Skip to main content

समाज

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -२

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 14/08/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील.... भाग १ त्याला ही काही समजत नव्हते काय बोलावे... त्यालाच नवल वाटत होते की त्यांने हे प्रश्न विचारलेच कसे ? जवळ जवळ दिड वर्षानंतर तीला सरळ लग्नात अडचण आहे का ? असे कसे विचारले मी .. हा विचार करुन तोच स्वतः ओशाळला.. व क्षमा मागावी हा विचार करु लागला पण तीचे उत्तर त्याला समजलेच नाही... तो आपल्या ह्दयमध्ये अचानक दर्द का झाला ह्याचा विचार करु लागला व त्या क्षणी तो हे देखील विसरला कि तो ऑफिस मध्ये आहे व काम करत आहे व फोन कानावर लावलेला आहे.. ! *********** ती.. काय बोलू ह्याच्या बरोबर... ह्याला सांगू का नको माझी अडचण ?

आणि कॉमन मॅन बोलला!

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 14/08/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

विषाणू

लेखक अ-मोल यांनी सोमवार, 10/08/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेचा अलार्म वाजला तसे सूर्य महाराज खडबडून जागे झाले. स्नान आटोपून, चहा घेवून, न्याहारी करून ते पृथ्वीच्या दिशेने जाण्यासाठी रथात बसणार इतक्यात सूर्यीणबाई कडाडल्या, “अहो, विसरभोळेपणा कधी जाणार तुमचा?” आता काय झालं, असा प्रश्न पडून सूर्य महाराज मागे वळले, तर सूर्यीणबाई हातात मास्क घेवून उभ्या. “पृथ्वीकडे जायचं म्हटलं की तुम्हाला नेहमीच घाई असते हो, मग सख्खी लग्नाची बायकोही दिसेनाशी होते. शून्यनगरीत स्वाईन फ्लूची साथ चालू आहे माहिती आहे ना, हा मास्क नाकावर चढवा आधी अन मग उधळा कुठं उधळायचं ते.” एरवी अख्ख्या जगाला आपल्या झळांनी सळो की पळो करून सोडणारे सूर्य महाराज..

हे सारे कोठून येते?

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 07/08/2009 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच वाचलेल्या दोन बातम्या. एक टांझानियात अल्बिनोंवर होत असलेल्या अत्याचारांची (अल्बिनो म्हणजे मेलॅनिनच्या अभावामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर सफेद कोड उठल्यासारखे वाटण्याची स्थिती) आणि दुसरी सातारा जिल्ह्यात सुखेड आणि बोरी गावच्या महिलांत दरवर्षी नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी भरणार्‍या शिवीगाळीच्या सामन्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विरोधाची. . . . आपल्या ज्या काही म्हणून मूलभूत भावना आहेत - आनंद, दु:ख, द्वेष इ.; त्यांची बीजं उत्क्रांतीमध्येच आपल्यात रोवली गेली असावीत.

एक कर्मयोगी रामदास

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/08/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्‍या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको.

देशांच्या राजकारणांतील स्त्रीयांचे योगदान

लेखक प्रदीप यांनी रविवार, 02/08/2009 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोरी अ‍ॅक्विनो ह्या फिलिपिन्सच्या एकेकाळच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या स्त्रीचे काल निधन झाले. फर्दिनांद मार्कोस ह्या हुकुमशहाची राजवट उलथून टाकून लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याचे श्रेय (१९८६) ह्या स्त्रीकडे जाते. मार्कोस ह्या जुलुमशहाने १९७२ सालापासून फिलिपीन्समधे अनिर्बंध सत्ता उपभोगली. 'निनो' अ‍ॅक्विनो ह्या तरूणाने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरला व अ‍ॅक्विनोस त्याच्या कुटुंबासह परागंदा व्हावे लागले. १९८३ साली निनो लष्कराच्या देखरेखीखाली देशात परतताच मनिला विमानतळावरच त्याची हत्या करण्यात आली. ह्यामुळे तेथे जनक्षोभ उसळला.

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.