Skip to main content

चिरजीवीत कहाणी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 11/05/2012 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरले ते पळ,......मन भरुनी जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;.. शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी ............................अज्ञात
काव्यरस

'मनोगत' चे काय झाले?

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 10/05/2012 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे जालावर शुद्ध मराठीची सेवा करणारे संकेतस्थळ 'मनोगत' आज बंद पडलेले आहे. याबाबत कुठलिही पूर्वसुचना सदस्यांना दिली गेली नव्हती. तसेही गेले काही महिने ज्या प्रकारे मनोगत चालत होते त्यानुसार असे काही घडू शकते याची जाणिव होतीच. सन्माननिय मिपाकरांना याबाबत काही माहिती असल्यास येथे त्यावर प्रकाश टाकावा. 'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

१९ कोटी ४८ लाख

लेखक विकास यांनी गुरुवार, 10/05/2012 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
मटा मध्ये एक रोचक बातमी वाचनात आली: कसाबचा खर्च राज्याला परवडेनासा यातील मुख्य मुद्दा असा:कसाबच्या सुरक्षीत बंदोबस्तासाठी आर्थर रोड तुरूंगाच्या बाहेर इंडो-तिबेटीअन जवानांचा ताफा २८ मार्च २००९ पासून तैनात आहे. त्यांचा ३० सप्टेंबर २०११ पर्यंतचा जो खर्च झाला त्याची पावती राज्यसरकारकडे पाठवण्यात आली. या एका तैनातीचा या वेळेपुरता खर्च १९ कोटी ४८ लाख इतका आहे. राज्यसरकारचे म्हणणे असे आहे की २६/११ चा हल्ला देशावरचा होता आणि केंद्राने तो खर्च उचलावा... मला ते म्हणणे योग्य वाटते.

महाभारत.. माझा दृष्टीकोन

लेखक शरद यांनी गुरुवार, 10/05/2012 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत ... माझा दृष्टीकोन भारतातील लाखों लोक गेली शेकडो वर्षे महाभारत वाचत/ऐकत आले आहेत. या वाचक/श्रोत्यांचा या कथेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो. चला तर , या वाचकांची ( मी वाचक म्हणत असलो तरी वाचक/श्रोते यांचे गुणोत्तर १: १००० याच्यापेक्षा निराळे नसावे, ते बाजूला ठेवूं.) थोडी वर्गवारी करावयाचा प्रयत्न करू.. (१) भाविक .... लिहलेले खरेच घडले यावर निनांत श्रद्धा असलेले.(म्हणजे एकोणविसाव्या शतकांपूर्वेचे सगळेच व आता ९० टक्के) (२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात. यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे शून्य !

पाणी अडवा, पाणी मिळवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 10/05/2012 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा बराचसा भाग सध्या दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे भरडला जात आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील लोकांनाही करावा लागत आहे. पुण्यातही सध्या जवळपास ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याचा संभव आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाईचे प्रश्न नेहमीच उभा राहतो. पण या प्रश्नाची सोडवणुक करण्याचे अगदी सोपे मार्ग आपल्या हाती आहेत. पावसाळ्यात वाहुन वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य वापर केल्याने या समस्येचे स्वरुप बरेच सुकर होईल असे तज्ञांचे मत आहे.

फोटोशॉप -बुडबुडे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 09/05/2012 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोशॉप प्रेमी मिपाकरानो, या लेखातून मी आपल्याला फोट्शॉप सीएस ३ च्या साह्याने अ‍ॅनिमिशन कसे करायचे ते समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

दादा, तुस्सी ग्रेट थे!

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 09/05/2012 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत.