Skip to main content

साहित्यिक

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

धरणी माय....

लेखक अमितसांगली यांनी गुरुवार, 29/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला, जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला, चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले चटके देऊ
काव्यरस

कृष्ण आणि कर्ण

लेखक स्वानंद वागळे यांनी बुधवार, 28/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल.

दु:खाचा महाकवी हरपला

लेखक सांजसंध्या यांनी सोमवार, 26/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत दुर्बोध कविता अशी टीका पचवून पुढे दु:खाचा महाकवी या रसिकांनी दिलेल्या बिरूदाला शेवटपर्यंत जागलेले श्री माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे आपल्यात राहीले नाहीत या बातमीवर विश्वास बसत नाही. मर्ढेकरांनतरच्या पिढीतले ते एक महत्वाचे आणि प्रमुख कवी होत. १० मे १९३७ रोजी ग्रेसजींचा जन्म नागपुरात झाला. त्यांचं बालपण विलक्षण गेलं. त्याबद्दल त्यांनी मौन पाळणं पसंत केलं. पण मनात खदखदणारं दु:खं प्रतिमांची सोबत घेऊन आलं. एखाद्या पदार्थाची चव जशी मोजता येत नाही तशीच भावनेची तीव्रताही. ती तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिमांचा वापर केवळ ग्रेसजींसारखे कवीच करू शकतात.

साहित्यातील 'माणिक' हरपलं ....

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 26/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग नाही दु: खाचा आडोसा नको सुखाच

मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ

लेखक यकु यांनी रविवार, 18/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सॅ‍‍डीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच. तर मुख्य मुद्दा असा की 'मॅसोचिस्ट सौंदर्याच्या या अभिव्यक्तीमागे एक गूढ लपलंय. पण मी ते सांगत बसणार नाही.

अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

लेखक यकु यांनी गुरुवार, 15/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.

ईशान्य भारत ...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....?? आक्रोक्ष माझ्या जगण्याचा....कोणी जाणून घेता का....?? कुणाचा असेल हा जीवघेणा आकांत..?? चिमुकल्या स्त्री गर्भाचा कि दंगलीत होरपळलेल्या कुटुंबाचा..?? सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा कि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा..?? अपयशी विद्यार्थाचा कि महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्याचा....कुणाचा...?? भारतीयच परंतु प्रगत रस्ते, वेगवान मोटारी, हवे तेवढे मॉल्स, सुसज्ज दवाखाने, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व सुख सोयीपासून वंचित असलेल्या ईशान्य राज्यांकडील लोकांचा हा आवाज आहे . मागासलेपणा, दळणवळणाची अपुरी साधने, उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी, जबरदस्तीने होणारे ख्र

महाविजेता निवडा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 23/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्र-मैत्रिणींनो, व्यास क्रिएशन आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत सर्वोत्तम अकरा निबंधामध्ये माझ्या निबंधाची निवड झाली असून त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे.