✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

आ
आशु जोग यांनी
Tue, 03/25/2014 - 13:48  ·  लेख
लेख
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37910 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

वर्ष?

सुनील
गुरुवार, 05/08/2014 - 14:02 नवीन
कुठल्या वर्षीची १६ मे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

आता ह्या वर्षीच्या १६ मे

शिद
गुरुवार, 05/08/2014 - 20:54 नवीन
आता ह्या वर्षीच्या १६ मे पर्यंत वाट पाहु... नाहीतर 'अबकी' च्या ऐवजी 'अगली' बार चा नारा लावायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

:)

विकास
गुरुवार, 05/08/2014 - 21:56 नवीन
नाहीतर 'अबकी' च्या ऐवजी 'अगली' बार चा नारा लावायचा. हा हा हा! मस्त! किमान ते पुढचे पाच वर्ष ऐकायची कटकट नको म्हणून तरी मोदी विरोधक एकत्र येऊन मोदींना पंतप्रधान करतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नावलीला मोदींचे ई-मेलद्वारे उत्तर

आयुर्हित
गुरुवार, 05/08/2014 - 21:42 नवीन
टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नावलीला ई-मेलद्वारे दिलेल्या उत्तरांत मोदी यांनी भाजपची सद्यस्थिती, काँग्रेसचे भवितव्य, प्रियांका-राहुलची टीका तसेच त्यांच्यावरील विविध आरोपांना प्रत्युत्तर दिले. .......... प्रश्नः २००४ सालाप्रमाणेच विजय भाजपचाच, असा पक्षात आत्मविश्वास आहे. अनेक नेत्यांनी तर आधीच मंत्रिपदांचे वाटप करून घेतले आहे. इतका विश्वास कशामुळे आलाय? >> माझ्या काही सभांना जरी तुम्ही उपस्थिती लावली असती, तर हा प्रश्न तुमच्या मनात आलाच नसता. काही प्रसारमाध्यमांचेच असे म्हणणे आहे, की निवडणुकांच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र आणण्याचा प्रयोग कधीच झाला नव्हता. राजकीय पंडित, राजकीय सर्वेक्षण, मीडियाच्या जनमत चाचण्या भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचेच सरकार येणार असा निष्कर्ष काढत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीपासून पळ काढला आहे. माझ्या सुमारे शंभराहून अधिक सभांना लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हे कशाचे लक्षण आहे? प्रश्नः विकास आणि सुप्रशासन या मुद्द्यावर प्रचार करण्यावर तुमचा भर आहे. पण मुस्लिम व इतर अल्पसंख्यांकांना विश्वास मिळवून देण्यात तुम्ही अपयशी ठरलात. हे तुमचे अपयश आहे, की विरोधकांचे यश...२००२च्या दंगलीचा डाग पुसून काढणे तुम्हाला शक्य होईल, असे वाटते काय? >> तुमचा प्रश्नच मीडियातील काही घटक कसे भूतकाळालाच चिकटून आहेत, हे दर्शवते. कोणताही समाज विकास आणि सुप्रशासन नको, असे म्हणत नाही. अनेक मान्यवर अल्पसंख्यांक नेते काँग्रेसने आमच्यासाठी काय केले, हा सवाल करतात. केवळ जात आणि धर्माची भीती दाखवून मतांचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे धोरण आहे. गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकारणाची आता मात्र 'एक्स्पायरी डेट' येऊन ठेपली आहे. अशा पक्षांनी आता आपले धोरण बदलायला हवे अन्यथा त्यांच्यासमोर राजकारणातून नामशेष होण्याचा धोका आहे. प्रश्नः तुमच्यावर लोकांच्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे. याचे दडपण जाणवते? कारण लोकांना झटपट निकाल हवा असतो... >> मला याची अजिबात चिंता नाही. सध्याच्या निराशावादी आणि उपहासपूर्ण वातावरणात देशवासींचा राजकारणावर पुन्हा विश्वास आणू शकलो, याचा मला आनंद आहे. देशभर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. प्रश्नः यूपीए सरकारने तुमच्याविरोधात सीबीआयचा वापर केल्याचा आरोप तुम्ही सातत्याने करता. तुम्ही त्याबाबत विस्ताराने बोलू शकता काय? तुम्ही सत्तेत आल्यास यूपीएच्या काळात गुजरात दंगलीबाबतच्या सीबीआयच्या भूमिकेबद्दल चौकशी कराल काय? >> गेली १० वर्षे कुठल्या ना कुठल्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा मोठे षडयंत्र माझ्याविरोधात रचण्यात आले. याच्या एक औंसभरही प्रयत्न देशातील समस्या सोडवण्यासाठी केला असता, तर सध्या देश सद्यस्थितीत नसता. पण मी सतत पुढे जाणारी व्यक्ती आहे. यूपीए सरकारने केलेल्या चुका आम्ही करू इच्छित नाही. मी व्यक्तिश: राजकीय सुडाच्या भावनेने वागणारा नाही. वैधानिक संस्थांना कायद्याने जे संरक्षण दिले आहे, त्याच चौकटीत राहून त्या संस्थांच्या सशक्तीकरणासाठी आणि व्यावसायिक कारभारासाठी प्रोत्साहन देणे हेच आमचे काम असेल. सीबीआयच्या कामगिरीविषयी सुप्रीम कोर्टानेही वेळोवेळी ताशेरे ओढले आहेत. राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी सीबीआयचा वापर होऊ नये, असाच आमचा प्रयत्न असेल. प्रश्नः तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मत कपिल सिबल यांनी व्यक्त केले आहे. तसेच तुमची व अमित शहा यांची चौकशी करण्यास सीबीआयला अपयश आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्याबद्दल तुमचे मत काय? >> सिबल प्रतिष्ठित वकील व कायदामंत्री आहेत. पण ते त्यांची बुद्धिमत्ता अनेकदा देशाच्या अपायासाठीच खर्च करतात. देशाच्या हिताहून अधिक ते स्वत:च्या व पक्षाच्या हिताला महत्त्व देतात. यूपीए सरकार आता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना त्यांची निराशा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र त्यांनी एक ध्यानात घ्यायला हवे, की या देशात कायदा आहे. आणि या देशाचा कायदा हा कायदेमंत्र्याहून अधिक शक्तिशाली आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गुजरातमध्ये प्रचार करताना, सिबल यांनी जाहीर केले होते की, यूपीए सरकार सत्तेत आल्यास, ते मोदींना तुरुंगात टाकतील. त्यामुळे माझ्याबद्दलचा त्यांचा आकस नवा नाही. प्रश्नः रॉबर्ट वड्रा यांच्यावर कारवाई करणार का, असे विचारले असता, तुम्ही म्हणता की, कुणाविरोधातही राजकीय द्वेषातून कारवाई होणार नाही. दुसरीकडे कायदा त्याचे काम करील, असेही तुम्ही स्पष्ट करता. कुणालाही माफी मिळणार नाही, हे तुम्ही ठामपणे सांगू शकता? >> आपला देश कायद्यानुसार चालतो. मोठ्या पदाच्या खुर्चीत बसलेल्या कुणाच्या इच्छा आणि अनिच्छेनुसार राज्यकारभार चालत नाही. कुणालाही कायद्यापासून माफी मिळेल, याची चर्चा करणेच निरर्थक आहे...तिथे मी स्वत: असलो तरीही... प्रश्नः मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनेल, अशी शंका व्यक्त होत आहे. त्यावर तुमचे म्हणणे काय? >> सरकारचा एकमेव धर्मग्रंथ असतो, तो म्हणजे भारतीय राज्यघटना. त्यामुळे आमचे सरकार राज्यघटनेच्या तरतुदींनुसारच राज्यकारभार चालवेल, याबाबत मला शंका नाही. प्रश्नः तुम्ही अमेठीमध्ये प्रचार केलात. पण रायबरेलीपासून दूर राहिलात, त्याचे कारण काय? >> हा निर्णय मी घेत नाही. पक्षाच्या हिताचा विचार करून पक्षनेतृत्वच याबाबत निर्णय घेते. प्रश्नः 'दूरदर्शन'वरील तुमची मुलाखत काटछाट करून प्रदर्शित करण्यात आली. त्याबद्दल तुमचे मत काय? >> राष्ट्रीय प्रसारमाध्यम राजकीय दबाव व राजकीय हस्तक्षेपास बळी पडते, हे सर्वाधिक दुर्दैवी आहे. सरकारी संस्थांचा काँग्रेसने कसा वापर केला, याचेच हे आणखी एक उदाहरण आहे. काँग्रेसने धक्का लावलेल्या व स्वातंत्र्याला नख लावलेल्या संस्थांची यादी दिवसेंदिवस लांबत चालली आहे. सीबीआय, आयबी, केंद्रीय दक्षता आयोग, कॅग या स्वायत्त संस्थांमध्ये काँग्रेसने अनेकदा हस्तक्षेप केला आहे. इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचीही पायमल्ली करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. आजही राज्यपालांच्या पदाचाही दुरुपयोग करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय. खरे तर स्वत:ला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा मसिहा समजणाऱ्या काँग्रेसच्या या नीतीवर राष्ट्रीय चर्चा व्हायला हवी. प्रश्नः तुम्ही सांगता की, काँग्रेसचा मोठा पराभव होईल. त्या पक्षावर त्याचा काय परिणाम होईल, असे तुम्हाला वाटते? >> काँग्रेस त्यांच्या अस्तित्वासाठी लढतेय. काँग्रेसचे अनेक नेते निवडणूक रिंगणातून पळून गेले. प्रचारातही ते कुठेही दिसले नाहीत. काँग्रेसला १०० जागाही मिळवता येणार नाही, असा माझा अंदाज आहे. तसे झाल्यास गांधी कुटुंबाच्या नेतृत्वालाच काँग्रेसमधून आव्हान मिळेल. ही लढाई काँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या निर्विवाद वर्चस्वासाठी आहे. म्हणूनच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहू नये, म्हणून कोणत्याही मार्गाने किमान १०० जागा गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रश्नः राहुल अपयशी ठरला, असे तुम्हाला वाटते काय? आणि प्रियांकांना राजकारणात उतरायला हवे, असे तुम्हाला वाटते काय? >> निवडणूक निकालानंतर काँग्रेसनेच याचा निर्णय घ्यायचा आहे. पण हे थोडे विचित्र आहे, की काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष नेतृत्वाबाबत गांधी कुटुंबाच्या पलीकडे कुणाचा विचारच करीत नाही. प्रश्नः आम आदमी पक्षाचे भविष्य काय असेल? मध्यमवर्गीय मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याने ही तुमच्यासाठी अडचण ठरली आहे काय? असेही बोलले जातेय की, डिसेंबरच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने जर भाजपला रोखले नसते, तर तुमच्या लोकसभा विजयाबद्दल शंकाही उपस्थित झाली नसती. >> संघटनात्मक रचना हीच भाजपची शक्ती आहे. यंदा भाजपला मिळणारा जनमताचा आधारच इतका प्रचंड आहे, की कोणताही पक्ष किंवा आघाडी आम्हाला रोखू शकत नाही. भाजप हा स्वबळावर लढणारा पक्ष आहे. आम्ही स्वत:चा अजेंडा स्वत:च तयार केला आहे आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. प्रश्नः काँग्रेसचा येत्या निवडणुकीत तुम्ही म्हणता तसा मोठा पराभव झाल्यास आम आदमी पक्ष हा धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेसला पर्याय ठरू शकेल, असे तुम्हाला वाटते काय? >> निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षच इतका दुबळा झाला असेल की, त्यांची जागा कुणी घेईल, याची शक्यताच मला वाटत नाही. प्रश्नः तुम्ही दिल्लीत गेल्यावर गुजरातचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ते पक्षच ठरवेल, असे तुम्ही म्हणाला होतात. अर्थात तुमचा सल्ला घेतला जाईलच. तुम्ही कोणाला पाठिंबा द्याल? आनंदीबेन पटेल? अमित शहा पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळणार का? >> या प्रश्नांना आताच काही उत्तर देता येणार नाही. याबाबत योग्य त्या वेळी निर्णय घेतला जाईल. मी एका गोष्टीची खात्री देतो, ती म्हणजे, हे सर्व पक्षातील सार्वमताने घेतलेले निर्णय असतील आणि अन्य कोणत्याही बाबीपेक्षा गुजरातचे हित हा महत्त्वाचा मुद्दा असेल. प्रश्नः तुमच्या मंत्र्यांपेक्षा कार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार करण्यास तुमचे अधिक प्राधान्य असेल, अशी चर्चा आहे. तुमचे यावर मत काय? >> मी याच्याशी सहमत नाही. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय कार्यकारी मंडळ महत्त्वाचे असते. भाजप आणि एनडीएचे अन्य सहकारी पक्ष यांच्याकडे सरकार चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आमच्याकडे सरकार चालवण्यासाठी सर्वाधिक अनुभवी आणि गुणवान व्यक्ती आहेत. मी याआधीही अनेकदा म्हटल्याप्रमाणे आम्हाला एक संघ म्हणून काम करावे लागेल. प्रश्नः तुमच्या पंतप्रधानपदासाठीच्या मोहिमेच्या विरोधात मुस्लिमधर्मीयांना उभे करण्याचा प्रयत्न तुमचे 'धर्मनिरपेक्षतावादी' विरोधक करत असल्याचा आरोप तुमच्या अनेक सहकाऱ्यांनी केला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? >> काँग्रेस पक्षाला आता आपला निश्चित पराभव दिसू लागलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना १०० चा आकडा पार करणे जमणार नाही. त्यामुळे शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून ते धर्मनिरपेक्षतावादाच्या बंकरमागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अल्पसंख्य समाजामध्ये भीतीचा बागुलबोवा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आजचा भारत हा अशा भीतीच्या बागुलबोवाला भीक घालत नाही, हे त्यांच्या लक्षात येत नाही. या युक्त्यांमागे नेमके काय आहे, हे आता अनेकांना कळू लागले आहे. एक राष्ट्रीय पक्ष अशा प्रकारचे प्रयत्न करतोय, हे दुर्दैवी आहे, असे मला वाटते. मात्र मला खात्री आहे की याचा उलटा परिणाम होईल. अल्पसंख्य समाजही त्यावर उलट प्रतिक्रिया देईल. कारण अल्पसंख्य समाजालाही आता काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण कळू लागले आहे आणि अशा प्रकारच्या राजकारणापासून तेही दूर होऊ लागले आहेत. प्रश्नः देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. त्याच्या उच्चाटनासाठी काही जण कठोर भूमिकेचा पर्याय सुचवतात. तर कुणी सामाजिक-आर्थिक सुधारणांचा मार्ग दाखवतात. तुम्ही कोणता पर्याय स्वीकारणार? >> नक्षलवाद हा शब्दच मुळी चुकीचा आणि कालबाह्य झाला आहे. माओवाद हीच त्याची योग्य परिभाषा आहे. माओवाद आणि दहशतवाद हाच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वाधिक धोका आहे. या समस्येशी लढण्यासाठी कठोर धोरणच हवे. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी स्पष्ट घटनात्मक चौकटही हवी. आपल्या पोलिस दलाचे आणि केंद्रीय निमलष्करी दलांचे आधुनिकीकरण करण्यातील दिरंगाई रोखायला हवी. जवानांना आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे द्यायला हवीत. त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण द्यायला हवे आणि त्यांना योग्य ठिकाणी तैनात करायला हवे. केंद्रीय व राज्य सरकारच्या सहकार्यातून माओवादाचे समूळ उच्चाटन शक्य आहे. प्रश्नः पाकिस्तानशी संघर्ष नको, अशी तुमची भूमिका आहे. देशाच्या सुरक्षेबाबतची कठोर भूमिका तुम्हाला पाकिस्तानशी वाटाघाटीत यश देईल, असे वाटते काय? >> कोणत्याही देशाशी आम्हाला संघर्ष नकोय. कोणत्याही देशाशी अथवा शेजारील देशांशी संघर्षाची भूमिका घेऊन आपल्याला परराष्ट्र धोरण यशस्वीपणे राबवता येणार नाही. विश्वास आणि परस्पर सहकार्य या मुद्द्यावरच आपल्याला इतर देशांशी परराष्ट्र धोरण आखावे लागेल. तोपर्यंत पाकिस्तानातून आपल्या देशाला असलेला दहशतवादाचा प्रश्न सुटणार नाही. भारत आणि पाकिस्तानची केवळ सीमाच एक नाही, तर आपली संस्कृती आणि परंपराही सारख्याच आहेत. पण राष्ट्रीय सुरक्षा हाही परराष्ट्र धोरणाचा गाभा असेल. केवळ चर्चेने विवादास्पद मुद्दे सुटत नाहीत. प्रश्नः २००२च्या दंगलीचा मुद्दा छेडत अमेरिकेने गुजरातमध्ये गुंतवणुकीस नकार दिला. पण चीनने मात्र नेहमीच गुजरातला प्राधान्यक्रम दिला. याचा लाभ चीनशी असलेले संबंध सुधारण्यासाठी होईल, असे वाटते काय? >> भारत आणि चीनने द्विराष्ट्रीय प्रश्न मिटवल्यास त्याचा दोन्ही देशांना लाभ मिळेल. २१वे शतक आशियाचे आहे. जगातील ६० टक्के लोकसंख्या आशियात आहे. चीनशी असलेल्या समस्या सोडवणे अशक्य नाही. .... गेली १० वर्षे कुठल्या ना कुठल्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे मोठे षडयंत्र माझ्याविरोधात रचण्यात आले. पण मी सतत पुढे चालत जाणारी व्यक्ती आहे. यूपीए सरकारने केलेल्या चुका आम्ही करू इच्छित नाही. मी व्यक्तिश: राजकीय सुडाच्या भावनेने वागणारा नाही. .... कोणत्याही देशाशी अथवा शेजारील देशांशी संघर्षाची भूमिका घेऊन आपल्याला परराष्ट्र धोरण यशस्वीपणे राबवता येणार नाही. विश्वास आणि परस्पर सहकार्य या मुद्द्यावरच आपल्याला इतर देशांशी परराष्ट्र धोरण आखावे लागेल. तोपर्यंत पाकिस्तानातून आपल्या देशाला असलेला दहशतवादाचा प्रश्न सुटणार नाही. .... माओवाद आणि दहशतवाद हाच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वाधिक धोका आहे. या समस्येशी लढण्यासाठी कठोर धोरणच हवे. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी स्पष्ट घटनात्मक चौकटही हवी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाला काँग्रेसमध्येच आव्हान मिळेल! May 7, 2014, 02.55AM IST
  • Log in or register to post comments

चांगली माहिती आयुर्हित

आशु जोग
गुरुवार, 05/08/2014 - 23:24 नवीन
चांगली माहिती आयुर्हित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

श्रीगुरुजी

आशु जोग
गुरुवार, 05/08/2014 - 23:27 नवीन
श्रीगुरुजी तिसराही पर्यायही अनेकांच्या गळी उतरणार नाही. आज लोक मोदींच्या फॅन्सची अवस्था रजनीकांतच्या चाहत्यांसारखी झाली आहे. काही सांगता येत नाही. भाजपा आले आणि मोदी नाही झाले तर हे फॅन्स विहिरी बिहिरीत उड्या मारतील...
  • Log in or register to post comments

EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के

आशु जोग
Mon, 05/12/2014 - 22:57 नवीन
EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-ends-exit-poll-result-out-4611505-NOR.html
  • Log in or register to post comments

मग

इरसाल
गुरुवार, 08/27/2015 - 15:43 नवीन
शेवटी काय ठरलं, होणार का मोदी पंतप्रधान ? मोदी खरचं पंतप्रधान बनतील काय ? या प्रश्नाला माझे उत्तर सपष्ट नाय असेच हाये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा