हरिश्चंद्र-शशक+
तू कुठे इकडे?कोण गेलं?
थंडीत जळत्या सरणा समोर तो एकटाच बसला होता.
जास्तच कुरेदल्यावर,तो आपली रामकथा सांगू लागला.
"बाप कबाडी होता.रस्त्याच्या कडेला कबाडातच मेला. या जगात तो आणी मीच.
जाणाऱ्या येणाऱ्यानां वाटत होते बेवडा आहे. दोन चार गाडीवाल्यांनी पाच दहा रूपायाच्या नोटा फेकल्या आणी पुढल्या जन्मासाठी पुण्य कमावलं.शेवटी तिथल्याच एका हातगाडीवर टाकला व मसणात विल्हेवाट लावली.
छडा गिरधारी, ना लोटा ना थाली.
सरकारी लोक देतात थोडेफार.
मिसळपाव