आंधळ्याच नशीब
अंधा-या रात्री चालत होता एक आंधळा
भुकेले पोट व घेउन सुका गळा
रात्र की दीवस त्याला न कळे,कसे कळणार होते डोळे आंधळे,
रस्त्यावरच्या वाहनांची गती ना कळली,
गतिमान गाडी त्याच्या देहावर वळली.
"परमात्म्याने ही सजा का दीली?",
कळायच्या आत हे,त्याची प्राणज्योत विझली.
गेला मात्र स्वर्गात्,भेटला परमात्मा,
दु:खी होउन 'त्याने',सोडला धरतीवर आत्मा.
आंधळ्याची ती आत्मा होती तर डोळस,
पाहुन धरतीवरील दु:ख झाला दु:खाचा कळस.
असह्य झाल्या त्या वेदना,गेला तो वरती,
म्हणे "काय पाहु ती दु:खी व लोभी धरती"
परमात्मा म्हणे , "तु दु:खी खाली पण व वरती,
काय कामाची तुझ्या ती सुंदर,रम्य धरती?"
Note : हे अकलीचे तारे आम्ही ईयत्ता
काव्यरस
मिसळपाव
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.
येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.
सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.
मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता.