Skip to main content

"पांगिरा"

लेखक गणेशा यांनी रविवार, 22/05/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
"पांगिरा" कथा : विश्वास पाटील दिगदर्शन: राजीव पाटील ( जोगवा फेम) --- काय लिहु तेच जास्त कळत नाहि इतका भिषण वास्तववादी आघात झालाय मनावर... ह्या चित्रपटातुन जे चित्रण दाखवले गेले आहे, ते आपल्या अवतीभोवती आपण कायम पहात असतो- ऐकत असतो आणि त्यामुळे शेतकर्यांच्या जीवनाबद्दल तेथील राजकारनाबद्दल विचार करताना मनात कमालीची अस्वस्थता आणते आहे.. सामान्य गावामध्ये वस्तीवरती लोक कसे जीवन जगतायेत.. राजकारणी -सरपंच सरकारी योजनांचा बोजवारा वाजवुन कसा पैसा उकळतो.. गावातील -वस्तीवरील लोकांच्या रोजचे जीवन तर खरेच मन पिळवटुन टाकणारे आहेत.. त्यांचे आभाळाच्या पांघरुनाखाली निजलेले स्वप्न पिक .. त्याची चिंता ..

नवाज शरीफ सही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 22/05/2011 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
नवाज शरीफ सही बोलले! (माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख) गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले.

एका घराची गोष्ट

लेखक पैसा यांनी रविवार, 22/05/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
maajhe ghar ही गोष्ट आहे या चित्रातल्या घराची. अगदी "खेड्यामधले घर कौलारू" म्हणण्यासारखं घर. कौलारू असलं तरी खेड्यातलं नाही. चांगलं रत्नागिरीत आहे. हे घर आहे माझ्या आजोबांचं. खरं तर त्यांच्या वडिलांचं. म्हणजे माझ्या पणजोबांचं. रत्नागिरीत वरची आळी तयार होण्यापूर्वी रहाट आगर नावाचा गाव होता तेव्हा तिथे बापटांची अनेक घरं होती. त्यातलं एक मोठं चौसोपी घर होतं माझ्या पणजोबांचं.

दोन छोटे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 22/05/2011 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्या- अताशा असे हे मला काय होते कॅलरि मोजिता रुचीहीन वाटे वर्षे उलटिता चहाची ही गोडी तिच्या हातची ती पळालीच कोठे ........ बाई- अताशा असे हे मला काय होते चहात साखर मी नेमकी विसरते थोडेची हे तोंड खट्टु बनविता कॅलरि घटविण्याचे तट्टु पळविते
काव्यरस

आपण असे कसे?

लेखक समीरसूर यांनी रविवार, 22/05/2011 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार! मी समीर बोलतोय व्यंकटेश रेसिडन्सीमधून. आमच्या बिल्डिंगची लिफ्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून बंद आहे. ज्येष्ठ मंडळी खाली फिरायला गेली आणि नंतर त्यांना चौथ्या-पाचव्या मजल्यावर जिन्याने जायला लागले. माझा वेगवेगळ्या नंबरवर मिळून हा पाचवा फोन आहे. कुणी येणार आहे का लिफ्ट दुरुस्त करायला?" "अर्ध्या तासात येतो साहेब." "असं आश्वासन तुमच्या कंपनीतल्या अजून कुणीतरी मला दोन तासांपूर्वी देखील दिलं होतं; त्यांचा अर्धा तास किती तासांचा आहे मला माहित नाही." "नाही, नाही...मी येतो नक्की" "ठीक आहे. मी वाट बघतो." अजून एक तासाने मी पुन्हा फोन लावतो. रात्रीचे दहा वाजलेले असतात.

भेळ

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/05/2011 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
==भेळ== तत्वांची मारामारी शब्दांचा खेळ,भावनेचा भडका व्यवहाराची भेळ॥ध्रु॥ घ्यायचे भरपुर चुरमुरे,वरुन फरसाणाचा भपका कांदा टोमेटो टाकुन,वरुन चिंच-पाण्याचा हबका डाव सरसरत फिरवुन दाखवायचा,पंचवीस रुपायाचा खेळ। गिह्राईक चांगलं हेरुन घ्यावं,मुठभर शेव पेरुन घ्यावं
काव्यरस

बायोफायबर हेअर इंप्लांट? कोणी केलंय का? माहीती?

लेखक pramanik यांनी शनिवार, 21/05/2011 05:51 या दिवशी प्रकाशित केले.
जय हींद, देहरुपी मंदीराच्या कळसावर केस कमी झलेत्,त्यात मागे डोक्यावर फराच कमी झालेत्,त्यांना मुलामा चढवावा म्हणुन तात्पुरते बायोफायबर हेअर इंप्लांट(म्हणजे जेवढा काळ टीकेल ते टीकेल) करवयाचे आहे,आता ते पहील्यापेक्षा सुरक्षित आहेत(इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स कमी). पण चमकणारे सोने नसते,पण नसतेच असेही नाही,म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काधायचा उद्देश्/हेतु आहे. ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया मदत कराव

उद्या कुठे भेटणार?

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 21/05/2011 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका मूलतत्ववाद्याच्या म्हणण्यानुसार आज २१ मे रोजी अंतिम निवाड्याचा दिवस (Day of reckoning) आहे. आज जगाचा शेवट होणार असून आपण केलेल्या कृत्यांचा हिशोब आज होणार आहे. तेव्हा उद्या सगळे तिकडेच म्हणजे चित्रगुप्ताच्या/सेंटपीटरच्या कोर्टात भेटू म्हणतो. अनायासे मिपा कट्टा पण होऊन जाईल. :) त्यानंतरही मिपा चालूच राहील अशी आशा आहे. पण मिपाचा सर्वर स्वर्गात असणार की नरकात? सर्व्हर स्वर्गात असेल तर मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल का? मी नरकात असणार याची खात्री आहे.