Skip to main content

हो सकता है..

लेखक mohite jeevan यांनी सोमवार, 20/01/2014 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशरावानी आता पर्यंत अनेक लोक पाहिले आहेत व पण स्वत: आदर्श व्यक्ती होण्याचा कल आसला तरी माणसाच्या स्वभावाचा आभ्यास करण्यास त्याना खुप रस आसे.म्हणुनतर समोर माणुस कसला ही आसला तरी ते त्याच्याशी चांगले बोलत,तसे त्याला अनेक प्रश्न करुन त्याचे निरक्षण करी,व त्या निरक्षणा वरुनच मग त्याच्या मनात एखादी व्यक्ती आशी आहे तशी आहे ठरवत. खुप ठीकाणी त्यानी नोकरी केली पण आज ज्या नोकरीवर आहेत ते आँफीस काम आसले तरी एक समस्या होती.

आडनाव रिटायर करावे काय?

लेखक चिन्मय खंडागळे यांनी रविवार, 19/01/2014 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
'जात नाही ती जात' हे वाक्य क्लिशे होण्याइतकं वापरलं गेलं आहे तरी त्यातलं सत्य कमी होत नाही. किंबहुना अशी वाक्यं क्लिशे होण्यामागे ती नको तितकी खरी असतात, हेच खरं कारण असतं. याचा अर्थ आपण जातिनिर्मूलन करण्याचा प्रयत्नच सोडून द्यावा असा नाही, पण जातीपाती आपल्या समाजात एवढ्या घट्ट चिकटून राहण्यासाठी जे कॅटॅलिस्ट आहेत, त्यांच्यापैकी जमतील तेवढे हळूहळू बाजूला काढणं करता येऊ शकतं. आपल्या समाजाची एक खासियत सांगता येईल की, आडनावावरून जात ओळखण्यात आपण सर्व तरबेज असतो.

अंडा भुर्जी

लेखक मुक्तचिंतक यांनी रविवार, 19/01/2014 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य ३ अंडे २ बारीक चिरलेले कांदे १ बारीक चिरलेला टोमाटो ३-४ ठेचलेल्या हिरव्या मिरच्या २-३ चमचे कांदा लसून मसाला १ छोटा चमचा तिखट १ चमचा जिरे हिंग व मीठ चवीनुसार Sahitya कृती प्रथम एका नॉन स्टिक कढई मध्ये तेल तापवावे.

गाणी मनातली: राजा ललकारी अशी घे

लेखक निमिष ध. यांनी रविवार, 19/01/2014 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना बरीच मराठी गाणी ऐकली जायची. तसेही संगमनेर हे ग्रामीण आणि शहरी जीवनाचा संगम असलेले गाव होते त्यामुळे त्याकाळी आलेल्या "अरे संसार संसार" चित्रपटातील गाणी आवडीने सगळीकडे लावली जायची. एक सुंदर ग्रामीण चित्रपट आणि रंजना व कुलदीप पवार यांचा तितकाच सुंदर अभिनय.

छायागीत ३ - जिस तरहा से थोडीसी तेरे साथ कटी है...

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 19/01/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजकुमारच्या विक्षीप्तपणाबद्दल कोणी काही म्हणो पण तो एक जबरदस्त अभिनेता होता आणि त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स असलेल्या अभिनेत्यांची गणना हिन्दीत तरी फार नसावी. त्यानंतर काहीतरी झाले आणि उतारवयात जानीसाहेब पडद्यापेक्षा मोठे झाले आणि घशातुन जास्तच खरबरीत आवाज निघु लागला. पूढे त्यावर अनेक मिमिक्री आर्टीस्टनी त्यावर टाळ्या मिळवल्या. "आपका मंगलसूत्र कहां है" असे बप्पी लाहीरीला ऐकवणार्‍या जानीचा येथे विचार नाही. मला भावलेला राजकुमार हा अतिशय संवेदनशील अभिनेता आहे.

शिव: मूर्तीशास्त्र

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 19/01/2014 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

काळ्या गाजराची कांजी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 19/01/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते.

स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास भाग २: आणि शरद पवारांची बस कायमची चुकली

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 19/01/2014 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला परिस्थिती अनुकूल असताना एखादा महत्वाचा निर्णय धडाडीने वेळेत घेतला नाही तर तशी अनुकूल संधी परत येतेच असे नाही आणि मग बस चुकते ती कायमचीच.अशा परिस्थितीत हळहळ व्यक्त करण्यापेक्षा फारसे काही करता नाही.आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात अशी वेळ नक्कीच येतात.मग राजकीय नेतेही त्याला अपवाद कसे असतील?माझ्या मते अशी वेळ एकदा नक्कीच आली होती.आयत्या वेळी महत्वाचा निर्णय घेताना लागणारी धडाडी न दाखविल्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे नेते व्हायची संधी त्यांनी घालवली. ३० मार्च १९९७ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतला.त्यामागे तात्कालिक असे कोणतेच कारण नव

विवाह कायदा आणि विधी

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 19/01/2014 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या... स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते.