Skip to main content

जाणीव

लेखक मनीषा यांनी सोमवार, 06/10/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी दुःख माझं कण्हत राहतं अश्र्रुंना वाट देत राहतं आयुष्य संपलेलं कणाकणांनी जाणीवेच्या टोकांनी बोचत राहतं नाही कधी केला विचार अधिकाचा जे सामोरं आलं तेच माझं होतं एकेक धागा उकलून आयुष्याची वीण उसवलेली आणि सांधण्यासाठी सुईचं टोक मोडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन बोचर्‍या शब्दांचे आघात सहन करून, भावनांचं तळं गोठत राहतं कशाची तक्रार? चिंता ही कसली? दुसरं टोक आयुष्याचं आपणहून जवळ येत जातं यातनांनी मात दिली माझ्या जाणीवांना आणि मानलं मी की आभाळच माझं तितकंसं मोठं नव्हतं

नवी बाटली, जुनी दारु ...

लेखक अभिजीत यांनी सोमवार, 06/10/2008 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक कोंबडा उंच झाडावर आरामात शीळ घालत मजेत बसला होता. एक भुकेलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. आता ह्या कोंबड्याची शिकार करून टाकू असा विचार करीत कोल्हा त्याला म्हणाला, "मित्रा, तुला जंगलातला 'सर्वंकष शांती आणि एकोपा' हा नवा नियम कळला का? अरे, आता नव्या तहानुसार, कोणीही कोणाची शि़कार करणार नाही आणि या जंगलातील सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहतील. आता तू मला तुझा मित्रच मान आणि इथे खाली ये. आपण एकत्र इथेच गप्पा मारू." कोंबडा यावर काहीच बोलला नाही. त्याला कोल्ह्याच्या लबाड स्वभावाची कल्पना होती. कोंबड्याने मान उंच करून दूरवर बघत असल्याचा बहाणा केला.

उमेद

लेखक फटू यांनी सोमवार, 06/10/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुझ्या जगात उलथापालथ होताना कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही, तुला आधाराची नितांत गरज असताना निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही, कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही, नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही, जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं, निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं, माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरू
Taxonomy upgrade extras

नाडी ग्रंथ पुरावा आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 06/10/2008 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
नाडी भविष्य आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य 'नाडी भविष्यावर आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.' पुन्हा पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!

मध्यान

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/10/2008 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
वय तुझे होता चाळीस पाहून आठवते मज ते मध्यान पाहता मागे वळून डोकावते मन चार दशकातून पहीले दशक गेले अल्लड्तेतून दूसरे गेले अध्यापनातून तिसरे दशक निघून गेले विश्वाच्या रहस्याला उलगडण्यातून चवथ्या दशका मधून जाईल तो समय अनुभवण्यातून नंतर येवोत अनेक दशके एकामागून लिहीली जातील पाने इतिहासाची भुतकाळाला निश्चीत स्मरून श्रीकृष्ण सामंत

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली.... भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते. मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे.... ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते... आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे.

मी काय केले असते ?(फक्त प्रोढाकरीता)

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 05/10/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/3884 http://www.misalpav.com/node/3525 सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट नक्की कळली आहे की माझी लेखनाची शैली क्लिष्ट आणि काही जणांना अगम्य वाटली आहे.मनोरंजक नक्कीच वाटली असावी.माझीसुद्धा करमणूक झाली. असो.

सोबत

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
नाना भटजी हे गावाच्या पंचक्रोशीतले एकमेव भटजी... तसे भिक्षुकी करणारे आणखी एक दोन जण होते.. पण नाना हे जुनेजाणते आणि स्वभावाने अत्यंत गरीब त्यामुळे त्यांना मागणी फार.. वर्षभर काहीनाकाही धार्मिक कृत्ये चालू असल्यामुळे नानांना अजिबात वेळ नसे. त्यातून गणेशोत्सवात तर बघायलाच नको. सकाळी जे पहाटे ४वाजता बाहेर पडत ते संध्याकाळी दमूनभागून घरी परतत.