Skip to main content

सायबर क्राइम - काळजी घ्या

लेखक कौटील्य यांनी शुक्रवार, 02/11/2007 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच नासिकअपडेट वर वाचलेली बातमी क्रुपया योग्य काळजी घ्या http://nasikupdate.com/node/440 बातमी खालिलप्रमाणे ---------------------------------------------------------------------------------------- नाशिकमध्ये सायबर क्राईमचा शिरकाव; उद्योजकाच्या नावाने बनावट मेल; गंडा घालण्याचा प्रयत्न फसला मी नायजेरियात आलो आहे. माझी पैशांची बॅग टॅक्सीत राहून गेली, आता भारतात परतण्यासाठी मला दोन हजार डॉलर तातडीने पाठवा....

बातमीतील अवतरण चिन्हांचे महत्व

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 02/11/2007 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक सकाळ दि.२ नोव्हे. २००७
एकट्यानेच "समाजसेवा' केल्याने "घाट्या'तील "वाटे'करी संतापले!
पुणे, ता. १ - ठरलेल्या "वाट्या'त "घाटा' झाल्यामुळे महापालिकेतील एका समितीच्या माननीयांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाल्याची चर्चा सध्या महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. ....... "दिलेला शब्द पाळा,' असा इशारा इतरांनी दिल्यामुळे तेथील प्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

एक तत्व नाम

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/11/2007 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संतसाहीत्यात "नामाचा महीमा" सांगीतला आहे. एखादे नाव सतत घेतले तर त्यात तसे नाम घेणारी व्यक्ती आंतर्बाह्य समरस कशी होऊ शकते याचे हे उदाहरण :-) --------- सोनियांनी देशासाठी गोळ्या झेलल्या - कोडा [ Thursday, November 01, 2007 05:44:44 pm] रांची मटा ऑनलाइन वृत्त सोनिया गांधी यांनी आपल्या देहावर गोळ्या झेलून देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, अशी गोंधळलेली आदरांजली झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वाहिली.

आधुनिक युधिष्ठीर

लेखक जुना अभिजित यांनी शुक्रवार, 02/11/2007 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी पहा: http://www.esakal.com/esakal/11022007/SpecialnewsF062EE1421.htm महाभारत आणि रामायण यात एक मूळ फरक सांगीतला जातो. रामायण हे देव, देवाचा अवतार, आयडीयली लोकांनी कसं असायला हवं वगैरे वगैरे रामराज्य वगैरे वगैरे सांगतं आणि महाभारत हे मनुष्य स्वभाव, षडरिपु, असं असताना माणसाच कर्तव्य काय वगैरे सांगतं. कृष्ण तिथे आहे पण तोही कलियुगाला मानतोय. महाभारत आजही चालू आहे. आणि वरच्य बातमीत गावकर्‍यांनी आधुनिक युधिष्ठीराला ५ हजार अजून द्यायला लावून जुगार्‍यांना पळवून लावले हे कदाचित महाभारताचे फलित असावे.

दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/11/2007 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू अमेरिकन फांऊंडेशनच्या प्रयत्नाने अमेरिकन काँग्रेस (३५८-०) दिवाळी निमित्त ठराव संमत झाला. तसाच ठराव हा सिनेटमधे पण आहे आणि तो अजून मतदानास येयचा आहे. यात (हिंदू अमेरिकन फांऊंडेश) माझ्या माहीतीप्रमाणे, सर्व अमेरिकेत जन्माला आलेली दुसरी भारतीय पिढी, पेशाने डॉक्टर्स/वकील आणि पॉलीसीमधे कामे करणारी आहेत. या ठरावाची भाषा वाचण्यासारखी वाटली म्हणून येथे जशीच्या तशी इंग्रजीत चिकटवत आहे. मूळ माहीती सारखी आहे फक्त सिनेट/हाऊस मधील ठराव थोडासा वेगळा आहे. 110th CONGRESS House resolution 747 S. RES. 299 Recognizing the religious and historical significance of the festival of Diwali.

माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन )

लेखक kolhapuri यांनी बुधवार, 31/10/2007 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन ) - मिश्टर मिनेश भूभू मध्ये एका आद्य वगैरे संकेतस्थळावर एक मनुष्य केनिया वगैरे देशांवर लिहिण्याच्या निमित्ताने गौरवपर आत्मचरित्रच लिहित होते. आमचाही तसाच प्रयत्न. तुला दोन महिन्याच्या कामाला जकार्ताला जायचय अस साहेबाने फर्मावल्यावर मी म्हनलो बर आहे. तसही मी बर्‍याच देशात फिरलो असलो तरी या भागात कधी गेलो नव्हतो. आणि मला फिरण्याची तर खूपच आवड. माझा स्वभावही बोलका, मनमिळावू. पण जकार्ताशी संबंध आला नव्हता कधी. आणि आला तो मित्रांना तिकडचे टॉम याम सूप करून देण्यापुरता.

तुझ्या एका शब्दासाठी

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 30/10/2007 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या एका शब्दासाठी
तुझ्या एका शब्दासाठी वाट किती मी पहावी तुझ्या एका शब्दामुळे मला कविता सुचावी माझी कविता अधुरी तुझ्या एका शब्दाविना जसा जीव चातकाचा तडफडे थेंबाविना तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले स्वप्नपाखरासवे मी शब्दशिंपले गुंफले तुझा शब्द येता कानी देहभान हरपले "काव्य झाले तनमन," माझे आभाळ बोलले!!!
Taxonomy upgrade extras

पानगळीचे वैभव

लेखक धनंजय यांनी सोमवार, 29/10/2007 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचे वैभव ********************************** * मस्त सुस्त महिने ग्रीष्माचे । मंद रात्रिचे, दिन उष्म्याचे दवबिंदूमात्रावर जगती । हिरव्या वल्ली हिरव्या जगतीं * उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी! खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती * दमून दंगुन उन्हात गुंगुन । चराचर जणू निवांत बैसुन - पेंगुळलेला निसर्ग करितो । पेंगुळलेल्या कुतूहला तो * अक्तूबरस्य प्रथमे दिवसे । शिरशिर वारे घेऊनि वळसे झाडाझाडापाशी सांगीं । हेमंत-शिशिर तिष्ठतिं रांगीं * त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्

एका शीघ्र कवितेचे दिर्घ काळाने विडंबन !

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 29/10/2007 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
सखे........! जा,आज प्रेमाला रंग चढेना, आपले काय बिनसले ? कधी तरी 'मुक्या'ने हे बोलणारच होतो, वेदनेला अश्रुत जाळणार होतो. सखे ....! तु एकदा ये काय! या शहरातून त्या शहरात, माणसाच्या विचारांच्या वणव्यात, मराठी शब्दांच्या भावविश्वात. त्या संस्थळावरुन या संस्थळावर, 'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !! मिसळपाववर भांडण आपले रंगेना ! वाचून आली तशी निघून जा!