✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अशीहि एक धर्म निरपेक्शता

द
दिवाकर कुलकर्णी यांनी
Sat, 10/03/2015 - 23:31  ·  लेख
लेख
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
30266 वाचन

💬 प्रतिसाद (208)

प्रतिक्रिया

.

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 11:35 नवीन
कृष्णाजी प्रभाकर की भास्कर ? बहुतेक कृष्णाजी भास्कर
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आँ?

पैसा
Mon, 10/05/2015 - 13:06 नवीन
http://www.misalpav.com/comment/750526#comment-750526 इथे तुम्हीच लिहिलंत ना दादुस? विसरलात काय?
↩ प्रतिसाद: dadadarekar

+१

अमित मुंबईचा
Mon, 10/05/2015 - 13:01 नवीन
हे अस काही घडल होत हे माहीत नव्हत, काही पुरावे आहेत का?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात

तुडतुडी
Sun, 10/04/2015 - 13:36 नवीन
हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?
रोजचा स्वतःचा अनुभव आणि निरीक्षण आहे . तुम्ही मुस्लिमांशी (अत्यंत दुर्मिळ अपवाद वगळता ) कितीही मराठी बोलायचा प्रयत्न केलात तरी ते कधीही मराठीत बोलत नाहीत .उर्दू मिश्रित हिंदीतच बोलतात मग अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही . त्यांना मराठी समजत असतं आणि बोलताही येत असतं पण ते प्रतिसाद मात्र मराठीत देत नाहीत .त्यांचीच भाषा पुढे रेटतात . आपणही मग त्यांच्याशी त्याच भाषेतून बोलू लागतो .भाषा आणि पोशाख ह्या कुठल्याही धर्माच्या , संस्कृतीच्या महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे आपणही त्यांच्याशी हटकून मराठीतच बोलायला हवं . अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजी महाराजांचं खेळणं विकलं जातं हे त्या बाईने सांगितलं . आता ह्यात धर्मनिरपेक्षता कसली आलीय ?

वाजपेयी

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 10/04/2015 - 13:59 नवीन
अडवाणी,अमित शहा,राजनाथ्,अशोक सिंघल मुंबईत्,महाराष्ट्रात आले की मराठी कार्यकत्यांशी कुठच्या भाषेत बोलतात गे तुडतुडे?
↩ प्रतिसाद: तुडतुडी

माई, त्येंच्याशी वाद घालू नका

तर्राट जोकर
Sun, 10/04/2015 - 15:49 नवीन
माई, त्येंच्याशी वाद घालू नका. मुसलमानांना त्येंच्या सोतोपेक्शा जास्त चाम्गलं व्ळीखतेत ते.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सर्व प्रतिसादकांचे आभार

दिवाकर कुलकर्णी
Sun, 10/04/2015 - 15:25 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार मे जे लिहीलंय ती एक सत्य घटना आहे, तसा मी कधीच लेखक नव्हतो व नाही,पण जे मनाला भिडलं कि, एका मुस्लिम बाईचं ब्रेड आणि बटर अफझल खानाच्च्या वधाचं खेलणं असावं ,ते उतरवलंय इतकंच, हा विरोधाभास मला धर्म निरपेक्शता वा सहिष्णुता वाटली , इतकंच माझा खरं तर शशक लिहायचा विचार होता त्यामुलं अधिक तपशील मी टालले, त्यामुलं ती मुस्लीम असल्याचा संदर्भ नीट येऊ शकला नाही, हे मान्य, प्रश्न राहिला ळ बद्दल ल लिहीलं जाण्याचा, अयोग्य की बोर्ड मुलं हे घडतंय, आपल्याला हे सहन करावं याबद्दल क्शमस्व ! मिपाच्या पंगतीत ,येणं अंत्यत आनंदाचं आहे याची प्रचिती मी घेतली आहे.

चाळु द्या चाळु द्या, ल ने

फुलथ्रॉटल जिनियस
Sun, 10/04/2015 - 15:49 नवीन
चाळु द्या चाळु द्या, ल ने तसाही काही फळक पडत नाही......
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

घन निळा लडिवाळा झुलवू नको

दिवाकर कुलकर्णी
Sun, 10/04/2015 - 17:07 नवीन
घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या सार्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा ।।१।।झुलवूनको हिंदोळा सांज वेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडामागे कालिंदीच्या तटी खेळती गोपसुतांचा मेळा ।२। झुलवू.......... गदिंमांच्या या गीतात १४ वेळा ळ आलाय माणिक वर्मांच हे गाणं तू नळी वर ऐका,भरून पावल्याचा आंनंद मिळेल ़़शुभा खोटे वर हे गाणं चित्रीत झालंय, त्या वेळची शुभा खोटे किती मार्दव़ माझ्या कथेतील ल ,ळ ,च्या चुकार पणाची भरपाई करू इच्छितो

छळा!

चांदणे संदीप
Sun, 10/04/2015 - 17:24 नवीन
छळ छळ छळा सग ळ्या क ळ ळाव्यांना!
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

मिपावर स्वागत

अरुण मनोहर
Sun, 10/04/2015 - 17:59 नवीन
कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ रे दिवाकरा, ळ विषयीची कळकळ तळमळ कळ्ळ्ळ कळ्ळालि

अल्ला तेरो नाम .इश्वर तेरो नाम

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 18:47 नवीन
आमचा लाडका अफजुल्या ६२ बायका , सरदारकी उपभोगुन ६० वर्षे तृप्तपणे जगुन मग मेला . शाइस्त्याचेही तसेच आहे. २२ की किती वर्षे बंगालचे की कुठले राजेपण भोगून मग मेला. बोटं तुटलॅ म्हणून कुठलं सुख कमी नाही पडले. (संपादित)

लाहौलविलाकुवत!!

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 19:10 नवीन
बघा, असं आमचा लाडका, आमचा लाडका असं एका धाग्यावर म्हणता, आणि दुसर्‍या धाग्यावर कसा काय आमचा लाडका असं विचारता! ह्ये वागनं बरं नव्हं!
↩ प्रतिसाद: dadadarekar

बै बै ! किती गैरसमज !

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 19:13 नवीन
लाडका अफजुल्या , लाडका औरंग्या असं म्हटलं की दौदही आमचा लाडकाच झाला का ?
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुम्हीच सांगा :)

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 19:21 नवीन
तुम्हीच सांगा :)
↩ प्रतिसाद: dadadarekar

चायला वर्जीनल पर्तीसाद सं

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 21:27 नवीन
चायला वर्जीनल पर्तीसाद सं पादीत झाला....कुणाकडे ब्याकप है का =))
↩ प्रतिसाद: यशोधरा

टक्या, इस हात दे और उस हात ले

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 21:33 नवीन
टक्या, इस हात दे और उस हात ले. समझे? :D अवांतरः इतकं बोलून दादासैब काय दौद त्यांचा लाडका नाही म्हणले नैत, मग काय बरं समजावं?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कि मंग्दा है...मैनू एवरेस्ट

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 21:40 नवीन
कि मंग्दा है...मैनू एवरेस्ट बेस कँप जाण्णा जी...ओये त्वाड्डी मदद मंग्दा :)
↩ प्रतिसाद: यशोधरा

दाउद (सध्या )आमचा लाडका नाही.

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 22:17 नवीन
.
↩ प्रतिसाद: यशोधरा

सद्ध्यापुरते अभिणंदन!

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 22:19 नवीन
देर आये. कोई नहीं, आये तो सही!
↩ प्रतिसाद: dadadarekar

दादाचे नवे बारसे करुन दाउद करु का ?

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 22:23 नवीन
.
↩ प्रतिसाद: यशोधरा

समाधी घेतलीत तरी चालेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 22:25 नवीन
समाधी घेतलीत तरी चालेल.
↩ प्रतिसाद: dadadarekar

व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी?

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 22:27 नवीन
व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी??? अश्शी उघड उघड???
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

उघड उघड "चुकी"च्या गोष्टी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 22:32 नवीन
उघड उघड "चुकी"च्या गोष्टी बोलण्याला विरोध हे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कधीपासुन झाली टक्कुमक्कुशोनु?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चुकीच्या गोष्टी वगैरे काही

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 22:38 नवीन
चुकीच्या गोष्टी वगैरे काही नस्तेरे...अफ्वा हैत त्या =))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणीभौ.

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 22:57 नवीन
चूक बरोबर कोण ठरवणार ?
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणी =)) आग्गाग्गा

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 23:00 नवीन
चिमणी =)) आग्गाग्गा
↩ प्रतिसाद: dadadarekar

(No subject)

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 23:02 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: dadadarekar

भारतात तुमचे नाव हवे ते आणि

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 22:31 नवीन
भारतात तुमचे नाव हवे ते आणि हव्या तितक्या वेळा बदलण्याचे स्वातंत्र्य तुम्हांला आहे.
↩ प्रतिसाद: dadadarekar

माझा पर्याय जास्तं सोपा आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 22:32 नवीन
माझा पर्याय जास्तं सोपा आणि पुण्यदायी आहे.
↩ प्रतिसाद: यशोधरा

काय इशेष नाय हो.

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 22:15 नवीन
जे वाक्य दिसते आहे त्याच्याउलट दुसरे वाक्य होते. ते संपादित झाले.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओ हितेस भाऊ

सुबोध खरे
Mon, 10/05/2015 - 09:45 नवीन
ओ हितेस भाऊ तुम्ही तुमची सर्व स्थावर जंगम इष्टेट आम्हाला देऊन हाजला जाणार होतात ना ? पुण्य मिळवायला. आम्ही ष्टाम्प पेपर घेऊन वाट बघून र्हायलो ना? मग कायले हिकडे काथ्याकुट करून र्हायले? तिकडे काबा ला ष्टाम्पिड साठी तुमची वाट बघून राह्यलेना!
↩ प्रतिसाद: dadadarekar

असे मी कधी बोल्लो नव्हतो.

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 09:50 नवीन
.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असं काय कर्ता ओ!

पैसा
Mon, 10/05/2015 - 13:28 नवीन
असं काय कर्ता ओ! मला आठवतंय तुम्ही लिहिलेलं! लिंक शोधायचा लै कट्टाळा आलाय आता!
↩ प्रतिसाद: dadadarekar

लिंक शोधून द्या.

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 13:43 नवीन
.
↩ प्रतिसाद: पैसा

लेखासंबंधी:

तर्राट जोकर
Sun, 10/04/2015 - 23:23 नवीन
लेखासंबंधी: वपुस्टाइल मांडणी चांगली आहे. लेखनशैलीही चांगली आहे. काय चुकले? धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरून. ती बाई मुस्लिम होती-नव्हती हा भाग वेगळा. इथे लेखकाच्या मनातच धर्म किती रुतून बसला आहे याचे प्रत्यंतर आले. ऐकीव माहितींवरून व सतत एकतर्फी प्रचारावरून सुशिक्षितांचीही मते कशी मातकट होतात याचे हे उदाहरण. अफझलखानाचा वध करणारे शिवाजी हे हिंदू-विरुद्ध-मुस्लिम चे प्रतिक म्हणून प्रचार करून शिवाजींची प्रतिमा/इतिहास बदलण्याचे पातक काही विशिष्ट लोकांनी केले. खरे काय? शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या. कथेचं काय? इथे ती बाई व्यवसायहेतू हे पुतळे विकते, तीचे शिक्षण-विचारसरणी-मूल्ये लेखकांइतकी उच्च नक्कीच नसतील. ती अर्थव्यवस्थेच्या गरजेअनुरूप वागत आहे. त्यात तिला स्वतः न जाणवणारी धार्मिक बाब लेखकांना जाणवते व लेखकराव त्यांनीच शोधलेल्या तिच्या (गरजेपोटी आलेल्या) धर्मनिरपेक्षपणाचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतात. अफझलखानास मुस्लिम धर्म चिकटवतात व शिवाजींस हिंदू धर्म चिकटवतात. स्वतःचीच धर्मांध प्रतिमा या कथेतून उभं राहतांना त्यांना जाणवत नाही पण ते अशिक्षित गरीब बाईंच्या धार्मिक मूल्यांची मोजदाद करण्याचा प्रयत्न करतात. प्रतिसादकांचं काय? नेहमीचे यशस्वी लोक आपआपली नेहमीची आयुधे घेऊन नेहमीचे तीर सोडतायत. कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून? कथेवर चर्चा सोडून भलतेच विषय घेऊन एकमेकांवर फुटकळ शरसंधान करण्यात काय मिळतं? खरंच ही कथा शिवाजी-अफझलखान भेटीवर आहे? असो. प्रत्येकाच्या मनोरंजनाचे आपआपले फंडे असतात. कुठल्या दुखर्‍या नसा कोण कुठं कुरवाळीत बसेल ज्याचे त्याला ठवुक. धन्यवाद!

@TJ १++

पगला गजोधर
Mon, 10/05/2015 - 09:26 नवीन
असाच काहीसा आपल्यासारखा सूर मी माझ्या "शिवजयंती हायजँक ????" या धाग्यात लावलेला. त्यामुळे आपल्या या सुज्ञ प्रतिक्रियेला माझे अनुमोदन.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी हेच म्हणायचं मला सेक्युलर विचारवंतांच्या बाबतीत.

दत्ता जोशी
Mon, 10/05/2015 - 10:29 नवीन
" कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून?" तेही बरचसं धडधडीत खोटं.. अगदी असंच मला नेहमी वाटत या सेक्युलर लोकांच्या बाबतीत. यांच्या म्हणण्याप्रमाणे अफजलखान विजापूरहून निघून वाई ला येईपर्यंत काय शांतीचा संदेश पेरत आला होता असंच असं असतांना करंटे लोक आफ्जुल्याची दाढी बघतात म्हणजे काय? !!! बरं मग मग जर अफजलखानाचा वधाचे चित्र लावून खाली "दहशतवाद असाच संपवावा लागतो" असं चित्र दिसला तरी या सेक्युलर आणि शांती प्रिय लोकांना का मिरची लागते हे मात्र न कळलेले कोडे आहे !! मग ते शांतीप्रिय लोक चित्रे फाडतात, दगडफेक करतात अगदी मग हिंदू दैवतांच्या मूर्तींची विटम्बना होते, जाळपोळ आणि दंगल होते. त्यांना हेच ज्ञानामृत पाजण्याचे शानपन ( पक्षी: धारिष्ट्य) हे सेक्युलर विचारवंत लोक का दाखवत नाहीत असं विचारणे म्हणजे विचारणारे अजून धर्मांध. असो. लोकशाही है. चल्नेकाच . .

दत्ताजी,

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 11:21 नवीन
दत्ताजी, काही प्रश्न आहेत. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे? वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? 'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

हेच म्हणतो मी.

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 11:39 नवीन
अफजलखान केवळ सरदार होता. पण गनिम शहेनशहा जर वाइइट होते तर त्यांच्या दारात रांग लावायला जाणे , माझ्या मुलाला जहागिरी द्या अशी पत्रे लिहिणे , असे प्रकार बाकीच्चे राजे का करत होते ?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

जग असंच असतं, सायेब. सगळ्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/05/2015 - 14:23 नवीन
जग असंच असतं, सायेब. सगळ्या काळांत कोणीना कोणी दादासाहेब, मामासाहेब असतातच !
↩ प्रतिसाद: dadadarekar

दुसर्‍या राजांविरुद्ध आणि

मृत्युन्जय
Mon, 10/05/2015 - 11:48 नवीन
दुसर्‍या राजांविरुद्ध आणि सरदारांविरुद्ध लढाया शिवरायांनीही केल्या पण त्यांनी वाटेत इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याचे भडकाऊ प्रकार नाही केले. असो.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 12:09 नवीन
तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं या वादाला काय अर्थ आहे का मृत्यूंजय साहेब? ते जाऊ द्या. आता ह्या तमाम सेक्युलर-विरोधी लोकांना नेमकं काय हवंय तेही स्पष्ट शब्दात कळवतील तर बरं होईल. म्हणजे त्यांच्या स्वप्नातला सेक्युलर-मुक्त भारत कसा असेल?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी केवळ तुमच्या प्रतिक्रियेला

मृत्युन्जय
Mon, 10/05/2015 - 12:13 नवीन
मी केवळ तुमच्या प्रतिक्रियेला माझा अल्पसा प्रतिवाद दिला. बाकी तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं आणि त्याचा काही अर्थ आहे की नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल त्यामुळे इथे देत नाही.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

प्रार्थनास्थळे फोडणे वा मदत करणे हा एकंदर राजकारणाचा भाग होता.

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 12:18 नवीन
मराठ्यांनी शृंगेरी शंकराचार्यांचा मठ लुटला होता . ( बरोबर ना ? ) या मठाला टिपू सुलतान मदत करत होता. अदिलशहाने चाफळ राममंदिराला जागा / अर्थसहाय्य दिले होते हे खरे आहे का ? खुद्द अफजलखान कर्नाटक दौर्‍यात असताना एकही मंदिर पाडले नव्हते. कारण तिथले हिंदू सरदार हे आदिलशाहीचे मित्र होते. माहाराष्ट्रात मात्र याच अफजलखानाने देवळे पाडली कारण महाराजाना उकसवायचे होते म्हणून. जाणकारानी माहितीत चुका असतील तर सुधारणा कराव्यात
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एखाद्याला उचकावयचे राजकारण

मृत्युन्जय
Mon, 10/05/2015 - 12:24 नवीन
एखाद्याला उचकावयचे राजकारण करण्यासाठी त्याच्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडणे उचित आहे???? नक्की??? हे मत फायनल ना?
↩ प्रतिसाद: dadadarekar

युद्धात सगळं काही क्षम्य असतं

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 12:28 नवीन
युद्धात सगळं काही क्षम्य असतं म्हणतात. तुमचं मत धर्मानुसार बदलतं काय?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

"सगळं काही क्षम्य असतं "

मृत्युन्जय
Mon, 10/05/2015 - 12:46 नवीन
"सगळं काही क्षम्य असतं " तुमचे पहिले स्टेटमेंट नक्की आहे असे समजतो. हे वक्तव्य देखील फायनल समजु का? बदलणार नाही ना नक्की?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अफजल खान वगैरे प्रभुतींनी

फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 10/05/2015 - 12:40 नवीन
अफजल खान वगैरे प्रभुतींनी मंदीरे उद्ध्वस्त केली हे धादांत खोटे आहे, समकालीन ऐतीहासिक साधानांमध्ये असा कोणताही पुरावा नाही.ते फक्त एक सरदार होते ,त्यांचा शिवाजीराजांवर कोणताही वैयक्तीक राग न्हवता.सत्तास्पर्धेत लढाया या व्हायच्याच , म्हणून अफजल खान दहशतवादी ठरत नाही.अफजल खान हा वाइचा सुभेदार होता,वाईच्या हिंदी घाटाला त्याने सुभेदार असताना मदद केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.तो हिंदूद्वेष्टा अजिबात न्हवता,प्रतापगड मोहिमेच्या वेळी वाईत त्याने जनकल्याणार्थ कोटीचंडी यज्ञ केला होता,आता मला सांगा, हिंदू द्वेष्टा माणुस हिंदूंची कर्मकांडे करेल काय?????
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तो जान्हवेही घालायचा असाही

मृत्युन्जय
Mon, 10/05/2015 - 12:48 नवीन
तो जान्हवेही घालायचा असाही काही पुरावा समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये सापडेल तुम्हाला. बघा बरे जरा.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा