कार्ट्यांस...
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित.
(चालः चल री सजनी अब क्या सोचे)
लिही रे भावा तू अपुल्या मनचे
डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे
लिही रे...
टाकून खरडी भिक्षा मागणे
जमवून कंपू गोंधळ घालणे
असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे
लिही रे...
असेलही तुझी लेखणी धमाल
करिती इथले सगळेचि लाल
स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे
लिही रे...
लिहीले जरी तू ओतुनि तनमन
गेले जरी पुढच्या पानी ते पटकन
दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे
लिही रे...
जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी
आतल्या गोटात लावावी वरणी
भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे
लिही रे...
मिसळपाव
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला.