Skip to main content

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

इच्छा मरण

लेखक रघु सावंत यांनी बुधवार, 11/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला मरण यावे ते समुद्रात यावे एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे. कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट किंमत कमी करून मी दिली सारात सोडून त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे खोबरं लाल तिखट धण

‘निया’ मधल्या लाकडी पाट्या

लेखक ए.चंद्रशेखर यांनी बुधवार, 11/01/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.

सो...हम....सो...हम!!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 11/01/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रमंडळींनो, `आपला अभिजित` नावाने मिपावर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून मिपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. मिपावर एकाहून एक सरस आणि सुरस लेखकु असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. मिपावर तर फिरकलो नव्हतोच, पण ब्लाॅगलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. टीव्ही सिरियलच्या लिखाणात.

चित्रपट ओळख - द लास्ट सामुराई

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा : या लेखात चित्रपटाच्या शेवटाबद्दल माहिती कळू शकते. *** They say Japan was made by a sword. They say the old gods dipped a coral blade into the ocean and when they pulled it out, four perfect drops fell back into the sea. And those drops became the islands of Japan.

खादाड कंपू-२०१२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 10/01/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्य

नृपशंभू- छत्रपती संभाजी !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 10/01/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला 'साहित्यिक' , त्यांच्या परमप्रतापी कारकीर्दीमुळे असेल,त्यांच्या छत्रपती असण्यानी असेल किंवा इतिहासकार,नाटककारांनी त्यांच्यावर जी गरळ ओकली त्यामुळे असेल... त्यांच्यातला साहित्यिक फारसा लोकांपुढे आला नाही. ८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या या छत्रपतीने 'बुधभूषण' हा संस्कृत तर सातसतक,नखसिख आणि नायिकाभेद हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्य