Skip to main content

समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/12/2014 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग- १७ फक्त मंगलाष्टकांचा लाइव्ह शो...........ऐका! आणि आवडला तर या आत्मूभटाला द्या एक... . मंङ्गलाष्टक....वन्स मोअर!!! पुढे चालू... ================= पर्वा दुपारी (नेहमी सारखाच) थकून,या पूजेच्या कामाहून आलो. जेवणंही टेचुन झालवतं अगदी. म्हणून जरा एक कडक पान लावलं आणि खोलीत पंखा सोडून सतरंजीवर कलंडलो जरा...! तेव्हढ्यात दाराची कडी वाजली जोरजोरात.. कोण मेलं आलं या इश्रांतिच्या टायमाला मधे...म्हणून चिडचिडून उठलो..आणि दार उघडलं..तर समोर उभा हा आमचा काका..

झटकून टाक ती राख...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 16/12/2014 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
जो बोलत नाही त्याचे ऐकून घेतले जात नाही. जो बोलतो त्याचेच ऐकले जाते. जो देत राहातो त्यालाच मागितले जाते. जो देत नाही त्याला मागितले जात नाही. जो घाबरतो त्यालाच जास्त घाबरवले जाते. जो घाबरत नाही त्यालाच सगळे घाबरतात. जो हक्क गाजवतो, त्याचे कर्तव्य विसरले जाते. जो कर्तव्यच करत राहातो, त्याचे हक्क विसरले जातात. जो टीकाच करतो त्याचेवर कुणी टीका करायला धजावत नाही. जो प्रशंसाच करतो त्याचेकडून टीका ऐकण्याची सवय राहात नाही. तुम्ही फक्त हसतच राहाल तर लोक तुमचे रडणे ऐकणार नाहीत. तुम्ही फक्त रडतच राहाल तर लोक तुम्हाला कधीच हसू देणार नाहीत. तुम्ही भिडस्त राहून लोकांना तुमचा फायदा घेवू देऊ नका. तुम्ही काही

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १

लेखक जेपी यांनी रविवार, 14/12/2014 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १- वेळः २ महिण्यापुर्वीची. स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला) ग्राहक-आत येउ का सायेब मॅ- या ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे. ...मॅनेजर कागदपत्र पाह्तो. मॅ- किती कर्ज पाहिजे ? ग्रा- द्या कि एक लाख काय. मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ? ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा. आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु.

भीतीच्या भिंती:२. जिवंत असण्याचा पुरावा

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 12/12/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) भाग १: एक तास जास्तीचा ‘काबूलला जायचं’ असं ठरल्यावर सगळ्यात आधी खरेदी केली ती दोन पुस्तकांची. एक श्रीमती प्रतिभा रानडे यांचं ‘अफगाण डायरी’ (पूर्वी वाचलं होतं आणि आवडल्यामुळे लक्षात होतं) आणि दुसरं श्री. निळू दामले यांचं ‘अवघड अफगाणिस्तान’.

मरायचं नाय बे...!!

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 11/12/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मरायचं नाय बे...!! कुणब्याचं पोरं सालं भित्रच हाय , फासावर जाय नाहीतर औषध खाय , लय बेनं इपितर बायलच हाय..

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

लेखक खेडूत यांनी बुधवार, 10/12/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/12/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे. नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही. पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही. वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही. सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही. पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्याला जे साध्य होत नाही त

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/12/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे. मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्‍यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते.

भीतीच्या भिंती: १

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 05/12/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.) १. एक तास जास्तीचा “विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं.