मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

दिल्ले दान... घेतले दान...

आजानुकर्ण ·
लेखनप्रकार
आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!) डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार.

हैद्राबादी मटण बिर्याणी

मनस्वी ·
मित्रांनो आणि मैत्रिणींनो काल पॅराडाईज (हैद्राबाद) मध्ये हैद्राबादी मटण बिर्याणी खाल्ली! काय चव होती सांगू... काही केल्या डोक्यातून जात नाहीये. मस्त गरम गरम बिर्याणी... त्यावर अंड्यांचे काप... आत लुसलुशीत चमचमीत लज्जतदार मटण... जोडीला रायते... वा वा वा! माझ्या नॉनव्हेजीटेरिअन मित्र-मैत्रिणींसाठी खास पाककृती देत आहे... नक्की करून बघा. साहित्य : मटण (मध्यम तुकडे केलेले) - १/२ कि. बासमती तांदुळ (१/२ तास पाण्यात भिजवून) - १/२ कि. कांदा (उभा चिरून) - १५० ग्रॅ.

वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

एकलव्य ·
अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
अथांग पाण्यात डोलणार्‍या नावा, अफाट आकाश, पानाफुलांनी लगडलेली झाडे आणि हिरवेगार गालिचे अशा या परिसरात मी अनेकदा स्वतःला विसरून जातो. माझ्या जीवनसखीलाही निसर्गामध्ये हरवून जायला आवडते त्यामुळे जरा कोठे संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टनच्या त्रिस्थळी धाव घेतो. ही त्रिस्थळे म्हणजे नॅशनल मॉल, टायडल बेसिन आणि पोटोमॅक नॅशनल पार्क.

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

गाण्यांच्या शोधात

ॐकार ·
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

मी नाही अभ्यास केला

देवदत्त ·
Taxonomy upgrade extras
लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल.

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

धोंडोपंत ·
लेखनविषय:
लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत.

प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
राम राम मंडळी, मिसळपावची सदस्या आणि आमची मैत्रीण प्राजू हिला वाढदिवसाबद्दल समस्त मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा... प्राजू, हॅपी बर्थडे टू यू ...! :) आणि दुग्धशर्करा योग असा की आजच प्राजूच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या मिसळपावचे जावई जगदिशराव आणि प्राजू या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाबद्दल मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! :) तुम्हा दोघाचा संसार सुखासमाधानाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...! तात्या. अवांतर - सध्या गडबडीत आहे परंतु नंतर जरा सवडीने आमच्या लाडक्या अनुष्काचं पेश्शल भेटकार्ड बनवून आम्ही ते इथे डकवूच! :) आपला, (अनुष्काप्रेमी) तात्या.

संततीसंबंधी समस्या -- बीज क्षेत्र विचार

धोंडोपंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण. प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, "तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले" अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता. त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं.