Skip to main content

चांगुलपणा !

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/07/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात. थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’ हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’! शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले.

सफरचंद हलवा by Namrata's CookBook :१२

लेखक Namokar यांनी गुरुवार, 25/07/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ३० मिनिटे(*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल) लागणारे जिन्नस: सफरचंद तुप साखर वेलची पुड साय काजू , बदाम क्रमवार पाककृती: १. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या २. कढई मध्ये तुप घ्या ३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या ४.

ब्रिटनचे भावी मंत्रिमंडळ आणि तुर्कांचा / भारतीयांचा बदला

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/07/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ बातमी Britain now has the most 'desi' Cabinet in its history ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापित होणार्‍या बोरीस जॉन्सन या ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. त्यात महत्त्वाची पदे अशी... १.

विसरून जाण्याजोग्या आठवणी

लेखक deepak.patel यांनी गुरुवार, 25/07/2019 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर हल्लीच शाळा कॉलेजातील अविस्मरणीय आठवणींबद्दल चर्चा वाचली होती. त्यावर लिहिण्यासारख्या बर्‍याच आठवणी आहेत, पण माझ्यापाशी शाळेतल्या दिवसांमधल्या कायमच्या विसरून जाण्याजोग्याही बर्‍याच आठवणी आहेत. आज त्याच लिहाव्या असं वाटलं. माझ्या शाळा होती मुंबईत. म्हणजे अगदी शिवाजी पार्क, गिरगांव अशी खुद्द मुंबईतल्या भागांमध्ये नाही तर एका उपनगरामध्ये. शाळा चांगली होती, उत्तम शिक्षक होते. अभ्यास, परिक्षा, इतर उपक्रम सगळ्याची योग्य सांगड घातली जाई. शाळेतली मुलंही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधली होती.

वारंवार लिहावी लागणारी वाक्ये

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 24/07/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
*Texpand App* बर्‍याच वेळा आपल्याला तीच तीच वाक्ये वारंवार वापरावी लागतात.दरवेळी टंकायचा कंटाळा येतो.अशावेळी ही वारंवार टायपावी लागणारी वाक्ये कोणीतरी टाईप करुन दिली तर? अशी सोय असणारी ही छोटीशी अॅप. १. या अॅपला इतर अॅपवर वापरण्यास परवानगी द्या. २.

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 24/07/2019 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

युगांतर - आरंभ अंताचा भाग ८ व ९

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 24/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
देवव्रत.... त्याने हस्तगत केलेल्या शस्त्रांपुढे एकही राजा शस्त्र उचलू धजत नव्हता. त्याची किर्ती सर्वत्र पसरली. शंतनूची राजगादी सांभाळणारा एक उत्तम राजा म्हणून देवव्रत सोडून बाकी कोणी नव्हते. धर्म, न्याय, युद्धकला..... सर्वोत्तम होता देवव्रत! राज्याबद्दल त्याला वाटणारी आपुलकी, जिव्हाळा! राजाला शोभेल असेच त्याचे वर्तन होते. त्याच्या कर्तव्यदक्षपणा बद्दल शंतनूला दाट विश्वास होता. शंतनू आता निश्चिंत झाला होता. वनविहार करत अनेकदा नदी काठी जाऊन बसायचा. प्रवाहाच्या जलावर हात फिरवत जुन्या आठवणी ताज्या करण्यात त्याला रस वाटू लागला. असेच एका दिवशी शंतनू नदीकाठी बसला होता.

आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 24/07/2019 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो.

पाण्याची शेती कशी कराल ? पाणी पेरलंत, तरंच उगवेल !

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 24/07/2019 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष *पाण्याचीच शेती* करण्याची वेळ आली आहे. 'पेरलंत तरंच उगवेल' हा पारंपरिक शेतीचा मंत्रच ह्या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. *"पाण्याची शेती"*, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल हे संगण्यासाठीच हे *"पागोळी वाचवा अभियान".* आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या *"पागोळी वाचवा अभियानाला"* लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.