Skip to main content

मी हा गेम पूर्ण खेळणार..

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 29/12/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तारुण्याच्या उंबरठयावर प्रवेश केलेला मी. सळसळतं रक्त,ओहटी न येणारं अविरत उधाण. सतत खळखळणारं मन स्वप्नांचे ढिगभर मनोरे, तरी पण का बरं वाटतं एवढं बोअर कुठून येत असेल ही अस्वस्थता जग भन्नाट वेगानं बदलतय मीच मागे पडतोय काय? का छळतेय ही बेचैनी ? का गुदमरतो जीव? का मोकळा श्वास घेताच येत नाही ? असेल प्रेम भंगाचा विरह? प्रेम तरी का म्हणावं त्याला? की असेल उतुंग भरारी घेतांनाच झालेला संधीपात? नि मग वाटते मरून जावसं... का बरं वाटत असावं असं..का? का हाच माझ्या जन्माचा हेतू? नाही नाही नाही .... आई बाबांना सांग, अर्धवट सोडून जाणार नाही हा गेम. नवं वर्षाच्या पूर्व संध्येला....
काव्यरस

कोलावरी गोदावरी

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 28/12/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कोलावरी डी गाण्याने कहर केलाय हे नक्की. लाखो बघे त्या गाण्याला मिळाले ही कमाल आहे. लाखो म्हंजे चाळीस पन्नास लाख वगैरे. गाणे खरेतर शून्य आहे. पण तरी एवढे बघे म्हंजे हल्लीच्या सांस्कृतिक चवीचा ही अंदाज बांधता येईल. असो. मी मात्र ते गाणे कानावर आल्या आल्या आणि त्याच्या प्रसिद्धीची बातमी समजताच एक फायदा करून घेतला. आमच्या गोदेची हेळसांड मला अगदी पाहवत नाई. नाशिकला उगम पावणारी गोदावरी नदी. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे समाजबांधव आणि भक्त आणि अन्य जन तिचा बरं महिने छळ करत असतात. तिची कधी एकदा "मिठी" करावी असे काहीसे जनतेला झाले की काय कुणास ठाऊक.

इन ट्रान्सिट...

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 28/12/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
टेंडरचे काम संपवून एअरपोर्टला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजलेच.मुंबईला जाणारी रात्री साडे नऊ वाजताची फ़्लाईट पकडायची म्हणजे आधीच उशीर झाला होता.गडबडीत ऒन्लाईन चेक-इन करता आले नव्हते. ई-तिकिटावर कन्फ़मर्ड असे स्टेटस जरी दाखवत होते तरी मनात थोडी धाकधुक होतीच. सामानाचे स्कॆनिंग वगैरे सोपस्कार पार पाडून आत जातो तो काउंटर समोर हि भली मोठी रांग पाहून पोटात गोळाच आला.इतर फ़्लाइटना असलेली गर्दी पाहता इमिग्रेशन व सेक्युरिटी चेक संपवायला अर्धा एक तास सहजच लागणार होता. साडे नऊ ची फ़्लाईट म्हणजे किमान नऊ वाजता बोर्डिंग करणे आवश्यक होते.आताशा माझा धीर सुटायला लागला होता. त्याला कारणही तसेच होते.

विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 28/12/2011 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी विमा प्रतिनीधी म्हणून अनेक व्यक्ती चांगले उत्पन्न मिळवत असतात हे सत्य आहे मात्र यात बरेच कष्ट करावे लागतात हि वस्तुस्थिती आहे. बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते. तसेच विमा हे काही गुंतवणूकीसाठी फार चांगले उत्पादन मानले जात नाही. टर्म इंशुरन्स हे जीवन विम्याचे शुध्द उत्पादन आहे मात्र एवढे एकच उत्पादन विकणे हे विमा प्रतिनीधीला पुरेसे उत्पन्न मिळवून देण्यास असमर्थ ठरते कारण याचा हप्ता कमी असतो व दुसरे म्हणजे लोकांमध्ये याची जागरुकता फारच कमी आहे.

आंदोलन आणि फलित

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 28/12/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली. आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते.

कर्नाळा किल्ला तो पाहू..!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 28/12/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ४.१५ चा कर्ण-कर्कश गजर उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये वाजला धडपडून जागा झालो. पटापट सगळं आवरून बाईक काढली आणी मित्राला घेऊन पनवेलच्या वाटेला लागलो. मुंबईकरांना कधी तरी अनुभवायला मिळणार्या पहाटेच्या गुलाबी थंडीने चांगलाच जोर पकडला होता. समोरून वेगाने येणार्या हवेने पायाला आणी हातांना चांगलेच कणके बसत होते. पनवेलला पोहचेपर्यंत ६.१५ वाजले होते. दिलेल्या वेळेप्रमाणे स्पा त्याच्या मित्राला घेऊन कल्याण-शिळ मार्गे पनवेलला एस टी स्टँडला हजर होता. वाजणारी थंडी कमी करण्यासाठी 'कटिंग' ची ऑर्डर देण्यात आली. चहा पिताना थोड्याफार गप्पा चालू होत्याच मग त्या तात्पुरत्या थांबवून आम्ही निघालो.