Skip to main content

भुईक

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 06/11/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं" बापुराव घुश्श्यातचं बोलला. "आरं पण यवढं झालचं कसं?, लिंब्यानं कायचं कसं न्हाय क्येलं" पाटील पानाचा तोबरा भरत बोललं. "यका बुक्कीत कुठं येवढं रगात येतं व्हयं, गणा बिना फुटला आसल" चवढ्यावर बसलेला मारुती घाऱ्या डोळ्यांनी बघत बोलला. "ते काय नाय पाटील पोराचा जीव बीव गेला आसता तर, केवढ्याला पडलं आसतं बोला" बापुराव पेटला. "येका बुक्कीत जीव जायला त्येच्यात काय आवसानच न्हाय वयं, उग काय बी बोलू नगु , घ्या मिटवा मिटवी करुन" पाटील सामोपचाराचं बोललं. "आसं कसं मिटवायचं, ह्येच्या नाग्याचं डोस्कं बिस्क फुटलं आसतं तर घीतली आसती का ह्यनं मिटवामिटवी करुन?" बापु

घरोघरी पुरस्कार वापसी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
“आज तर तुझ्या सवेंदनहीनतेचा कळसच झालायं!” आदिती तणतणत समोरच्या हॉलमधे आली. अक्षय फेसबुक आणि ट्वीटर वर आजकाल रोजच मिळणारे असहिष्णुतेचे पोस्टस चघळत होता. खरतरं असल्या पोस्टस विषयी त्याचीच सहिष्णुता आता संपुष्टात आली होती. त्यामुळे फेसबुकाने केव्हाच्या जाहीर केलेल्या सात भावचित्रांची तो आतुरतेने वाट पहात होता. “जानू, काय झालं?” त्याने शंभर लाईक्सने ओथंबलेल्या आवाजात विचारले. “मी किचनमध्ये मरमर मरतेय, आणि तू मजेत फेसबुक-फेसबुक खेळत बसलाय!” “अग मी माझी मेल चेक करत होतो. बॉसचा एक अर्जंट इमेल यायचाय नां!” “मला उगाच काऊचिऊच्या गोष्टी सांगू नकोस. तू आजकाल फारच असहिष्णूतेने वागतोयसं!

थोडी गम्मत

लेखक मीउमेश यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत. आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती. किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत. फार गम्मत आहे ना, मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल. थोडी गम्मत

तो अनुभव...

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही. लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या. सायकलीवर कामाला जाणारे सगळे खंडोबाचा माळ अकुरडी येथे बुधवारी रात्री १२ च्या पुढे जमा व्हायचे.

अंदमान - एक अविस्मरणीय सफर-२

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 06/11/2015 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ http://www.misalpav.com/node/33551#new रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते. आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात. १.

ती येणार म्हणून ......

लेखक दत्ताभाऊ गोंदीकर यांनी शुक्रवार, 06/11/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलाच प्रयत्न आहे ..... ती येणार म्हणून मी फुलांचा गुच्छ केला नवा पोशाख केला अत्तराचा वास केला नजरेचे करून बाण तिच्या रस्त्यावर लावले कल्पनाचे तन मनात वाढले"१" दुसरं काहीच सुचत नव्हतं माझं प्रेम फक्त तिच्यावर होतं डोळ्यासमोर चेहरा मनातले विचार फक्त तिचे होते "२" चातका परी वाट पाहीली पहिली घटका निघून गेली पाण्याविना मासा तळमळला जीव तसा"३" वादळाने पाने गळावी तशी स्वप्ने गळाली तरी राहावत नव्हतं तिथून जावत नव्हतं "४" दिवस झुकाय लागला फुलं सुकायं लागली भास होत होता मागे पुढे पहाता फुले फेकली रस्त्यावर जाता जाता "५" शेवटी ती आली फुले तुडवून गेली तरी ही मी तिथंच उ

वामन..राणी व भैरव बाबा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/11/2015 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
वामन..राणी व भैरव बाबा ३ बॆडरुम च्या ब्लोक मधल्या एका प्रशस्त बेडरुम मधिल बेड वर वामन तळमळत पडला होता. गेले सहा महिने झाले असतिल वामन ला अर्धांग वायुचा झटका आला..

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू

लेखक मोदक यांनी गुरुवार, 05/11/2015 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
. .  ******************************************************************* ही कथा आहे अपहरण झालेल्या एका विमानाची.. दोनशे छप्पन्न प्रवाशांची.. बारा विमान कर्मचार्‍यांची.. दहा दहशतवाद्यांची.. दोनशे ऐंशी इस्रायली जवानांची.. हजारो युगांडन सैनीकांची.. जगातल्या प्रत्येक देशाची, त्यांच्या पंतप्रधानांची, त्यांच्या प्रजेची..