Skip to main content

ठिकरी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 28/09/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... " 'त्याच्या' दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे राधा फक्त पाहत राहायची ..... रिकामं केलेलं मन पुन्हा एका नजरेने गच्च भरून जायचा .... तो वेड्या मनाला आता परत कसं सावरावं ? ना तिच्याकडे उत्तर .... ना 'त्याच्या'कडे मनामनांवर राज्य करणारा तो जगाचा रक्षण करणारा तो , प्रत्येक जीवात वास करणारा तो, विश्वविधाता तो , त्यालाही प्रश्न पडावा ? हे कसले 'प्रेम' ? केवळ अढळ विश्वास , जीवाला घोर लावणारी हुरहूर, डोळ्यात प्राण आणून वाट पाहायला लावणारी आस , फक्त एका क्षणाच्या भेटीसाठी ? बस्स!!

पाश्चिमात्य साहित्य

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 27/09/2016 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते.

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 27/09/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.

व्यथा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 27/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी

रिहॅब चे दिवस ( भाग ४) !!!

लेखक वरुण मोहिते यांनी सोमवार, 26/09/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी उठलो, कानावरती इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर ना होना ..हे गाणं येत होतं. मन भरून आलं. रूम मध्ये पाहिलं तर कोणच नव्हतं. जरा वेळाने सगळे आले. योगा करायला गेले होते खाली. गाण्यामुळे माझे डोळे भरून आले , हुंदकेही येत होते बहुधा . तितक्यात खांद्यावर एक हात पडला . गप बाला गप... हे त्यांचं पहिला वाक्य. हे साहेब पनवेल चे .सिडको एअरपोर्ट अश्या ठिकाणी जमीन गेलेली. काही कोटींचे धनी. मात्र मोहाची दारू, मच्छी ,पनवेल या व्यतिरिक्त जगातील कुठल्याही गोष्टींशी त्यांचा संबंध नव्हता. काही बोलो तरी आमच्या पनवेल ला काय होता हे व्याख्यान परत ऐकावं लागे .

परीकथा - भाग अकरा - फेसबूक स्टेटस २.४ - २.५ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 26/09/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
९ ऑगस्ट २०१६ हल्ली आम्ही एक नवीन प्रकार सुरू केला आहे. डोळ्यावर हात ठेवून गुडघ्यात डोके खुपसून बसायचे आणि आपण लपलो असे डिक्लेअर करायचे. मग पप्पा उगाचच्या उगाच शोधायचे नाटक करणार आणि ती अचानक भॉ केल्याच्या आवेशात मोठ्याने किंचाळणार.. तर गेल्या रविवारी असाच काहीसा खेळ मॅकडोनाल्डमध्ये चालू होता. दरवाज्याजवळच्या पॅसेजमध्ये अशीच ती स्वत:ला लपवून बसली होती. जवळून दोन अठरा-वीस वर्षांची मुले गेटबाहेर पडत होती. ईतक्यात अचानक बॉम्ब फुटावा तशी ही किंचाळत उसळली. या अनपेक्षित प्रकाराने तिच्या जवळून जात असलेला मुलगा अक्षरश: अंग काढून दचकला.

इंडिपॉप - ९० चे दशक !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 26/09/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !

मी एक ढग - एकटाच ...... !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/09/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक ढग - एकटाच ...... !!! सखे सोबती जरी कितीक गर्दी गडगडणाऱ्या त्या ढगांची वर्दी कधी चिंब ओल्या पावसात कधी लख्ख कोरड्या उन्हात तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! मनात माझ्या जुनेच सवंगडी नव्या देशातले जरी वारे सभोवती कधी हर्षुन जाई तर कधी उदास ना कसली खंत ना कसली आस तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! नकळत देतो जीवा दिलासा स्वतःच गिळून घेतो उसासा वाऱ्याविना ही फिरतो उगाच ना जाणतो वाट जुनी कि नवी आज तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!