जाणीव
लेखनविषय:
कुठेतरी दुःख माझं
कण्हत राहतं
अश्र्रुंना वाट
देत राहतं
आयुष्य संपलेलं
कणाकणांनी
जाणीवेच्या टोकांनी
बोचत राहतं
नाही कधी केला
विचार अधिकाचा
जे सामोरं आलं
तेच माझं होतं
एकेक धागा उकलून
आयुष्याची वीण
उसवलेली
आणि सांधण्यासाठी
सुईचं टोक
मोडलेलं असतं
नजरांचे ते असंख्य वार
अन बोचर्या शब्दांचे आघात
सहन करून,
भावनांचं तळं
गोठत राहतं
कशाची तक्रार?
चिंता ही कसली?
दुसरं टोक आयुष्याचं
आपणहून
जवळ येत जातं
यातनांनी मात दिली
माझ्या जाणीवांना
आणि मानलं मी
की आभाळच माझं
तितकंसं मोठं नव्हतं
वाचने
2915
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
यातनांनी
वा!
सुरेख !!
मस्त
छान
सर्वांचे---
सारो छे
सुंदर कविता
खूप आवडली!!
छान
आवडली..