " जा, यमुनेला सांगा की श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे ". स्त्रीया नदीपाशी आल्या व त्यांनी श्रीकृष्णाचा निरोप सांगितला.

झाडे वाट बघत बसतात ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 19/11/2011 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी बघतोय ह्या देशातील सूर्य बर्फात गुंडाळून ठेवलेला शुभ्र वाटतोय खुपसा पण तोंडावर बोट गप्प गप्प मुकामुकासा जीव गुदमरून जातोय त्याचा बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे बाहेर निसटले की तेही गारठून जातात लंगडत लंगडत खुरडत हलकेच झाडावर रेंगाळत बसतात शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर पिवळ्या उन्हाचा तुकडा हलकासा स्पर्श नुसता कोरडा निर्जीव केविलवाणा...!!
काव्यरस

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 18/11/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

आम्ही ट्रेकींग करतो ( म्हणे ) !

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 18/11/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
" मी या दगडांवरुन आजीबात येणार नाही आधीच सांगुन ठेवतो" आपल्या चिरकलेल्या आवाजात संज्याने डरकाळी फ़ोडली. " तु पक्का डरपोक रे लेकाचा, इथे काय हिमालय चढतोय का आपण?" रव्याने त्याच्या काळी पाच मधल्या आवाजात संज्याला सुनावले. " नालायका, हलकटा झालच तर मेंदुलेस माणसा या निसरड्या दगडावरुन डोंगर चढण्याला तु ट्रेकींग म्हणतोस?" संज्या बिथरला. " मग काय मुंबई पुणे रेल्वेट्रॅकवरुन चालण्याला ट्रेकिंग म्हणतात?" "ए, बास करा यार! आपण इथे ट्रेकींगला आलोय की भांडायला? तु गप रे संज्या.

जीवन

लेखक दि ग्रेट मराठा यांनी शुक्रवार, 18/11/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
चालणारे दोन पाय किती विसंगत। एक मागे असतो, एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो,मागच्याला अपमान नसतो। कारण त्यांना ठाऊक असत, क्षणात हे बदलणारं असतं। याचंच नाव जीवन असतं..!!

सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 18/11/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय... तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्‍या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय.. तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..) शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे.