लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.
अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बदलती जीवनशैली : सोशल
लग्नं टिकले नाही तर इतका काय
हे काळावर पण अवलंबून आहे
+१
अजून एक सल्ला - स्वानुभवावरून
माघार...
पारस्पारिक प्रेम हा एकमेव घटक विवाहचं नातं कायम ठेवतो.
नवरा
लाटकर काकांनी मिपाची वैचारिक
हेला काकानां
कॉलिंग णिसो सर....
गाववाले तुम्ही "हेला" "हेला"
गाववाले तुम्ही "हेला" "हेला" करू नोका राजेहो लैच हसं येते गळ्या!
असं कोणाच्या नावाला हसणे
प्रसाद साहेब
भाऊ तुम्ही नका टेंशन घेऊ,
कॉमेंट प्रसाद१९७१ साहेब
राजा बाप्पु
अरे हाव! तुमाले थोड़ीच काही
एका शब्दावर जर सात उपप्रतिसाद
सोन्याबाप्पु - मी गमतीत
=))
गाववाले तुम्ही "हेला" "हेला"
असो! विनोद होता इतके समजून
स्पंदने आणि कवडसे - वैवाहिक आयुष्य:
MAD for each other !
Her company is a magic of your life &
हे फारचं पुस्तकी झालं हो.
मला इतरांचं माहिती नाही
त्यापेक्षा लग्नच न केलेलं
+१..
त्यापेक्षा लग्नच न केलेलं
+१०००
मला वाटतं तै नी ते उपरोधाने
अजिबात नाही..
खरय. मला तरी सर्क्यासटीक टोन वाटला नाही
जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर
+१
पिराताई - मेड फॉर इच अदर
सौ सुनार की...
माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खु
Ha ha ha..
स्त्री शक्ती
विवाह हा जीवनातल्या स्वास्थ्याचा किंवा अस्वास्थ्याचा
लैंगिकता हा विवाहाचा मुलाधार आहे त्यावर छान मौन बा़ळगलय
वा एकदम योग्य विश्लेषण
आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून लिहीतो
लिहायला फार सुंदर आहे हे!!
सूड राव
+१