Skip to main content

ते क्षण जे त्यानं दिले

लेखक निनाव यांनी रविवार, 06/03/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानं ओतले जाता जाता ओंजळीत माझ्या चांदणे निसटले ते, विझले सारे - मग मीच मज वेचले असे दिले त्याने मज ते क्षण मीच होते बहरले सावत्र जरी दुखं, जपले मी होते त्यानं दिले तहान राहीली तशीच, अन होडी सागरा मधेच वारं सगळं घेउन गेला तो, होते त्याने वाहिले गोष्टी वाचते मी पुन्हा-पुन्हा त्याच्या पुस्तकातल्या शोधते ते, शब्द सारे - माझेच ते हरवले!

पत्रलेखन ... हरवत चाललेला ठेवा

लेखक शरद यांनी रविवार, 06/03/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. पंगुशेठ यांचा लेख वाचला आणि एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी बराह, श्रीलिपी वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुण्याहून अमेरिकेतल्या आपल्या लाडक्या लेकीला ई-मेल पाठवतांना आईला इंग्रजीशिवाय पर्याय नव्हता. आणि हे माध्यम भावना, तळमळ कळवण्यास तसे निरुपयोगीच. मी एक सोपा उपाय सुचवला होता. एक साधा स्कॅनर घ्या, कागदावर स्वहस्ताने खरडलेले पत्र स्कॅन करा व द्या पाठवून. निदान दोघींनी तो मानला व त्याचा इतका उपयोग झाल्याचे दिसून आले की त्यांच्या मैत्रिणी घरी पत्र लिहावयाच्या व यांच्याकडे येऊन, ते स्कॅन करून, आपापल्या मुलींना "पत्र" पाठवावयाच्या.

मिशन हस्ताक्षर

लेखक पिंगू यांनी शनिवार, 05/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली. शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता.

कवितेपासून कवितेपर्यंत....प्रवाह कवितेचा.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 05/03/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मराठी दिनानिमित्त विविध उत्तम लेखन वाचायला मिळत आहेत तेव्हा आमचेही दोन शब्द. मराठी कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आवडणा-या कवितांची आठवण होते. आपापल्या आवडत्या कवींच्या कविता डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. काही कवितेच्या ओळी आठवतात. काही कवितेच्या शब्द, प्रतिमा आठवतात. काही कवितेचे आशय आठवतात तर कधी नुसतीच कवींची आठवण होते. कवितेचा प्रवास सुरु झाला तो ''माझा म‍-हाटिची बोल कौतुके । परि अमृतातेंही पैजा जिंके ॥”म्हणणा-या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून. संत ज्ञानेश्वरापासून सुरु झालेला हा कवितेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे.
विशेष

(कसं काय टार्‍या बरं हाय का?)

लेखक अवलिया यांनी शनिवार, 05/03/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - ओळखा की वाईच... कसं काय टार्‍या बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, बाईकवाले तुम्ही न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, बॉडीवाले तुम्ही सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही सायटीवर गेला, कामेंट इडंबन करुन आला खरं काय हो पाटील ? कुनाची खेचली, कळलं का न्हाई, आज तरि परतिसाद देनार का ? काल म्हनं तुम्ही रागावुन गेला, खरडीचा दरवाजा बंदच केला आरंरं केली साठमारी, चावडीच्या दारी, आज काय करायचं ऱ्हायलंय का ? काल म्हनं तुम्ही जाब इचारला, अन्‌ फुकाट शो देऊन बसला आगं बया बया काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, पालिशीप्रमाने समदं चाललंय का
काव्यरस

दाबेली काका

लेखक गुड्डु यांनी शनिवार, 05/03/2011 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझा एक अनुभव सांगणार आहे. ज्यामुळे मी माझी कोणालाही नावे ठेवण्याची सवय सोडली नाही पण खुप कमी केली. तर गोष्ट ८ वर्ष जुनी आहे.मी आणि माझी बहीण रोज संध्याकाळी फीरायला जायचो येताना ८.३०,८.४५ वाजता एक दाबेली च्या गाडीवर एक जुजबी ओळख असलेले काका दिसायचे. ३-३,४-४ दाबेल्या आपले खात असयचे. आता बघा ७५-८० वय असलेला माणुस असा जंक फूड खाताना बघुन काय विचार येणार?

हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात?

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 05/03/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ.