Skip to main content

वावर

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

बावळ्ट्पना

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 18/04/2010 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाशिला एक प्रदर्शन बघायला गेले होते...

मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 11/04/2010 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर पार्टी रे पार्टी पाहिल्यावर माझ्या मनात विचार सुरु झाले..... बिच्चारे पार्टीजीव!!! :S आधी पार्टी पार्टी करत ढोस ढोस ढोसतील आणि दुसर्‍या दिवशी डोकं धरून बसतील. मग दुखर्‍या डोक्यानं घरात बायको, पोरं, हापिसात हाताखालचे लोक आणि सहकारी ह्या सर्वांवर चिडचिडाट करतील.... सर्वांचाच दिवस खराब होऊन जाईल!!! : हँगओव्हर हा प्रकार टाळता येऊ शकतो असा सल्ला/ मत अनेक आहारतज्ञ व डॉक्टर्स प्रदर्शित करतात. त्याचे गमक तुम्ही मद्यपानाच्या अगोदर खाणे, मद्यपानादरम्यान पाणी पीत राहणे व मद्यपानानंतर काही ठराविक पथ्ये पाळणे [उदा.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

शिव शिव जय हो!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 09/04/2010 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. हलके हलके झापड येऊन त्यांना डोळा लागणार एवढ्यात कसल्यातरी गलक्याने त्या दचकून उठल्या. रस्त्यावरून बऱ्याच बाइक्सचे एकसाथ येतानाचे, हलगीचे आणि कसल्या कसल्या घोषणांचे आवाज येत होते. आत्ता? रात्री साडेबारा वाजता? ह्या लोकांना काही काळवेळ आहे की नाही?

एक फिरकी अशीही!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 06/04/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कोणाची, कधी, कशी फिरकी घेईल ह्याचा नेम नसतो! आमच्या पूर्वीच्या घराच्या मालकीणबाई ह्या एरवी अतिशय चलाख, लबाड म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना कोणी सहसा उल्लू बनवू शकायचे नाही. पण एकदा त्यांच्या मैत्रिणीनेच त्यांची कशी फिरकी घेतली ह्याचा हा एक भारी व विनोदी किस्सा : मालकीणबाईंच्या थोरल्या लेकाचे लग्न झाले. भरपूर स्थळे आधी नाकारून झालेली. मालकीणबाईंना त्यांच्या लेकासाठी सर्वगुणसंपन्न आणि मुख्य म्हणजे श्रीमंताघरची सून हवी होती. मिळाली ती सून थोरा-मोठ्या घरची. तिचं माहेर अतिशय गर्भश्रीमंत, मुंबईच्या उच्चभ्रू वर्गातले. माहेरी खानदानी पण आधुनिक वातावरण.

अशी करावी काटकसर! ;-)

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 05/04/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! :) तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते.

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

मनातला मोगरा

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यातील सायंकाळी शीतल वार्‍याच्या झुळुकेच्या प्रतीक्षेत असावं आणि कोपर्‍यावरून ती हवीहवीशी वाटणारी हाळी यावी.....''मोगरा आला मोगरा , ताजा ताजा मोगरा.....'' नकळत श्वास आता कधीही तो मदमस्त करणारा मनमोहक सुगंध लडिवाळपणे साद घालेल या विचारानेच अलवार होतो ....

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 30/03/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय.... अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली. एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं.... नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी!