Skip to main content

वावर

मिसळपाव बंद होणार----

लेखक साईली यांनी शुक्रवार, 05/03/2010 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
:''( मिसळपाव बंद होणार---- मग काय करणार ? स्वयंपाक वेळीच होणार, मुलांचा अभ्यास होणार वेळेवर सारे झोपणार, अन् वेळेवर उठणार, रिकामे रिकामे वाटणार, वेळच वेळ उरणार, आता बाजारात जाणार, भाजीपाला आणणार, पिसीची सात सुटणार, अभ्यास चांगला होणार, सुयश पुन्हा मिळणार, आई नाही बोलणार, कुणी नाही टोकणार, हे सारे खरे पण ---- नवे मित्र नाही मिळणार, कविता कुठे टाकणार ? व्यासपीटाला मुकणार, दिवस मोठा वाटणार, रात्र खायला उठणार, मन रिते रिते होणार, आनंदाला मुकणार, कुठे कुठेसे जाणार ! गादया किती तुडविणार ! मग ठाण्याला गर्दी होणार, तिथे ही रांग लागणार, मग डाकटर संप करणार, मोर्चे ते काढणार, गुगल गु

माझे संत्रापुराण

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 04/03/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते. काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते!

दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चंनेल्स................ (भाग - २)

लेखक मंगेशपावसकर यांनी शुक्रवार, 26/02/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो, सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो कि कृपया या लेखा कडे अर्थपूर्ण (प्रक्टीकल) कटाक्ष टाकावा व नंतर आपला अभिप्राय कळवावा. दिल्लीकरांचे हिंदी न्यूज चंनेल्स स्वत;ची मनमानी करत हवी ती टिप्पणी करतात. मला माहित आहे कि वाचकांना उदाहरण अपेक्षित आहे. खालील निदर्शनास आणलेल्या बातम्याकडे ह्यांचे साफ त्यांना सोयीस्कर दुर्लक्ष असते. १. उदा. रेल्वे अर्थसंकल्प, फक्त बिहार ते मुंबई व पुणे , यु.पी. ते मुंबई व पुणे , गोवाहाटी ते मुंबई व पुणे(कर्म भूमी एक्स्प्रेस परवाच लौंच झाली ), हे दिल्लीकर न्यूज चांनेल ह्या सर्व बातम्या फारच चवीने दाखवीत होते. पण मुंबई ची उपेक्षा उदा.

ए देवबप्पा....

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/02/2010 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
ए देवबप्पा ऐकू येते का रे काही तुला त्या आरतीच्या गोंगाटात टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात लोक काय काय मागत असतात अन गार्‍हाणी सांगत असतात कुणाला काय हवे असते रुपं देही धनं देही पुत्रं देही सर्व कामांशा देही मे गात असतात किती ते तुझे गोडवे अन म्हणतात की जो गाईल ही आरती मिळेल त्याला सर्व हवे ते पण खरे सांग एकदा खरेच ऐकु येते का रे तुला? सांग ना..... ए देवबप्पा दिसते कारे काही तुला गाभार्‍याच्या बाहेरचे त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे त्या रोषणाईच्या झगमगटात? किती डोळे लागलेले असतात आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात ताटकळत उभे असतात दर्शनासाठी तुझ्यावर केलेल्या रो

मिपासंबंधी..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/02/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपकरहो, मिपासंबंधी कुणाची काही तक्रार असल्यास, कुणा सभासदाचे सभासदत्व गोठवले/रद्द करण्यात आले असल्यास त्या संदर्भात काही विचारणा असल्यास कृपया मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. मी सवडीनुसार उत्तर द्यायचा अवश्य प्रयत्न करीन. या संदर्भात येथे जाहीर विचारणा करण्यास/लिहिण्यास मनाई आहे. तरी असे धागे अप्रकाशित केले जातील याची कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती.. आपला नम्र, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

उमेद

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
बेगॉन/ डायझोन्/टीक२० सगळे एकदम वापरुन पाहिले कितीही झटकले तरी झुरळ काही मरत नाही जीव तुटता तुटता पुनर्जन्म होतो हात पाय हलत रहतात अधुनमधुन पंख फडफडतो जातो जातो वाटते पण जीव काही जात नाही कितीही झटकले तरी काही झुरळ मरत नाही तु काहीही कर पोसलेला नेता आहे मी इथल्या सगळया समाजाच्या नामर्दगानीवर कुरतडत राहीन अंधारात तुलाच. जगत राहीन तुझ्या उष्ट्यावर आणि माज करेन त्यावरच. तूच शेवटी हरणार आहेस मी असाच आहे शतकांपासुन तु ही असाच आहेस शतकांपासुन सोशीक आणि सहनशील निवडणूका वगैरे जन्तुनशाकाना आम्ही दाद देत नाही. हे सांगितल्यावाचुन ते रहात नाही या उपायांनी काही होत नाही, आमची जाड कातडी कशालाच दाद देत नाही ह
काव्यरस

नव्या दशकाचे बडबडगीत.

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 22/12/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कडाडणार्‍या कडकलक्ष्मीची खमाजातली ख्यालीखुशाली ... गाता गळा गजरी गातो गरीब गावाच्या गजाली घर घर घोरे घाट घन घामेजलेली चकचकीत चमके समचा चांदीचा छननन छमके छंद छुपा छत्रीचा जपतच जातो जीव जुन्या जरीचा झुणझुण झांझर झपताल झंकारी तकक्डान्धा..तत्कारे तबला तिहाई थुई थुई थंडीत थोडासा थरार... दर्या दुंदुभी ...दीनवाणा दमलेला दुकानदार.... धगधगीत धवल धरेला धीर ना धरवला नाकारीत नन्नाचा नखरा.... टकमक टवळी ....टपोरी टोपली..... ठायी ठेगणी ठुशी ठेवली... डमडम डमरु डोकी डावी... ढसा ढसा ढोसूनी....
काव्यरस

<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 30/11/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे. अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.) ============== दिसलीस तू.. भेटलीस तू.. थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन) थांबला जणू रस्ता तेवढा जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू ! भासलीस तू कापरापरी, काजळी जणू.. काळजावरी लखलखती भिंगे ढापणी सांगती तुझी बातमी खरी न स्मित मोजके, न बोलणे कमी नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या.. जे मनात ते, बोललो कुठे? होत राहिले हेच नेहमी.. ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे.. आळसावणे.. डुलकणे तुझे.. त्या कळा कुठे?

इलिनॉईच्या दुगाण्या

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 19/11/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित झरणी बोधित करणी मेलामेली भर्तृहरी अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी तूच सहारा... तूच सहारा रखरखीत या गूगल संकटनेवारी संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी उपग्रहाचा त्वरितध्वनी शरीरबांधणी भेटीगाठी रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी ओहो राहुल आहा राहुल ब्रायन लारा दत्ता भट ब्रायन लारा दत्ता भट
काव्यरस

एक धागा सूखाचा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 18/11/2009 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमचंदांची एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली... दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट. शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय.... अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली.