Skip to main content

समाज

मराठा आरक्षण दोन्ही बाजू

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 19/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मराठा आरक्षण या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झालेली आहे. याचे कारण न्यायालयाचा आलेला निकाल. या विषयावर टिव्हीवर सर्व बाजू मांडणारी चर्चा झाली. कुठलेही मत बनवण्यापूर्वी ही चर्चा जरूर पहा. यात तज्ञांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे राज्यकर्त्या जमातीलाच बॅकवर्ड ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे.

माणुसकी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 19/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी …. रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला …. कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून" अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं ! मग म्हणायचे आधी माणूस हो …. वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं … पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा दबतच गेली सगळी स्वप्न त्याखाली ….रोज….

त्यागासारखं ढोंग नाही

लेखक वडापाव यांनी बुधवार, 19/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

कन्फ्यूजन /कम्युनिकेशन/कन्व्हिक्शन

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 18/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, बर्‍याच दिवसाने मिसळ्पाव वर लिहितोय.. आणि सांगायची गोष्टही तशीच आहे.. साधारण ६ वर्षापुर्वी हा प्रवास सुरु झाला, आधी कोल्हापुरी दादा या टोपणनावाने आणि मग स्वतःच्या नावाने इथे लिहु लागलो. अनेकदा बालिश आणि क्वचित बरे असे त्या लिखाणाचे स्वरुप होते. पण या कालावधीत बर्‍याच मिपाकरांनी मला मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. कित्येकदा चेष्टाही केली, पण या सार्‍यातुन खुप काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे लिखाणाची उर्मी कायम राहिली. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आता हा माझ्या लिहिण्याचा प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे .

एक किस्सा (बाल दिन स्पेशल)

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 16/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
एक किस्सा (बाल दिन स्पेशल) गांजवे चौकात एक छोटेसे ६-१० स्के .फुटाचे भडभुंज्याचे दुकान आहे भेळ शेव चुरमुरे आदी पदार्थ मिळतात....मालक त्याची बायको व छोटी मुलगी दुकानात असते..... दुकानातली "शेंगदाण्याची भजी" मला आवडतात रुची पालट म्हणून मी १०-१५ रु ची घेत असायचो/असतो २-३ वेळा मात्र" माल तयार केला नाही... उद्या नक्की करतो" अशी उत्तरे मिळाली ..मी पण फारसे मनावर घेतले नाही पुढे एके दिवशी स्टेट ब्यांकेत खाते/ डिपॉझिट असल्याने पास बुक जुळवून घेण्यासाठी ब्यांकेत जायचे ठरले व चेक बुक/कार्ड पासबुक असलेले "पाऊच "घेऊन ब्यांकेत गेलो. सुदैवाने "सिस्टिम डाउन "अश्या सबबी न मिळता पास बुक जुळवून घेतले.

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 14/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही.